शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

ढोरखेडाच्या शेतकऱ्यांचा पेरणीवर बहिष्कार !

By admin | Updated: May 4, 2017 01:10 IST

शिरपूर जैन : वाढती महागाई व शेतमालास योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

ग्रामसभेत घेतला निर्णय : कुटुंबापुरतेच उत्पन्न घेण्याचा निर्धारशिरपूर जैन : वाढती महागाई व शेतमालास योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतमालास अपेक्षीत भावच न मिळाल्याने यंदाच्या खरीप हंगामात महागडी बि-बियाणे आणि खते खरेदी करावी की घराचा डोलारा सांभाळावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. याच कारणामुळे मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी शेती बंदचा अर्थात पेरणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी शेतमालच नसताना प्रत्येक वाणाचे दर गगनाला भिडले होते. यंदा मात्र कोणत्याच शेतमालास योग्य भाव मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च करून पिक काढणारा शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अपेक्षीत भावाअभावी पिककर्जाची परतफेड करणे त्यांच्यासाठी कठीण झाल्यानेच ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी यंदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बुधवारी गावात रितसर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. या सभेला ढोरखेडा या गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, याप्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढेच उत्पादन घेणार सुल्तानी आणि अस्मानी संकटाला कंटाळलेल्या ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी यंदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला असला तरी, कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी काही अर्थार्जन आवश्यक असते; परंतु थेट कोणतेही काम करून अर्थाजन करण्याऐवजी शेतीत स्वत:च्या कुटुंबासाठी वर्षभर पुरेल, एवढेच पिक घेण्याचे या शेतकऱ्यांनी ठरविले आहे. गावातील महिला शेतकरी सुनिता दत्तात्रय मिटकरी यांनी हा प्रस्ताव ग्रामसभेत ठेवला आणि त्याला राधेशाम पद्माकर सावले यांनी अनुमोदन दिले. ग्रामसभेत उपस्थित सर्वच शेतकऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. मागील वर्षी जिल्ह्यातील काही ठिकाणच्या शेतकऱ्यांनी, शेती बंदचा निर्णय घेत शासनाच्या शेतीविषयक धोरणाला विरोध दर्शविला होता. आता ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. शेतात राबराब राबून पिकविलेल्या शेतमालास अपेक्षीत भाव मिळत नाहीत. लावलेला खर्चही त्यामुळे वसुल होणे कठीण झाले असताना कर्जाचा डोंगर डोक्यावर चढत असल्याने आत्महत्या करण्याची पाळी आम्हावर आली आहे. घाम गाळून मुलेबाळे उपाशी मारण्याऐवजी आम्ही शेतीच न करण्याचे ठरविले आहे. -राधेशाम सावले, शेतकरी ढोरखेडा