शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

रब्बीचे क्षेत्र घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 13:43 IST

वाशिम: यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १ आॅक्टोबरपर्यंत केवळ ७० टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे जलसाठे तळाला गेले असून, विहिरीही आटण्याच्या मार्गावर असल्याने रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  पुरेसे पाणी उपलब्ध असेल तरच, रब्बीची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृ षी अधिकाºयांनीही शेतकºयांना केले आहे. वाशिम जिल्ह्याचे वार्षिक ...

ठळक मुद्देअपुºया पावसाचा परिणाम कृषी विभागाकडून शेतकºयांना खबरदारीचे आवाहन 

वाशिम: यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १ आॅक्टोबरपर्यंत केवळ ७० टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे जलसाठे तळाला गेले असून, विहिरीही आटण्याच्या मार्गावर असल्याने रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  पुरेसे पाणी उपलब्ध असेल तरच, रब्बीची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृ षी अधिकाºयांनीही शेतकºयांना केले आहे. 

वाशिम जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७९८ असताना यंदा मात्र ५ आॅक्टोबरपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ७० पाऊस पडला. अल्प पावसामुळे प्रकल्पात जलसंचयच झाला नसून, सद्यस्थितीत ३३ प्रकल्पांत केवळ शुन्य टक्के जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांतील उपलब्ध उपयुक्त जलसाठा मिळून केवळ २४ टक्के जलसाठा उरला आहे. त्यामुळे यंदा सिंचन शेती अशक्य होणार असल्याने सिंचनावरच अवलंबून असलेला रब्बी हंगामातील क्षेत्र घटधार असल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र ८१ हजार हेक्टर असून, कृषी विभागाने यंदा १ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन केले आहे. त्यामध्ये गहू आणि हरभरा ाय पिकांचे क्षेत्र सर्वाधिक आहे.  गव्हाचे नियोंजित क्षेत्र ४५ हजार हेक्टर, तर हरभरा पिकाचे क्षेत्र २५ हजार हेक्टर आहे. त्याशिवाय रब्बी ज्वारी दीड हजार हेक्टर, करडई ४०० हेक्टर आणि मक्याचे क्षेत्र १०० हेक्टर आहे. यातील गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांना पाण्याची मोठी गरज असते; परंतु जलप्रकल्पांबरोबरच विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही खालावल्याने शेतकरी पिकांना पाणी कसे देणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. या वर्षीच्या अपुºया पर्जन्यमानामुळे जमीनीत पुरेसा ओलावा उपलब्ध नाही.  रब्बी हंगामामध्ये जमिनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत सिंचनाची सुविधा नसताना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते. ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी नसल्याने यंदा जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात ३० टक्क्याहून अधिक घट येण्याची शक्यता आहे.