शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वाशिम जिल्ह्यात ‘पक्ष्यांचे निरीक्षण आणि गणना’ उपक्रम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 14:21 IST

मालेगाव : भारतीय पक्षी विश्वाला जागतिक स्तरावर पोहोचवणारे पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली व पक्षी अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबरपासून पक्षी सप्ताहास सुरुवात झाली.

ठळक मुद्देवत्सगुल्म जैव विविधता संस्थेचा पुढाकार५ नोव्हेंबरपासून पक्षी सप्ताहास सुरुवात

मालेगाव : भारतीय पक्षी विश्वाला जागतिक स्तरावर पोहोचवणारे पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली व पक्षी अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबरपासून पक्षी सप्ताहास सुरुवात झाली. हा सप्ताह १२ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, परिसरातील स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांची  ओळख विध्यार्थ्यांना व्हावी म्हणून वत्सगुल्म जैव विविधता संवर्धन संस्थेच्या वतीने  पक्ष्यांचे निरीक्षण आणि गणना उपक्रम राबविला जात आहे.

अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन ५ नोव्हेंबर असून डॉ. सलीम अली यांची जयंती १२ नोव्हेंबरला असते. मारुती चितमपल्ली यांना त्यांच्या जन्मदिनी शुभेच्छा देण्याकरिता व डॉ. सलीम अली यांना आदरांजली देण्यासाठी या वर्षीपासून महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेतर्फे हा सप्ताह आयोजित केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेशी संलग्नित वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन  संस्थेचे पक्षीनिरीक्षक या सप्ताहात सहभागी झाले. स्थानिक पक्षी वैभवाचे संवर्धन  प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने आपल्या आजूबाजूला सतत अस्तित्व दाखवून देणाºया, परिसंस्थेचा अविभाज्य भाग असलेल्या पक्ष्यांची माहिती करून घ्यायची असेल तर गणना आवश्यकच आहे. जैवविविधतेचे महत्त्व ओळखून परिसरातील स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांची  ओळख विध्यार्थ्यांना व्हावी म्हणून वाशीम जिल्ह्यात विविध ठिकाणी १२ नोव्हेंबरपर्यंत  पक्ष्यांचे निरीक्षण आणि गणना केली जाणार आहे. वाशिम तालुक्यातील एकबुर्जी तलाव, मालेगाव तालुक्यातील कोल्ही तलाव, तपोवन जंगल परिसर, रेगाव जवळ असलेल्या तामकराड जंगल परिसरात  निसर्ग भ्रमंती आयोजित केली आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन वत्सगुल्म जैव विविधता संवर्धन संस्थेचे सचिव शिवाजी बळी यांनी केले आहे. सभोवतालच्या परिसरातील पक्ष्यांची गणना यात प्रामुख्याने मानवी वस्तीच्या ठिकाणी राहणाºया पक्ष्यांच्या गणनेवर भर दिला जाणार असून आपापल्या परिसरातील पक्ष्यांची गणना आवर्जून करा. या निसर्ग भ्रमंतीला संस्थेचे सदस्य मार्गदर्शन करणार आहेत. या गणनेत पक्ष्यांच्या शेकडो जातींची नोंद करण्यात येणार  आहे. निवडलेल्या ठिकाणी सकाळी ६.३० ते १० व दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळात दोन्ही वेळा गणना करण्यात येत असून जमिनीवरील, झाडाझुडपातील, पाण्यातील किंवा आकाशात उडणारे अशा सर्व प्रकारच्या पक्ष्यांची नोंद या दरम्यान करण्यात येणार असल्याचे, संस्थेने म्हटले आहे. विविध ठिकाणी पक्षीनिरीक्षण करून जिल्ह्यातील पक्ष्यांच्या प्रजाती, त्यांची वाढलेली किंवा घटलेली निवासस्थाने, त्यांच्या सवयी, दुर्मीळ पक्षी आदिंंची माहिती मिळविता येणार आहे.

टॅग्स :Natureनिसर्ग