शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

शेतमजुरांना कामगार कायदा लागू करून कर्जमुक्त करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:23 IST

वाशिम: शेतमजूरांना कामगार कायदा लागू करुन त्यांची कर्जमुक्ती करण्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वात बुधवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र कामगार संघटनाजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतमजूरांना कामगार कायदा लागू करुन त्यांची कर्जमुक्ती करण्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वात बुधवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद केले की, जिल्हयासह महाराष्ट्रात असंघटीत क्षेत्रात मोडणारे शेतमजुर, हमाल, फेरीवाला, वृत्तपत्र विक्री करणारे, यंत्रमाग, विडी, हॉटेल, भाजीपाला व फळांची विक्री करणारा, रिक्षावाला टांगेवाला, बांधकाम कामगार, घरगुती, धुणेभांडी, मोलमजुरी, छपाई कामगार, पेंटरकाम, चहावाला, दुधवाला, थिएटर कामगार, भाजीपाला विक्रेत्यांबाबत मालकांकडून कामगार कायद्याचे पालन होत नाही. त्यामुळे या सर्व असंघटीत कामगार त्रस्त झाले आहेत. त्यामुळे २१ जून २0१७ पासून सोलापूर ते संपूर्ण महाराष्ट्रभर असंघटीत कष्टकरी कामगारांना कर्जमाफी द्या आणि त्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामगार बचाव संघर्ष यात्रा सुरु झाली आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून कामगारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व कामगारांची कर्जमाफी करणे, शेतमजूरांना कामगार कायदे लागु करणे, कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करणे, कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतन लागु करणे, त्यांना भविष्यनिर्वाह निधी देणे, विमा कायदा लागु करणे, अपघाती विमा लागु करणे, कामगारांसाठी शैक्षणिक, आर्थिक व आरोग्यविषयक योजना राबविणे, त्यांना मोफत बस प्रवास पास देणे व कामगारांना विनाव्याज बँकेकडून कर्ज देणे आदी मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देताना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी महाराज, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कव्हर, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, बाजार समिती उपसभापती सुरेश मापारी, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, कामगार सेनेचे उपाध्यक्ष गजाननराव देशमुख, बंडु शिंदे, विठ्ठल चौधरी आदिंची उपस्थिती होती.