शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आणखी पाच महिने लाभार्थींना मिळणार रेशनचे मोफत धान्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:26 IST

संतोष वानखडे वाशिम : कोरोनाकाळात गोरगरिबांची गैरसोय होऊ नये याकरिता केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या ...

संतोष वानखडे

वाशिम : कोरोनाकाळात गोरगरिबांची गैरसोय होऊ नये याकरिता केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या दोन महिन्यांसाठी पात्र लाभार्थींना रेशनचे मोफत धान्य वितरित करण्यात आले. आता जुलै ते नोव्हेंबर अशा पाच महिन्यांसाठी अंत्योदय व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थींना गहू व तांदळाचा मोफत लाभ मिळणार आहे.

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. गतवर्षी संपूर्ण लॉकडाऊन असल्याने केंद्र शासनाने तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना रेशनचे मोफत धान्य वितरित केले होते. यंदा दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे या महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने गोरगरीब लाभार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाने मे महिन्यात मोफत धान्य वितरित केले. याच धर्तीवर केंद्र शासनातर्फेदेखील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंबांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मोफत धान्य देण्यात आले. आता जुलै ते नोव्हेंबर अशा पाच महिन्यांसाठी प्रति लाभार्थी प्रति महिना तीन किलो गहू व दोन किलो गहू मोफत मिळणार आहेत. जिल्ह्यातील ८८५ रेशन दुकानांमधून अंत्योदय योजनेच्या ४८,२७४ आणि प्राधान्य गटातील १,७७,८५७ कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे. रेशन दुकानांमधून धान्य वाटप करताना गर्दी होऊ नये म्हणून दुकानदारांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचना पुरवठा विभागाने दिलेल्या आहेत.

०००

काय मिळणार लाभ?

जिल्ह्यात अंत्योदयचे ४८,२७४ तर प्राधान्य गटातील १,७७,८५७ कार्डधारक आहेत. कुटुंबातील प्रति सदस्याला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत मिळणार आहेत.

०००००००

एकूण रेशन दुकान ८८५

अंत्योदय ४८,२७४

प्राधान्य गट १,७७,८५७

०००००

अशी आहे तालुकानिहाय कार्डसंख्या

तालुकाअंत्योदयप्राधान्य गट

वाशिम ८,७०२ ३४,५३३

रिसोड ९,९३१ ३२,८१९

मानोरा ६,७३१ २७,०५०

मं.पीर ७,७७० २५,२७१

मालेगाव ६,८८२ ३१,७७०

कारंजा ८,२५८ २६,४१४