शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

४५६ गावांमध्ये ग्रामसभेतून उष्माघाताबाबत जागृती !

By admin | Updated: April 22, 2017 00:06 IST

वाशिम जिल्हा परिषदेची विशेष मोहिम; २२ एप्रिल रोजी विशेष मोहिमेचा समारोप.

वाशिम : जिल्ह्यात ग्रामीण जनतेचा उष्माघातापासून बचाव होण्यासाठी १७ ते २२ एप्रिल या कालावधीत जिल्हा परिषदेतर्फे जनजागृतीपर धडक मोहिम राबविण्यात येत असून २१ एप्रिलपर्यंत ४५६ गावांमध्ये जनजागृती करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.एप्रिल व मे २0१७ या महिन्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता वेधशाळेने दर्शविली आहे. उष्माघातामुळे होणारे मृत्यु टाळण्याकरिता व उष्माघात होवु नये याकरिता काय करावे व काय करु नये याबाबत जनजागृती म्हणून १७ एप्रिलपासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे धडक मोहिम राबविली जात आहे. प्रत्येक गावामध्ये स्थानिक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा यांच्यामार्फत स्थानिक नागरिकांचा सहभाग घेवुन आरोग्य शिक्षणाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर उष्माघात कक्ष स्थापन करुन त्यामध्ये २ बेड, कुलर, पंखा तसेच आवश्यक त्या औषधीसह अद्ययावत ठेवण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांनी गावनिहाय क र्मचार्‍यांच्या चमू तयार करुन प्रत्येक चमूमध्ये स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी यांची समावेश आहे. तसेच आरोग्य सेवक, सेविका, आशा, अंगणवाडी सेविका यांचाही समावेश आहे. गावामधील कुटूंबांना भेट देवून व गावामध्ये सभेचे आयोजन करुन उपस्थित लोकांना आरोग्यविषयक धडे दिले जात आहेत. एकाच दिवशी सकाळी व संध्याकाळी दोन वेगवेगळ्या गावामध्ये सभा घेवून मार्गदर्शन करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केल्या होत्या. त्याप्रमाणे नियोजन करुन चमू गावातील कुटूंबांना गृहभेटी देत उष्माघाताबाबतचे प्रचार व प्रसिध्दी साहित्य वाचून दाखवित आहेत. २१ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील एकुण ४५६ गावामध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या. २२ एप्रिल रोजी जनजागृतीपर असलेल्या या मोहिमेचा शेवटचा दिवस आहे. जिल्ह्यातील जनतेने सदर मोहिमेचा लाभ घ्यावा, उष्माघातापासून स्वत:सह कुटुंबाचे संरक्षण म्हणून दक्षता बाळगावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य डॉ. एस. व्ही. मेहकरकर यांनी केले.