शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात भुईमुगाचे क्षेत्रफळ दुप्पट

By admin | Updated: March 22, 2017 13:06 IST

जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहे.

वाशिम: पोषक वातावरण आणि मुबलक पाणीसाठ्याचा आधार असल्यामुळे जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहे. तथापि, इतर उन्हाळी पिकातील मुग आणि तीळाचे क्षेत्र मात्र मोठ्या प्रमाणात घटल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात गतवर्षी ३ हजार ३७४.५५ हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी झाली होती, तर यंदा तब्बल ८ हजार ४५२ हेक्टवर उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यात आली आहे. मागील तीन वर्षे शेतकऱ्यांना अवर्षण आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे उन्हाळी पिकेच काय, तर खरीप आणि रब्बी हंगामातही पेरणी क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले होते. यंदा पावसाने चांगली साथ दिली. त्यामुळे खरीप आणि रब्बीसह उन्हाळी पिकांचे क्षेत्रही वाढले. त्यात प्रामुख्याने उन्हाळी भुईमुग या पिकाचा उल्लेख करावा लागेल. पावसाचे प्रमाण अल्प असल्याने भूगर्भातील पाणी पातळी दीड मीटरने खालावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी आणि कूपनलिका आटल्या होत्या. त्यामुळे भुईमुगासारख्या पिकाची पेरणी करून अतिरिक्त जोखीम पत्करण्याचे शेतकऱ्यांनी टाळले. यंदा मात्र जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. यंदा जिल्ह्यात रब्बीच नव्हे, तर उन्हाळी पिक पेरणी क्षेत्रही वाढले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात उन्हाळी मका, तीळ, ज्वारी, सूर्यफूल आणि भुईमूग मिळून ४ हजार ७३६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यामध्ये मका ४७१ हेक्टर, सूर्यफुल २४, तीळ ४३.५० हेक्टर, मुग ३८५.५० हेक्टर, भुईमूग ३ हजार ३७४ हेक्टर आणि इतर पिके ४३७.९० हेक्टरवर पेरण्यात आली होती. आता या वर्षी केवळ भुईमुगाची पेरणीच ८ हजार ४५२ हेक्टरवर करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या एकूण उन्हाळी पिकांच्या क्षेत्रापेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे. यंदा उन्हाळी ज्वारी आणि उडिदाची पेरणीही शेतकऱ्यांनी केली आहे. यंदाच्या उन्हाळी पिकांत ज्वारी १४० हेक्टर, उन्हाळी मका १४० हेक्टर, उडिद १२२ हेक्टर, मूग ४३६ हेक्टर, तर भुईमूगाची पेरणी ८ हजार ४५२ हेक्टवर झाली आहे. मका, सुर्यफुलालादेखील पसंती नाहीमागील तीन वर्षे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने जलसाठा पुरेसा नसतानाही उन्हाळी मका या पिकाची पेरणी ४७१ हेक्टरवर झाली होती. ती यंदा केवळ १४० हेक्टवर क्षेत्रावर मर्यादित झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २४ हेक्टर क्षेत्रावर सुर्यफुलाची पेरणी केली होती; परंतु यंदा मात्र पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही केवळ एका हेक्टरवर सुर्यफुलाची पेरणी करण्यात आली आहे. मागील वर्षी ज्वारी आणि उडिदाची पेरणी शेतकऱ्यांनी केली नव्हती; परंतु यंदा मात्र ज्वारीची पेरणी १४० हेक्टर, तर उडिदाची पेरणी १२२ हेक्टरवर झाली आहे.