शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

भाजपा-सेनेतील लढती ठरणार लक्षवेधक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:48 IST

संतोष वानखडे वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान होणार ...

संतोष वानखडे

वाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान होणार आहे. अगोदरच घोटाळ्याच्या आरोप-प्रत्यारोपावरून सेना-भाजपातील वाद पेटलेला असताना, आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत सेना-भाजपा उमेदवारांमधील लढती नेमक्या कशा रंगणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

न्यायालयीन निर्णयानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी ५ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत असल्याने राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतल्याचे दिसून येते. महत्त्वाच्या गट व गणांत भाजपातर्फे निवडणूक रिंगणात उमेदवार उतरविण्यात येणार असून, शिवसेनादेखील तेवढ्याच ताकदीने प्रचारकार्यात उतरल्याचे दिसून येते. भाजपा आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी एकमेकांवर घोटाळ्यांचे आरोप केल्याने राजकीय क्षेत्र ढवळून निघत आहे. आता त्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीने आणखी भर घातली असून, ग्रामीण भागात राजकारण चांगलेच तापत आहे. गत पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेत भाजपा-शिवसेनेने एकमेकांच्या हातात हात देत प्रबळ विरोधकाची भूमिका पार पाडली होती. तीन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने भाजपा-सेनेत शाब्दिक वादाची ठिणगी पडली. याचे पडसाद जिल्ह्यातही अधूनमधून उमटत असून, आता पोटनिवडणुकीत भाजपा-सेना उमेदवारांमधील लढती कशा लक्षवेधक ठरतील, याकडे दोन्ही पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागलेले आहे.

....................

काटा, उकळीपेन, कुपटा गटाकडे लक्ष!

वाशिम तालुक्यातील काटा, उकळीपेन, मानोरा तालुक्यातील कुपटा, फुलउमरी यासह पंचायत समितीच्या काही गणात लक्षवेधक लढती होण्याचे संकेत आहेत. जेथे सेना किंवा भाजपाचा उमेदवार नसेल, तेथे त्या पक्षातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते नेमकी कोणती भूमिका घेतात, कुणाला छुप्या पद्धतीने मदत करणार? हे पाहणे उत्कंठावर्धक ठरेल, यात शंका नाही.

.......

कुरघोडीच्या राजकारणात कुणाचा होईल गेम?

राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नाही. राजकारणात कुणी कुणाचा कायम शत्रू अथवा मित्र नसतो, असेही म्हटले जाते. कुणी वरचढ ठरत असेल तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याचा राजकीय गेम कसा करायचा, याचे कसब मुरब्बी राजकारण्यांमध्ये ठासून भरलेले असते. पोटनिवडणुकीत कुरघोडीच्या या राजकारणाचा अन्य पक्षांच्या उमेदवाराला फायदा झाल्यास नवल वाटायला नको, असे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.