शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांनी तातडीने अर्ज करावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:08 IST

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांनी याची नोंद घेऊन तातडीने अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे आवाहनअंतिम मुदत नऊ दिवसांवर४६ हजार शेतकर्‍यांची केवळ नाव नोंदणी!

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांनी याची नोंद घेऊन तातडीने अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ज्या शेतकर्‍यांनी केवळ नाव नोंदणी केली आहे, त्यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेल्याशिवाय त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याने संबंधित शेतकर्‍यांनीही ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून अर्ज भरला गेल्याची खात्री करावी, असेही जिल्हा प्रशासनाने मंगळवारी कळविले. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत स्तरावर आपले उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वप्रथम अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांची नाव नोंदणी करून घेण्यात येते. त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरले जातात. ऑनलाइन अर्ज भरताना संबंधित शेतकरी पती-पत्नी दोघेही, त्यांचे आधार कार्ड, मोबाइल क्रमांकासह उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच कर्जदार शेतकर्‍यांचे कर्ज खाते क्रमांक, बचत खाते क्रमांक आदी माहिती अर्जामध्ये भरणे बंधनकारक आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यामध्ये काही अडचणी असल्यास आपले सरकार सेवा केंद्राचे संजय यादव (भ्रमणध्वनी क्रमांक : ९३७३३७५४६७), ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्राचे सुनील देशमुख (भ्रमणध्वनी क्रमांक : ७५८८६७८४७४), महा ई-सेवा केंद्राचे सागर भुतडा (भ्रमणध्वनी क्रमांक : ९८५0३७१६७१) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

४६ हजार शेतकर्‍यांची केवळ नाव नोंदणी!जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५९ हजार १३0 शेतकर्‍यांनी विविध केंद्रांवर नाव नोंदणी केलेली आहे. यापैकी १ लाख १३ हजार १३४ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नाव नोंदणी झाल्यानंतरही आवश्यक कागदपत्रे नसल्याने किंवा शेतकरी पती-पत्नी हजर नसल्याने उर्वरित ४५ हजार ९९६ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेलेले नाहीत. या शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेल्याशिवाय त्यांना कर्जमाफी अथवा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नसल्याने संबंधित शेतकर्‍यांनी त्वरित नजीकच्या महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपले ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच सर्व शेतकर्‍यांनी आपला अर्ज परिपूर्ण भरला गेल्याची खात्री करून घ्यावी, तसेच अर्ज भरल्याची पावती प्राप्त करून घ्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे. -