शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीचे क्षेत्र घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 13:43 IST

वाशिम: यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १ आॅक्टोबरपर्यंत केवळ ७० टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे जलसाठे तळाला गेले असून, विहिरीही आटण्याच्या मार्गावर असल्याने रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  पुरेसे पाणी उपलब्ध असेल तरच, रब्बीची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृ षी अधिकाºयांनीही शेतकºयांना केले आहे. वाशिम जिल्ह्याचे वार्षिक ...

ठळक मुद्देअपुºया पावसाचा परिणाम कृषी विभागाकडून शेतकºयांना खबरदारीचे आवाहन 

वाशिम: यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १ आॅक्टोबरपर्यंत केवळ ७० टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे जलसाठे तळाला गेले असून, विहिरीही आटण्याच्या मार्गावर असल्याने रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  पुरेसे पाणी उपलब्ध असेल तरच, रब्बीची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृ षी अधिकाºयांनीही शेतकºयांना केले आहे. 

वाशिम जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७९८ असताना यंदा मात्र ५ आॅक्टोबरपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ७० पाऊस पडला. अल्प पावसामुळे प्रकल्पात जलसंचयच झाला नसून, सद्यस्थितीत ३३ प्रकल्पांत केवळ शुन्य टक्के जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांतील उपलब्ध उपयुक्त जलसाठा मिळून केवळ २४ टक्के जलसाठा उरला आहे. त्यामुळे यंदा सिंचन शेती अशक्य होणार असल्याने सिंचनावरच अवलंबून असलेला रब्बी हंगामातील क्षेत्र घटधार असल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र ८१ हजार हेक्टर असून, कृषी विभागाने यंदा १ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन केले आहे. त्यामध्ये गहू आणि हरभरा ाय पिकांचे क्षेत्र सर्वाधिक आहे.  गव्हाचे नियोंजित क्षेत्र ४५ हजार हेक्टर, तर हरभरा पिकाचे क्षेत्र २५ हजार हेक्टर आहे. त्याशिवाय रब्बी ज्वारी दीड हजार हेक्टर, करडई ४०० हेक्टर आणि मक्याचे क्षेत्र १०० हेक्टर आहे. यातील गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांना पाण्याची मोठी गरज असते; परंतु जलप्रकल्पांबरोबरच विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही खालावल्याने शेतकरी पिकांना पाणी कसे देणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. या वर्षीच्या अपुºया पर्जन्यमानामुळे जमीनीत पुरेसा ओलावा उपलब्ध नाही.  रब्बी हंगामामध्ये जमिनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत सिंचनाची सुविधा नसताना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते. ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी नसल्याने यंदा जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात ३० टक्क्याहून अधिक घट येण्याची शक्यता आहे.