शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बेटी बचाओ- बेटी पढाओ’ अभियानाला निधीची प्रतीक्षा ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 14:52 IST

वाशिम: स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशातून, राज्यातील १६ जिल्ह्यांत सुरू असलेल्या ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ अभियानाला जवळपास सहा महिन्यांपासून निधीची प्रतीक्षा आहे. विविध कारणांमुळे स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरात तफावत निर्माण होत आहे. यातूनच स्त्री भ्रूण हत्या, लिंग निवड चाचणी आदी प्रकार घडत असल्याने यावर प्रभावी उपाययोजना ...

ठळक मुद्देउसनवारीवर जनजागृती महिला व बालकल्याण विभागाची कसरत

वाशिम: स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशातून, राज्यातील १६ जिल्ह्यांत सुरू असलेल्या ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ अभियानाला जवळपास सहा महिन्यांपासून निधीची प्रतीक्षा आहे. 

विविध कारणांमुळे स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरात तफावत निर्माण होत आहे. यातूनच स्त्री भ्रूण हत्या, लिंग निवड चाचणी आदी प्रकार घडत असल्याने यावर प्रभावी उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान २१ फेब्रुवारी २0१५ पासून देशातील १00 जिल्ह्यांत सुरू असून, यासाठी १00 टक्के निधीची हमी केंद्र शासनाने घेतली आहे. या अभियानात महाराष्ट्रातील बुलडाणा, वाशिम, बीड, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना यासह १६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. या अभियानात समाविष्ठ असलेल्या जिल्ह्यात लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षिततेबाबत खात्री देणे, स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे यासह अन्य उद्दिष्ट साध्य करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवण्यात आले. यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी पुरविला जातो. २०१७-१८ या सत्राला सुरूवात होऊन सात महिने होत आहेत. अद्याप निधी मिळाला नसल्याने या अभियानांतर्गत ऊधारीवर विविध उपक्रम राबविण्याची वेळ महिला व बालकल्याण विभागावर आली आहे. अभियानांतर्गतचा निधी लवकरच मिळेल, अशी अपेक्षा महिला व बालकल्याण विभाग बाळगून आहे.

टॅग्स :Governmentसरकार