शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

ढोरखेडाच्या शेतकऱ्यांचा पेरणीवर बहिष्कार !

By admin | Updated: May 4, 2017 01:10 IST

शिरपूर जैन : वाढती महागाई व शेतमालास योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

ग्रामसभेत घेतला निर्णय : कुटुंबापुरतेच उत्पन्न घेण्याचा निर्धारशिरपूर जैन : वाढती महागाई व शेतमालास योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतमालास अपेक्षीत भावच न मिळाल्याने यंदाच्या खरीप हंगामात महागडी बि-बियाणे आणि खते खरेदी करावी की घराचा डोलारा सांभाळावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. याच कारणामुळे मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी शेती बंदचा अर्थात पेरणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी शेतमालच नसताना प्रत्येक वाणाचे दर गगनाला भिडले होते. यंदा मात्र कोणत्याच शेतमालास योग्य भाव मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च करून पिक काढणारा शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अपेक्षीत भावाअभावी पिककर्जाची परतफेड करणे त्यांच्यासाठी कठीण झाल्यानेच ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी यंदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बुधवारी गावात रितसर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. या सभेला ढोरखेडा या गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, याप्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढेच उत्पादन घेणार सुल्तानी आणि अस्मानी संकटाला कंटाळलेल्या ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी यंदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला असला तरी, कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी काही अर्थार्जन आवश्यक असते; परंतु थेट कोणतेही काम करून अर्थाजन करण्याऐवजी शेतीत स्वत:च्या कुटुंबासाठी वर्षभर पुरेल, एवढेच पिक घेण्याचे या शेतकऱ्यांनी ठरविले आहे. गावातील महिला शेतकरी सुनिता दत्तात्रय मिटकरी यांनी हा प्रस्ताव ग्रामसभेत ठेवला आणि त्याला राधेशाम पद्माकर सावले यांनी अनुमोदन दिले. ग्रामसभेत उपस्थित सर्वच शेतकऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. मागील वर्षी जिल्ह्यातील काही ठिकाणच्या शेतकऱ्यांनी, शेती बंदचा निर्णय घेत शासनाच्या शेतीविषयक धोरणाला विरोध दर्शविला होता. आता ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. शेतात राबराब राबून पिकविलेल्या शेतमालास अपेक्षीत भाव मिळत नाहीत. लावलेला खर्चही त्यामुळे वसुल होणे कठीण झाले असताना कर्जाचा डोंगर डोक्यावर चढत असल्याने आत्महत्या करण्याची पाळी आम्हावर आली आहे. घाम गाळून मुलेबाळे उपाशी मारण्याऐवजी आम्ही शेतीच न करण्याचे ठरविले आहे. -राधेशाम सावले, शेतकरी ढोरखेडा