शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय बॅनरबाजीला आचारसंहितेचा ब्रेक

By admin | Updated: September 15, 2014 00:29 IST

वाशिम जिल्ह्यातील राजकीय बॅनर उतरली

वाशिम : विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत होताच जिल्हा प्रशासनाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरांसह गावागावात लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे व राजकारण्यांचे पोस्टर्स, बॅनर, इमारतींवरील जाहीराती झाकण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. विधानसभा आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमिवर आता राजकारण्यांमध्ये सुरू झालेल्या बॅनरवॉरला लगाम बसणार आहे. गत एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक पार पडली. तेव्हापासून राज्यात विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली होती. वाशिम जिल्हाही याला अपवाद नव्हता. विधानसभा निवडणूकीत विजयाच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी इच्छूकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. तर विद्यमान आमदार अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींनी निवडणूक दृष्ट्रीपथात ठेऊनच विविध कामांच्या भूमिपुजनाचा सपाटा लावला होता. आचारसंहिता लाबल्यामुळे यांच्या दुधातच साखर पडली होती. परंतु १२ सप्टेंबरला आचारसंहिता लागली आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या भूमिपुजनाच्या सपाट्याला लगाम लागला आहे. विद्यमान आमदारांचे काही प्रस्ताव प्रशासकीय मंजुरातीविना अडले असुन काही निधीही परत जाण्याची शक्यता आहे दुसरकडे विधानसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी शक्तीपणास लावणार्‍या काही इच्छूकांनी मतदार संघात सर्वत्र बॅनर , पोस्टर्स लावून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. काहींनी गणेशोत्सवाचे निमित्त साधून बॅनर लावले होते. आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही सर्व बॅनर उतरविण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक राजकीय पक्षाला आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना केल्या आहेत. या शिवाय प्रचारासाठी वापरण्यात येणारी वाहने, लाऊडस्पिकर तथा अन्य साधनांचीही रितसर परवानगी घ्यावी असे प्रशासनाने राजकीय पक्षांना सुचीत केले आहे.           स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्‍यासह वैधानिक विकास महांमडळ व इतर मंडळाच्या पदाधिकार्‍यांकडे असलेले शासकीय वाहने तात्काळ जमा करण्यात आली आहेत. त्यामुळे आता सदर पदाधिकार्‍यांची चांगलीच गोची झाली आहे.आचारसंहितेच्या पृष्ठभूमिवर प्रशासनानेराजकीय पक्ष व राजकारण्यांना बॅनर काढण्याचे आदेश देऊनही कुणी या आदेशाचा भंग केल्यास त्याच्यावर प्रशासनाकडुन कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने खास पथक गठित केले असल्याची माहीती आहे.