शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

ढोरखेडाच्या शेतकऱ्यांचा पेरणीवर बहिष्कार !

By admin | Updated: May 4, 2017 01:10 IST

शिरपूर जैन : वाढती महागाई व शेतमालास योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

ग्रामसभेत घेतला निर्णय : कुटुंबापुरतेच उत्पन्न घेण्याचा निर्धारशिरपूर जैन : वाढती महागाई व शेतमालास योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतमालास अपेक्षीत भावच न मिळाल्याने यंदाच्या खरीप हंगामात महागडी बि-बियाणे आणि खते खरेदी करावी की घराचा डोलारा सांभाळावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. याच कारणामुळे मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी शेती बंदचा अर्थात पेरणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी शेतमालच नसताना प्रत्येक वाणाचे दर गगनाला भिडले होते. यंदा मात्र कोणत्याच शेतमालास योग्य भाव मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च करून पिक काढणारा शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अपेक्षीत भावाअभावी पिककर्जाची परतफेड करणे त्यांच्यासाठी कठीण झाल्यानेच ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी यंदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बुधवारी गावात रितसर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. या सभेला ढोरखेडा या गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, याप्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढेच उत्पादन घेणार सुल्तानी आणि अस्मानी संकटाला कंटाळलेल्या ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी यंदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला असला तरी, कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी काही अर्थार्जन आवश्यक असते; परंतु थेट कोणतेही काम करून अर्थाजन करण्याऐवजी शेतीत स्वत:च्या कुटुंबासाठी वर्षभर पुरेल, एवढेच पिक घेण्याचे या शेतकऱ्यांनी ठरविले आहे. गावातील महिला शेतकरी सुनिता दत्तात्रय मिटकरी यांनी हा प्रस्ताव ग्रामसभेत ठेवला आणि त्याला राधेशाम पद्माकर सावले यांनी अनुमोदन दिले. ग्रामसभेत उपस्थित सर्वच शेतकऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. मागील वर्षी जिल्ह्यातील काही ठिकाणच्या शेतकऱ्यांनी, शेती बंदचा निर्णय घेत शासनाच्या शेतीविषयक धोरणाला विरोध दर्शविला होता. आता ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. शेतात राबराब राबून पिकविलेल्या शेतमालास अपेक्षीत भाव मिळत नाहीत. लावलेला खर्चही त्यामुळे वसुल होणे कठीण झाले असताना कर्जाचा डोंगर डोक्यावर चढत असल्याने आत्महत्या करण्याची पाळी आम्हावर आली आहे. घाम गाळून मुलेबाळे उपाशी मारण्याऐवजी आम्ही शेतीच न करण्याचे ठरविले आहे. -राधेशाम सावले, शेतकरी ढोरखेडा