शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

मनभा येथे भारिप-बमसं कार्यकर्ता मेळावा उत्साहात;  शेकडो बसपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 14:59 IST

 कारंजा (लाड) : बहुजनांची जागरूकता ही परिवर्तनाची नांदी असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशीम जिलाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी यांनी १८  फेब्रुवारी रोजी तालुक्यातील ग्राम मनभा येथे आयोजित जाहिर प्रवेश सभेदरम्यान केले.              

ठळक मुद्देबहुजनांची जागरूकता ही परिवर्तनाची नांदी असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशीम जिलाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी यांनी केले.     शेकडो भारिप बमसं पदाधिकरी,कार्यकर्ते यांच्यासह बहुसंख्य आंबेडकरी विचारसरणीचे नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचा संचालन भारिप जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केले तर आभार ग्रा.पं. सदस्य सैय्यद आझम यांनी मानले.   

 कारंजा (लाड) : कोरेगाव भीमा प्रकरणानंतर दलित राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाकडे दलित व बहुजन कार्यकर्त्यांचा ओढा वाढला आहे. संपूर्ण बहुजन समाज आज जागरूक झालेला असुन ,जागरूक समाज परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बहुजनांची जागरूकता ही परिवर्तनाची नांदी असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशीम जिलाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी यांनी १८  फेब्रुवारी रोजी तालुक्यातील ग्राम मनभा येथे आयोजित जाहिर प्रवेश सभेदरम्यान केले.              

भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेमध्ये पक्षनिरक्षक एस.बी.खंडारे,डॉ.नरेश इंगळे,विजय मनवार,नगराध्यक्ष शेषराव ढोके,राजाभाऊ चव्हाण,न.प.गटनेता व शिक्षण सभापती  फिरोज शेकुवाले,न.प.उपाध्यक्ष जुम्माभाई पप्पुवाले, तालुकाध्यक्ष भारत भगत,नियोजन सभापती एजाज खान, जिल्हा प्रवक्ता हमीद शेख, शहराध्यक्ष देवराव कटके, युवा आघाडी तालुकाध्यक्ष सचिन खांडेकर आदि प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बसपाचे बंडू इंगोले,रमेश नखाले, दीपक वानखड़े अ‍ॅड.भारत सावळे आदींनी आपल्या शेकडो कार्यकर्ता सह भारिप बहुजन महासंघ मध्ये जाहिर प्रवेश केला . भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर व वाशीम जिल्हाध्यक्ष  मो.युसूफ पुंजानी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भारिप बमसं मध्ये प्रवेश करीत असल्याचे मत उपरोक्त मान्यवरांनी व्यक्त केले. या प्रसंगी नईम भाई मनभा यांनी सुद्धा प्रवेश केला. आपल्या मार्गदर्शनात पुंजानी पुढे म्हणाले की समाजातील सर्व बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हा मुख्य संकल्प असून त्या दिशेने भारिप बहुजन महासंघ वाटचाल करीत आहे. बहुजन समाजाने एकसंघ होऊन प्रस्थापित सत्तेला हद्दपार करणे  गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. दरम्यान बसपाला रामराम ठोकुन भारिप बमसं मध्ये प्रवेश करणारे बंदु इंगोले, रमेश नाखले व दीपक वानखड़े यांच्यासह सर्व प्रवेश करणाºया मान्यवरांचा मो. युसूफ पुंजानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बंडू इंगोले यानी भारिप बहुजन महासंघात प्रवेश करण्याचा उद्देश विशद केला. यावेळी पं.स.सदस्य प्रमोद लड़े, अ‍ॅड.धम्मानंद देवले, के.जी.ताटके, आसिफ कुरेशी,सरपंच वाहिद मिर्जा,दिलीप शेजव,संतोष शेजव,देवेंद्र कराळे,मोहन कदम,मधुकर वनारसे, देवराव सोनटक्के, अनिल राठोड,अशोक पाटिल टाके, गजानन ढेंगड़े, बबन वानखड़े,वसंतराव राठोड,विश्वनाथ आडोले,गणेश बागडे,दिगंबर पाडेन, प्रभुदास पाडेन,निर्मलाबाई इंगोले,मधुकर बोलके,सुनील रामटेके,संजय मनवर,माया निचड, रजनी धाकतोड़े,राजेंद्र रंगारी,संजय मनवर,विष्णु पाटिल,महादेवराव खडसे,भगवान जाधव,दुर्योधन मनवर सह शेकडो भारिप बमसं पदाधिकरी,कार्यकर्ते यांच्यासह बहुसंख्य आंबेडकरी विचारसरणीचे नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचा संचालन भारिप जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केले तर आभार ग्रा.पं. सदस्य सैय्यद आझम यांनी मानले.   

टॅग्स :Bharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघKaranjaकारंजाPoliticsराजकारण