शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

पर्यायी पीक पद्धतीचा जागर व्हावा!

By admin | Updated: April 14, 2017 00:55 IST

वाशिम- पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा, पर्यायी पीक पद्धतीचा जिल्हाभरात जागर करा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

पालकमंत्री राठोड यांच्या प्रशासनाला सूचना : खरीप हंगाम पूर्वतयारीचा घेतला आढावा

वाशिम : खरीप हंगामात सोयाबीन पेरणीवर शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर असतो. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात वाढ झाली; मात्र दरात यंदा मोठी घसरण झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ही बाब लक्षात घेता आगामी खरीप हंगामात सोयाबीनला पर्याय ठरू शकेल, अशा पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा, पर्यायी पीक पद्धतीचा जिल्हाभरात जागर करा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात गुरुवारी आयोजित खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खरीप हंगामाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीविषयी माहितीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सादरीकरण केले. पालकमंत्री राठोड पुढे म्हणाले, सोयाबीनला पर्याय ठरू शकणाऱ्या पिकांविषयी कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. या पिकांमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होईल, ते समजावून सांगून त्यांना सदर पिकाची पेरणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. खरीप हंगामात पेरणीसाठी पुरेशा प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध होण्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे. तसेच यादरम्यान बोगस बियाणे, खते विक्रीस येण्याची शक्यता असते. त्यामुळे बोगस बियाणे, खत विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन करून त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मशागत व पेरणीसाठी पैसा उपलब्ध होण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप लवकरात लवकर करण्यात यावे. गतवर्षी ज्या बँकांचे पीक कर्ज वितरण कमी आहे, अशा बँकांनी यावर्षी पीक कर्ज मेळावे आयोजित करून कर्ज वितरण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना पालकमंत्री राठोड यांनी दिल्या. रिसोड येथील अलाहबाद बँकेकडे पीक विम्याच्या प्रलंबित असलेल्या प्रकरणाबद्दल तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील प्रलंबित कृषीपंप वीज जोडण्या तातडीने देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. धडक सिंचन योजनेतून पूर्ण झालेल्या विहिरींना प्राधान्याने वीज जोडणी देण्यासाठी महावितरणने आवश्यक कार्यवाही करावी, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मृदा आरोग्यपत्रिका, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, राष्ट्रीय कृषी विकास योजना आदी योजनांमधील कामांचे सादरीकरण यावेळी गावसाने यांनी केले.पाच हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवा!फळबाग लागवडीच्या माध्यमातून कमी पाणी व कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येणे शक्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकडे वळविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत. याकरिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील किमान पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यानुसार नियोजन व कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.पीक लागवडविषयीच्या घडीपुस्तिकेचे विमोचनकृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) ने तयार केलेल्या उत्पादन खर्च कमी करण्याच्या सर्वसाधारण उपाययोजना व पीकनिहाय लागवड तंत्रज्ञान याविषयी माहितीचा समावेश असलेल्या घडीपुस्तिकेचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या घडीपुस्तिकेत सोयाबीन, तूर, कापूस आदी पिकांच्या लागवडविषयक तंत्रज्ञानाचा समावेश आहे.