शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कांरजा लाड येथील चौकांचे सौंदर्यीकरण

By admin | Updated: October 29, 2014 01:23 IST

नगर परिषदेने पुढाकार घ्यावा : नागरिकांची मागणी

कारंजा लाड (वाशिम): स्वामी नृसिंह सरस्वती गुरुमहाराजांचे जन्मस्थान आणि जैनांची काशी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक कारंजा शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण करण्याची नितांत आवश्यक आहे. कारंजा शहराची ख्याती पाहता आणि ऐतिहासिक वारसा लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने त्याची जपणूक करून शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकण्याचा प्रयत्न करायला हवा. काही वर्षांपूर्वी स्थानिक प्रशासनाकडून त्याबाबत पावलेही उचलण्यात आली; परंतु ती कामे म्हणावी तशी झाली नाही. परिणामी, शहरातील अनेक चौक भकास झाल्याचे दिसत आहे. कारंजा शहरात सर्वच धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. शहरातील प्रत्येक सार्वजनिक उत्सव मुस्लिम-हिंदू बांधव सहकार्याच्या भावनेतून साजरा करतात. त्यानुसार शहरात विविध धर्माच्या महापुरुषांची नावेही चौकांना देण्यात आली आहेत. शहर हे सर्वधर्मीयांचे तीर्थक्षेत्र असल्याने शहरात दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे शहरातील प्रत्येक चौकाचे नव्याने सौंदर्यीकरण करून त्याची योग्य देखभाल केल्यास भाविकांचे समाधान होऊन शहराचे वैभव वाढेल. शहरातील सुभाषचंद्र बोस, शिवाजी चौकाचे सौंदर्यीकरण माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. त्याचे जतन योग्य रितीने होत असल्याने त्या परिसरात उत्सवात नागरिकांची गर्दी राहते. माजी नगराध्यक्ष गोलेच्छा यांच्या कार्यकाळात स्थानिक तहसील कार्यालयाच्या परिसरात असणार्‍या वाल्मीक चौक, जयस्तंभ चौक, आंबेडकर चौकाचे काम पूर्ण झाले होते. काही दिवस चौकातील कारंजे सुरू राहिले; मात्र आता ते बंद दिसत आहेत. सत्ता परिवर्तनानंतर शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.