शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

२०६ घरकुल लाभार्थींना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:27 IST

पहिल्या टप्प्यातील ६६ लाभार्थींना घरकुल पूर्ण करून दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे या ...

पहिल्या टप्प्यातील ६६ लाभार्थींना घरकुल पूर्ण करून दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे या लाभार्थींमधून संताप व्यक्त केला जात आहे. बेघर लोकांना आपल्या हक्काचे घर मिळावे, याकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. राज्य सरकारकडून १ लाख रुपये व केंद्र सरकारकडून १.५० लाख रुपये असा एकूण अडीच लाख रुपयांचा निधी दिला जातो. राज्य सरकारने आपला वाटा दिला आहे, त्यात लाभार्थी यांनी बांधकाम केले आहे. आता स्लॅब व इतर कामासाठी निधीची गरज आहे. निधी नसल्याने अनेक लाभार्थींची कामे खोळंबली आहेत. काही लोकांनी पैसे उसने, व्याजाने घेऊन बांधकाम पूर्ण केले. त्यांचे व्याज वाढले आहे, तर अनेकांजवळ पैसे नसल्याने त्यांनी अर्धवट घरावर टीन पत्रे टाकून कशी तरी राहण्याची सोय केली आहे. पावसाळा असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. घरकुल मंजूर झाल्याने घर मोडून पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्या डोक्यावरचे छप्पर गेले आहे. केंद्र सरकाने लवकर निधी द्यावा, अशी मागणी लाभार्थी यांनी केली आहे.

............

केंद्र सरकारचा निधी आला नाही. लोकांच्या मागणीनुसार अनेकदा त्याकरिता वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. कोरोनामुळे निधी थांबला असावा, निधी आला की, लगेच वाटप केला जाईल.

- राजेंद्र अंबोरे

अभियंता, आवास योजना न. पं., मानोरा.

पावणे दोन वर्षांपासून मला केंद्र सरकारचा दीड लाख रुपये निधी मिळाला नाही. राज्य सरकारने दिलेल्या पैशातून व व्याजाने पैसे काढून घर बांधले आहे. काही काम अद्याप बाकी आहे. व्याजाने आणलेल्या पैशांचे व्याज वाढत आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. घर पूर्ण बांधले नाही. त्यामुळे घरात पावसाचे पाणी येते.

- सोमसिंग राठोड

लाभार्थी, नाईकनगर, मानोरा.