शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

बेटी बचाओ, बेटी पढाओ ही काळाची गरजच

By admin | Updated: February 14, 2015 02:01 IST

‘लोकमत’ परिचर्चेतील सूर; स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्याची नितांत गरज.

कारंजा (जि. वाशिम) : देशात मुलाच्या संख्येच्या प्रमाणात मुलींच्या संख्येत घट होत आहे. या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने देशभरात स्त्री भ्रूणहत्येविरोधातील बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहिम राबविण्यात येत असून, या मोहिमेबाबत परिचर्चेच्या माध्यमातून जनतेच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न ह्यलोकमतह्णच्या वतीने शुक्रवारी करण्यात आला. स्त्रीयांची स्थिती सुधारण्यासाठी फायदेशीर ठरणारी ही मोहीम निश्‍चितच स्वागतार्ह असल्याचा निष्कर्ष त्यामधून निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणा येथे २३ जानेवारीला ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. देशातील दर हजारी मुलांमागे मुलींच्या जननसंख्येत वाढ व्हावी, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार १९७१ मध्ये भारतात हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९६४ होते, तर २0११मध्ये हेच प्रमाण ९१८वर पोहोचले. २00१ ते २0११ या दरम्यान हे प्रमाण देशातील अनेक जिल्ह्यांत खाली आलेले दिसले. ब्रिटिश मेडिकल र्जनलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार १९८0 ते २0११ या दरम्यानच्या काळात भारतात एक कोटी २0 लाख मुलींची गर्भातच हत्या करण्यात आली. पंचायत समिती सभापती वर्षाताई नेमाणे, जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्षा सविता मोरे, उपाध्यक्ष मंजुशा पिंपळशेंडे, प्रया बाणगांवकर परिचर्चेत सहभागी झाल्या होत्या. ही मोहिम राबविताना जनतेकडून योग्य सहकार्य लाभणे अपेक्षित आहे, तसेच शासनानेही ही मोहिम राबविताना थोडी ताठर भूमिका घ्यायला हवी. असे मत मान्यवर महिलांकडून लोकमतच्या परिचर्चेत व्यक्त करण्यात आले.