शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

सहायक प्राध्यापक पद भरती सुरू करावी !

By admin | Updated: July 17, 2017 02:32 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: उच्च शिक्षित पात्र उमेदवारांची शासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने २५ मे २०१७ रोजीच्या निर्णयानुसार २०१२ ते २०१७ दरम्यानच्या पदनिश्चितीनुसार व त्यापूर्वी रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया बंद झाली आहे. त्यामुळे या पदासाठी पात्र उमेदवार नोकरीपासून वंचित राहत असल्याने सहाय्यक प्राध्यापकांची पदभरती प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी या पदासाठी पात्र असलेल्या उच्चशिक्षित उमेदवारांकडून करण्यात आली आहे. याबाबत त्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरुवारी निवेदन सादर करून ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचविण्याची मागणीही करण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा, की राज्य शासनाने २५ मे २०१७ रोजी जारी केलेल्या निर्णयामुळे २०१२ ते २०१७ दरम्यानच्या पदनिश्चितीनुसार व त्यापूर्वी रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया बंद झाली आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी नेट, सेट, पीएचडी आदि शैक्षणिक अर्हता प्राप्त क रीत आहेत; परंतु त्या प्रमाणात युजीसीचे निर्देश असूनही शासनाच्या धोरणामुळे उच्च अर्हताप्राप्त उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. युजीसी किंवा विद्यापीठाने वेळोवेळी रिक्त पदे भरण्यासंदर्भात सूचित करुनही संबंधित संस्थाचालक त्यांच्या सुचनांचे पालन न करता रिक्त पदे भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र शासनही वेळोवेळी प्राध्यापक पदांच्या भरतीसह इतर महत्त्वाच्या पदांच्या भरतीत कपात करून वेळोवेळी पदभरती कमी करीत आहे. याबाबत महाराष्ट्र विधानसभा/ विधान परिषदेमध्ये पदवीधर शिक्षक आमदार, लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित करण्याची अपेक्षा होती; परंतु त्यांच्याकडून हे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे गेल्या ५ ते ७ वर्षांपासून आमच्यावर बेरोजगार राहण्याची पाळी आली आहे. प्राध्यापक पदांसाठी आवश्यक असलेली अर्हता प्राप्त करणारे अनेक विद्यार्थी अल्पभूधारक, भूमीहीन या वर्गातील असून, उच्च शिक्षण घेऊनही त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. ही बाब लक्षात घेऊन सहाय्यक प्राध्यापकाची भरती तात्काळ सुरू करावी, असे न केल्यास या पदांसाठी पात्र असलेल्या अनेक उमेदवारांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल, यात शंका नाही.