शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांनी तातडीने अर्ज करावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:08 IST

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांनी याची नोंद घेऊन तातडीने अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे आवाहनअंतिम मुदत नऊ दिवसांवर४६ हजार शेतकर्‍यांची केवळ नाव नोंदणी!

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांनी याची नोंद घेऊन तातडीने अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ज्या शेतकर्‍यांनी केवळ नाव नोंदणी केली आहे, त्यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेल्याशिवाय त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याने संबंधित शेतकर्‍यांनीही ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून अर्ज भरला गेल्याची खात्री करावी, असेही जिल्हा प्रशासनाने मंगळवारी कळविले. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत स्तरावर आपले उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वप्रथम अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांची नाव नोंदणी करून घेण्यात येते. त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरले जातात. ऑनलाइन अर्ज भरताना संबंधित शेतकरी पती-पत्नी दोघेही, त्यांचे आधार कार्ड, मोबाइल क्रमांकासह उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच कर्जदार शेतकर्‍यांचे कर्ज खाते क्रमांक, बचत खाते क्रमांक आदी माहिती अर्जामध्ये भरणे बंधनकारक आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यामध्ये काही अडचणी असल्यास आपले सरकार सेवा केंद्राचे संजय यादव (भ्रमणध्वनी क्रमांक : ९३७३३७५४६७), ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्राचे सुनील देशमुख (भ्रमणध्वनी क्रमांक : ७५८८६७८४७४), महा ई-सेवा केंद्राचे सागर भुतडा (भ्रमणध्वनी क्रमांक : ९८५0३७१६७१) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

४६ हजार शेतकर्‍यांची केवळ नाव नोंदणी!जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५९ हजार १३0 शेतकर्‍यांनी विविध केंद्रांवर नाव नोंदणी केलेली आहे. यापैकी १ लाख १३ हजार १३४ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नाव नोंदणी झाल्यानंतरही आवश्यक कागदपत्रे नसल्याने किंवा शेतकरी पती-पत्नी हजर नसल्याने उर्वरित ४५ हजार ९९६ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेलेले नाहीत. या शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेल्याशिवाय त्यांना कर्जमाफी अथवा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नसल्याने संबंधित शेतकर्‍यांनी त्वरित नजीकच्या महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपले ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच सर्व शेतकर्‍यांनी आपला अर्ज परिपूर्ण भरला गेल्याची खात्री करून घ्यावी, तसेच अर्ज भरल्याची पावती प्राप्त करून घ्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे. -