नागेश घोपे/ वाशिमपुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या वाशिम जिल्ह्यात सद्यस्थितीत ह्यबोगस वैदुगिरीह्ण ला ऊत आला आहे. कौटुंबिक, शारिरिक तथा मानसिक व्याधींनी त्रस्त असलेल्या अंधश्रद्धाळू लोकांना आयुर्वेदाच्या पदराआड ह्यउल्लुह्ण बनवायचे अन् त्यांच्याकडुन वारेमाप पैसा उकळायचा या प्रवृत्तीेने ह्यबोगस वैदुगिरीह्ण च्या धंद्याला दिवसागणिक बरकत आणली आहे. आपल्याकडे सर्वच आजारांचा रामबाण इलाज असल्याचा दावा करणार्यांच्या अघोरी उ पचारांमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान मात्र, धोक्यात आणले आहे. लोकमतने केलेल्या स्टिंगमधून बोगस वैदुगिरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.दिवसागणिक गंभिर आजारांचे प्रमाण वाढत चालले आहेत. नाना प्रकारची व पॅथींची औषध घेवूनही काही आजार बरे होत नाहीत. परिणामी, रूग्ण अस्वस्थ होतो. नेमकी हीच संधी साधून बोगस वैदू आपले उखड पांढरे करून घैत आहेत. ह्यआजार बरा झाल्यावरच पैस द्याह्ण असे प्रारंभी छा तीठोकपणे सांगायचे नंतर औषधी तयार करण्याच्या नावावर रूग्णांकडुन पैसे उकडायचा असे या बोगस वैदुंचे कारनामे असुन वाशिम शहरात गत आठवड्यापासून यांनी चांगलाच धुडगुस घातला आहे. लोकमतने २७ जूनला केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून या बोगस वैदुंचा भांडाफोड केला. शहरातील टिळक बगिच्यासमोर जडीबुटीच्या नावावर सुरू असेलल्या दुकानदारीतून रूग्णांची कश्या प्रकारे पिळवणूक होते ही बाबही या स्टिंगमधून अधोरेखित झाली आहे.**बोगस वैंदुवर व जडीबुटी विकणार्यांवर कारवाई करण्याचा अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाला नाही. तर जिल्हाधिकार्यांच्या अधिनस्त नियु क्त केलेली समिती बोगस डॉक्टर तथा वैदुंवर कारवाई करू शकते. परंतु त्यासाठी सदर समितीकडे तक्रार करणे गरजेचे असते. ग्रामिण भागातीलच नव्हे तर शहरी भागात राहणारे शिक्षित लोकही अश्या भोंदुवेैदुची तक्रार करण्यास धजावत नाहीत. यातूनच यांचे चांगलेच फावते**आयुर्वेदात कुठल्याही आजारावर उपचार आहे. परंतु सदर उपचार तंत्रशुद्ध व प्रमाणबद्धपणे होणे गरजेचे आहे. त्या साठी आयुर्वेदाचा सखोल अभ्यास करावा लागतो. परंतु काही बोगस वैदु आपली दुकानदारी चालविण्यासाठी आयुर्वेदाचा खोटा आधार घेऊन जडीबुटी विकतात. हा प्रकार आयुर्वेदाला बदनाम करणारा व लोकांची लुबाडणूक करणारा आहे.- डॉ. दीपक ढोके, आयुर्वेद तज्ज्ञ
आयुर्वेदाचे ढोंगी मायाजाल’
By admin | Updated: June 28, 2014 01:40 IST