शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

‘स्वबळाने’ वाढविले ‘ब्लडप्रेशर’

By admin | Updated: October 7, 2014 01:21 IST

वाशिम जिल्ह्यात कार्यकर्त्यांची वाणवा : २५ वर्षानंतर सेना -भाजप आमने सामने.

वाशिम : राज्यात शिवसेना-भाजप आघाडी २५ वर्षांनंतर, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस तब्बल १५ वर्षांनंतर प्रथमच स्वतंत्र लढत आहेत. जिल्ह्यातील तीन मतदारसंघात अनेक ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तसेच कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचे चिन्ह पंधरा ते पंचवीस वर्षांंच्या कालावधीनंतर मतदारांसमोर नेऊन त्यांना मते मागावी लागत आहेत.राज्यात सन १९९0 मध्ये शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीची मोट बांधल्या गेली होती. मात्र यंदा दोन्ही पक्षातील नेत्यांच्या सत्तेच्या हव्यासापोटी युतीतील २५ वर्षापासूनचा मधुचंद्र संपला आहे. परिणामी, दोन्ही पक्षांनी आपल्या पैलवानांना स्वबळाचे तेल लावून विधानसभा निवडणूकीच्या आखाड्यात उ तरिवले आहे. राज्यात युतीचा जन्म झाला तेव्हापासून वाशिम व रिसोड मतदारसंघात भारतीय जनता पक्षानेच निवडणूक लढली होती तर कारंजा व पुर्नरचनेत बाद झालेल्या मंगरूळपीर मतदारसंघातून शिवसेना लढत आली होती. सन २00८ मध्ये परिसिमन आयोगाने मतदारसंघाची पुर्नरचना केली. त्यामध्ये मंगरूळपीर मतदारसंघ बाद झाला. परिणामी, शिवसेनेच्या वाट्याला जिल्ह्यात केवळ कारंजा हा एकमेव मतदार संघ कायम राहीला. आता युती तुटल्यामुळे कारंजा मतदारसंघात प्रथमच भारतीय जनता पक्ष निवडणूकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांंना घराघरात कमळ फुलविताना कमालीचा त्रास होत आहे. वाशिम व रिसोड मतदारसंघात नेमकी या उलट परिस्थिती आहे. येथे शिवसेना २५ वर्षानंतर प्रथमच लढते आहे. त्यामुळे स्वाभाविकच शिवसैनिकांना येथे प्रचाराला शिवधनुष्य पेलताना घाम फुटुन निघत आहे. सन १९९९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली. जिल्ह्यातील वाशिम व रिसोड व कारंजा मतदारसंघ कॉग्रेसच्या तर मंगरूळपीर हा एकमेव मतदारसंघ त्यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाट्यावर आला होता. सन २00८ च्या मतदारसंघ पुर्नरचनेत मंगरूळपीर बाद झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसने लगतचा कारंजा मतदारसंघ आपल्याकडे घेतला. यंदा, मात्र भारतीय जनता पक्ष व शिवसेने प्रमाणेच कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्याही आघाडीत बिघाडी झाली. राष्ट्रवादीने कॉग्रेसच्या हातावरील घड्याळ सोडून घेतले. त्यामुळे आता तिन्ही मतदारसंघात दोन्ही कॉग्रेसचे उमेदवार परस् परांच्या समोर उभे ठाकले आहेत.