शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

दारुबंदीसाठी संघटना सरसावल्या!

By admin | Updated: December 17, 2015 02:33 IST

दारू जिल्ह्यातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिका-यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा.

वाशिम : भांडण, कलहाला कारणीभूत असणारी दारू जिल्ह्यातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्याशी चर्चा केली. यापूर्वी महिला मंडळ, भारतीय जैन संघटना, बौद्ध युवा मंच आदींनी दारूबंदीची मागणी केली होती.जिल्ह्यात अवैध दारूविक्रीने कळस गाठला आहे. देशी, विदेशी तसेच गावठी दारू ग्रामीण भागात खुलेआम विकली जात आहे. शहरी भागातून ग्रामीण भागात मोटारसायकलवर दारूची ह्यपार्सलह्ण पोचविली जाते. दारूच्या व्यसनाकडे युवावर्ग भरकटत चालला आहे. यावर आळा घालण्यासाठी सर्व प्रकारची देशी, विदेशी दारुबंदी करुन आदर्श जिल्हा निर्माण करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली. गत दोन वर्षांपासून जिल्हय़ात दारुबंदी व्हावी व निवडणूक काळात पुर्णत: दारु बंदी व्हावी, याकरिता जिल्हा प्रशासन व शासनाला निवेदन दिले; परंतु यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दारूच्या व्यसनामुळे भांडण, तंटे वाढले असल्याचे निवेदनात नमूद आहे. दारूबंदीबाबत यापूर्वी महिला मंडळ, काही ग्रामपंचायतींनी दारूबंदीचे ठराव पारित केले आहेत; मात्र प्रशासन यावर काहीच कार्यवाही करीत नसल्याबाबत यावेळी खंत व्यक्त केली. दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष संध्या पंडित, जिल्हा सचिव सुमन ताजने, वाशिम तालुकाध्यक्ष डी. एस. कांबळे, मालेगाव तालुकाध्यक्ष हरिचंद्र पोफळे, गोविंद इंगळे, ज्ञानदेव सुरवाडे, पंढरी खिल्लारे, नागोराव उचित, प्रा. पा. उ. जाधव, दिलीप गवई, अभिमन्यु पंडित, शिवाजी पडघान, इंदुमती जांभरूनकर, राजू बेलखेडे, एन.के गायकवाड आदी पदाधिकार्‍यांचा समावेश होता.