शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

सावधान ! सततचा पाऊस देतोय जलजन्य आजारांना आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST

००००००००००००००० दूषित पाण्यामुळे होणारे आजार १) डायरिया, गॅस्ट्रो : डायरिया, गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर ...

०००००००००००००००

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

१) डायरिया, गॅस्ट्रो : डायरिया, गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणं दिसू लागतात. पावसाळ्यात ही लक्षणं साथीच्या आजारासारखी पसरतात. उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते.

००००००००००००००००

२) कावीळ : दूषित पाण्यामुळे कावीळ आजार होतो. त्यात हेपेटायटिस 'ए' किंवा 'इ' हे प्रकार झाल्याचे आढळतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर सात ते आठ दिवसांत उलट्या, ताप, लघवी पिवळी होणे किंवा भूक मंदावणं ही लक्षणे दिसतात. चार ते पाच दिवसांनी डोळे पिवळे दिसायला लागतात.

००००००००००००००००

३) टायफॉइड : टायफॉइड हा आणखी एक आजार दूषित पाण्यामुळे होतो. चार ते पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात ताप येतो. पोटात खूप दुखते. उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात. यामध्ये काही रुग्ण दगावण्याची भीती असते.

००००००००००००००००

आसेगावात डायरियाचे शंभरवर रुग्ण

गेला आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव परिसरात पिण्याचे पाणी दूषित होऊन डायरियाचा उद्रेक झाला आहे. बहुतांश ठिकाणी डायरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. शंभरपेक्षा अधिक लोकांना या आजाराची लागण झाली आहे. त्यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी दवाखान्यात उपचारासाठी गर्दी उसळत आहे.

००००००००००००००००००००

कोट: आसेगावात डायरियाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. तेथे तपासणी मोहीम सुरू आहे. ग्रामसेवकांनी प्रत्येक गावात जलसुरक्षकांच्या मदतीने पिण्याच्या जलस्त्रोतात ब्लिचिंग पावडर टाकून घ्यावे. ग्रामस्थांनी पाणी गाळून, उकळून प्यावे. काही गावांत आरोग्य केंद्र नसेल, तर आवश्यकतेनुसार शिबिरही घेतले जाईल.

-डॉ. अविनाश आहेर,

जिल्हा आरोग्य अधिकारी

०००००००००००००००००००

ही घ्या काळजी!

- पावसाळ्यात पाणी पिताना शुद्ध करून पिणे हा सर्वोत्तम उपाय.

- वॉटर प्युरीफायरचे पाच ते सहा थेंब पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात टाकावेत. ते

- हॉटेलमधील उघडे पदार्थ, बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे.

-पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळावे.

-उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यावेळी मीठ-साखर पाणी सतत पित राहावं.

-ओआरएस पावडर एक लिटर पाण्यात टाकून प्यावी.

- शक्य असेल तर नारळाचे पाणी घ्यावे.