शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

तृणमूलच्या हिंसाचाराचा भाजपाने नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:43 IST

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या राज्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात सुडाचे राजकारण सुरू झाले आहे, असा ...

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या राज्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात सुडाचे राजकारण सुरू झाले आहे, असा आरोप भाजपाने यावेळी केला. या पक्षाचे कार्यकर्ते हे भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करीत आहेत. कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार राजरोसपणे घडत आहेत. लोकशाहीच्या होणाऱ्या या हत्येच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ५ मे रोजी जिल्हाभरात शांततामय निदर्शने केली. जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील तब्बल ५६० बूथवर कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. जिल्हा संघटन सरचिटणीस सुनील राजे, जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील काळे, श्याम बढे यांच्या मार्गदर्शनात तर वाशिम तालुक्यात तालुकाध्यक्ष प्रल्हाद गोरे, शहराध्यक्ष राहुल तुपसांडे, मंगरूळ्पीर तालुक्यात तालुकाध्यक्ष रवींद्र ठाकरे, शहराध्यक्ष श्याम खोडे, कारंजा तालुक्यात तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे, शहराध्यक्ष ललित चांडक, मानोरा तालुक्यात तालुकाध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण, मालेगाव तालुक्यात तालुकाध्यक्ष सुरेश मुंढे, शहराध्यक्ष संतोष तिखे तर रिसोडमध्ये जिल्हा उपाध्यक्ष खुशाल ढोणे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी दिली.