शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वबळाने’ वाढविले ‘ब्लडप्रेशर’

By admin | Updated: October 7, 2014 01:21 IST

वाशिम जिल्ह्यात कार्यकर्त्यांची वाणवा : २५ वर्षानंतर सेना -भाजप आमने सामने.

वाशिम : राज्यात शिवसेना-भाजप आघाडी २५ वर्षांनंतर, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस तब्बल १५ वर्षांनंतर प्रथमच स्वतंत्र लढत आहेत. जिल्ह्यातील तीन मतदारसंघात अनेक ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तसेच कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचे चिन्ह पंधरा ते पंचवीस वर्षांंच्या कालावधीनंतर मतदारांसमोर नेऊन त्यांना मते मागावी लागत आहेत.राज्यात सन १९९0 मध्ये शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीची मोट बांधल्या गेली होती. मात्र यंदा दोन्ही पक्षातील नेत्यांच्या सत्तेच्या हव्यासापोटी युतीतील २५ वर्षापासूनचा मधुचंद्र संपला आहे. परिणामी, दोन्ही पक्षांनी आपल्या पैलवानांना स्वबळाचे तेल लावून विधानसभा निवडणूकीच्या आखाड्यात उ तरिवले आहे. राज्यात युतीचा जन्म झाला तेव्हापासून वाशिम व रिसोड मतदारसंघात भारतीय जनता पक्षानेच निवडणूक लढली होती तर कारंजा व पुर्नरचनेत बाद झालेल्या मंगरूळपीर मतदारसंघातून शिवसेना लढत आली होती. सन २00८ मध्ये परिसिमन आयोगाने मतदारसंघाची पुर्नरचना केली. त्यामध्ये मंगरूळपीर मतदारसंघ बाद झाला. परिणामी, शिवसेनेच्या वाट्याला जिल्ह्यात केवळ कारंजा हा एकमेव मतदार संघ कायम राहीला. आता युती तुटल्यामुळे कारंजा मतदारसंघात प्रथमच भारतीय जनता पक्ष निवडणूकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांंना घराघरात कमळ फुलविताना कमालीचा त्रास होत आहे. वाशिम व रिसोड मतदारसंघात नेमकी या उलट परिस्थिती आहे. येथे शिवसेना २५ वर्षानंतर प्रथमच लढते आहे. त्यामुळे स्वाभाविकच शिवसैनिकांना येथे प्रचाराला शिवधनुष्य पेलताना घाम फुटुन निघत आहे. सन १९९९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली. जिल्ह्यातील वाशिम व रिसोड व कारंजा मतदारसंघ कॉग्रेसच्या तर मंगरूळपीर हा एकमेव मतदारसंघ त्यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाट्यावर आला होता. सन २00८ च्या मतदारसंघ पुर्नरचनेत मंगरूळपीर बाद झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसने लगतचा कारंजा मतदारसंघ आपल्याकडे घेतला. यंदा, मात्र भारतीय जनता पक्ष व शिवसेने प्रमाणेच कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्याही आघाडीत बिघाडी झाली. राष्ट्रवादीने कॉग्रेसच्या हातावरील घड्याळ सोडून घेतले. त्यामुळे आता तिन्ही मतदारसंघात दोन्ही कॉग्रेसचे उमेदवार परस् परांच्या समोर उभे ठाकले आहेत.