शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

कांरजा लाड येथील चौकांचे सौंदर्यीकरण

By admin | Updated: October 29, 2014 01:23 IST

नगर परिषदेने पुढाकार घ्यावा : नागरिकांची मागणी

कारंजा लाड (वाशिम): स्वामी नृसिंह सरस्वती गुरुमहाराजांचे जन्मस्थान आणि जैनांची काशी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक कारंजा शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण करण्याची नितांत आवश्यक आहे. कारंजा शहराची ख्याती पाहता आणि ऐतिहासिक वारसा लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने त्याची जपणूक करून शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकण्याचा प्रयत्न करायला हवा. काही वर्षांपूर्वी स्थानिक प्रशासनाकडून त्याबाबत पावलेही उचलण्यात आली; परंतु ती कामे म्हणावी तशी झाली नाही. परिणामी, शहरातील अनेक चौक भकास झाल्याचे दिसत आहे. कारंजा शहरात सर्वच धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. शहरातील प्रत्येक सार्वजनिक उत्सव मुस्लिम-हिंदू बांधव सहकार्याच्या भावनेतून साजरा करतात. त्यानुसार शहरात विविध धर्माच्या महापुरुषांची नावेही चौकांना देण्यात आली आहेत. शहर हे सर्वधर्मीयांचे तीर्थक्षेत्र असल्याने शहरात दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे शहरातील प्रत्येक चौकाचे नव्याने सौंदर्यीकरण करून त्याची योग्य देखभाल केल्यास भाविकांचे समाधान होऊन शहराचे वैभव वाढेल. शहरातील सुभाषचंद्र बोस, शिवाजी चौकाचे सौंदर्यीकरण माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. त्याचे जतन योग्य रितीने होत असल्याने त्या परिसरात उत्सवात नागरिकांची गर्दी राहते. माजी नगराध्यक्ष गोलेच्छा यांच्या कार्यकाळात स्थानिक तहसील कार्यालयाच्या परिसरात असणार्‍या वाल्मीक चौक, जयस्तंभ चौक, आंबेडकर चौकाचे काम पूर्ण झाले होते. काही दिवस चौकातील कारंजे सुरू राहिले; मात्र आता ते बंद दिसत आहेत. सत्ता परिवर्तनानंतर शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.