शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सहायक प्राध्यापक पद भरती सुरू करावी !

By admin | Updated: July 17, 2017 02:32 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: उच्च शिक्षित पात्र उमेदवारांची शासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने २५ मे २०१७ रोजीच्या निर्णयानुसार २०१२ ते २०१७ दरम्यानच्या पदनिश्चितीनुसार व त्यापूर्वी रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया बंद झाली आहे. त्यामुळे या पदासाठी पात्र उमेदवार नोकरीपासून वंचित राहत असल्याने सहाय्यक प्राध्यापकांची पदभरती प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी या पदासाठी पात्र असलेल्या उच्चशिक्षित उमेदवारांकडून करण्यात आली आहे. याबाबत त्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरुवारी निवेदन सादर करून ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचविण्याची मागणीही करण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा, की राज्य शासनाने २५ मे २०१७ रोजी जारी केलेल्या निर्णयामुळे २०१२ ते २०१७ दरम्यानच्या पदनिश्चितीनुसार व त्यापूर्वी रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया बंद झाली आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी नेट, सेट, पीएचडी आदि शैक्षणिक अर्हता प्राप्त क रीत आहेत; परंतु त्या प्रमाणात युजीसीचे निर्देश असूनही शासनाच्या धोरणामुळे उच्च अर्हताप्राप्त उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. युजीसी किंवा विद्यापीठाने वेळोवेळी रिक्त पदे भरण्यासंदर्भात सूचित करुनही संबंधित संस्थाचालक त्यांच्या सुचनांचे पालन न करता रिक्त पदे भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र शासनही वेळोवेळी प्राध्यापक पदांच्या भरतीसह इतर महत्त्वाच्या पदांच्या भरतीत कपात करून वेळोवेळी पदभरती कमी करीत आहे. याबाबत महाराष्ट्र विधानसभा/ विधान परिषदेमध्ये पदवीधर शिक्षक आमदार, लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित करण्याची अपेक्षा होती; परंतु त्यांच्याकडून हे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे गेल्या ५ ते ७ वर्षांपासून आमच्यावर बेरोजगार राहण्याची पाळी आली आहे. प्राध्यापक पदांसाठी आवश्यक असलेली अर्हता प्राप्त करणारे अनेक विद्यार्थी अल्पभूधारक, भूमीहीन या वर्गातील असून, उच्च शिक्षण घेऊनही त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. ही बाब लक्षात घेऊन सहाय्यक प्राध्यापकाची भरती तात्काळ सुरू करावी, असे न केल्यास या पदांसाठी पात्र असलेल्या अनेक उमेदवारांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल, यात शंका नाही.