शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चिंता वाढली; १७ दिवसांत ४२ कोरोनाबाधितांचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:40 IST

वाशिम : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा वाढत आहे. गत १७ दिवसांत ४२ जणांना मृत्यूने गाठले असून, ...

वाशिम : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा वाढत आहे. गत १७ दिवसांत ४२ जणांना मृत्यूने गाठले असून, अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत. वेळीच उपचार मिळावे, म्हणून कुणीही अंगावर दुखणे काढू नये, वेळीच चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल रोजी आढळला होता. ऑक्टोबर, २०२० ते जानेवारी, २०२१ या काळात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढउतार दिसून आले. फेब्रुवारी, २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून, यामध्ये जनजीवन विस्कळीत होत आहे. मृत्यूसंख्याही वाढत असल्याने आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गत १७ दिवसांत एकूण ४२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने प्रशासनही हादरले आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, त्या तुलनेत आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होत नसल्याने संभाव्य विदारक परिस्थितीची चाहूल लागत आहे. ६० वर्षांवरील कोरोनाबळींची संख्या अधिक असल्याने, ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे ठरत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, दमा व अन्य अतिजोखीम गटातील रुग्णांना कोरोना संसर्ग झाला आणि वेळीच निदान झाले नाही, उपचारास विलंब झाला, तर मृत्यूही ओढवतो, अशी परिस्थिती आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

बॉक्स..

वेळीच निदान करा... सुरक्षित राहा!

जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने सर्दी, ताप, खोकला यासह कोरोनासदृश लक्षणे दिसून येताच, तातडीने चाचणी करावी. कोरोना विषाणू संसर्गाचे वेळीच निदान झाले, तर लवकर उपचार मिळू शकतात. अंगावर दुखणे काढले, तर उपचारास विलंब होतो. परिणामी, रुग्णाची प्रकृती गंभीर होऊन एखाद्या वेळी मृत्यूही ओढावू शकतो. त्यामुळे वेळीच निदान व्हावे, म्हणून कोरोना चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

०००००

शनिवारीही आठ जणांचा मृत्यू

शनिवार, १७ एप्रिल रोजी प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात आणखी आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्युसत्र सुरू असल्यामुळे नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे.

००००

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अलीकडच्या काळात मृत्यूची संख्याही वाढत असल्याने, प्रत्येकाने कोरोनापासून बचाव म्हणून कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनीही सहकार्य करून प्रशासनाला सहकार्य करावे.

- डॉ.मधुकर राठोड,

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

००००

गत सात दिवसांतील मृत्यू

११ एप्रिल ०४

१२ एप्रिल ०३

१३ एप्रिल ००

१४ एप्रिल ००

१५ एप्रिल ०५

१६ एप्रिल ०५

१७ एप्रिल ०८