शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांनी तातडीने अर्ज करावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:08 IST

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांनी याची नोंद घेऊन तातडीने अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे आवाहनअंतिम मुदत नऊ दिवसांवर४६ हजार शेतकर्‍यांची केवळ नाव नोंदणी!

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांनी याची नोंद घेऊन तातडीने अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ज्या शेतकर्‍यांनी केवळ नाव नोंदणी केली आहे, त्यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेल्याशिवाय त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याने संबंधित शेतकर्‍यांनीही ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून अर्ज भरला गेल्याची खात्री करावी, असेही जिल्हा प्रशासनाने मंगळवारी कळविले. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत स्तरावर आपले उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वप्रथम अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांची नाव नोंदणी करून घेण्यात येते. त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरले जातात. ऑनलाइन अर्ज भरताना संबंधित शेतकरी पती-पत्नी दोघेही, त्यांचे आधार कार्ड, मोबाइल क्रमांकासह उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच कर्जदार शेतकर्‍यांचे कर्ज खाते क्रमांक, बचत खाते क्रमांक आदी माहिती अर्जामध्ये भरणे बंधनकारक आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यामध्ये काही अडचणी असल्यास आपले सरकार सेवा केंद्राचे संजय यादव (भ्रमणध्वनी क्रमांक : ९३७३३७५४६७), ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्राचे सुनील देशमुख (भ्रमणध्वनी क्रमांक : ७५८८६७८४७४), महा ई-सेवा केंद्राचे सागर भुतडा (भ्रमणध्वनी क्रमांक : ९८५0३७१६७१) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

४६ हजार शेतकर्‍यांची केवळ नाव नोंदणी!जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५९ हजार १३0 शेतकर्‍यांनी विविध केंद्रांवर नाव नोंदणी केलेली आहे. यापैकी १ लाख १३ हजार १३४ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नाव नोंदणी झाल्यानंतरही आवश्यक कागदपत्रे नसल्याने किंवा शेतकरी पती-पत्नी हजर नसल्याने उर्वरित ४५ हजार ९९६ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेलेले नाहीत. या शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेल्याशिवाय त्यांना कर्जमाफी अथवा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नसल्याने संबंधित शेतकर्‍यांनी त्वरित नजीकच्या महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपले ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच सर्व शेतकर्‍यांनी आपला अर्ज परिपूर्ण भरला गेल्याची खात्री करून घ्यावी, तसेच अर्ज भरल्याची पावती प्राप्त करून घ्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे. -