शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

अँट्रॉसिटी रद्द नव्हे, बदल करण्याची मागणी!

By admin | Updated: September 24, 2016 02:15 IST

वाशिम येथे सकल मराठा समाजातील युवतींची पत्रकार परिषदेत माहिती.

वाशिम, दि. २३- 'मराठा क्रांती मोर्चा'हा कोणत्याही जाती, धर्म, व्यक्ती, संस्था, पोलीस, प्रशासन किंवा शासनाच्या विरोधात नसून, अत्याचार व नराधम प्रवृत्तीच्या विरोधात आहे. काही जण मोर्चाबाबत गैरसमज पसरवित आहेत, त्या अफवांना बळी पडू नका, तसेच मोर्चा हा अँट्रॉसिटी रद्द करण्यासाठी नसून, त्याचा होत असलेला गैरवापर टाळण्याकरिता त्यामध्ये बदल करण्याच्या मागणीसाठी असल्याची माहिती सकल मराठा समाजातील युवतींनी पत्रकार परिषदेत दिली.स्थानिक तुर्के कॉम्प्लेक्सस्थित सकल मराठा मूक मोर्चा कार्यालयात २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सकल मराठा समाजातील युवतींनी मोर्चासंदर्भात पसरविल्या जाणार्‍या गैरसमजाबाबत व नियोजनाबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी मोर्चातील प्रमुख मागण्यांबाबत सांगितले, की कोपर्डी येथील मुलीवर झालेला अमानुष अत्याचार आणि अमानवीय पद्धतीने झालेल्या हत्येच्या निषेधार्थ समाजमनाच्या तीव्र भावना शांततेने आणि संयमाने व्यक्त करण्यासाठी आहे. यापुढे कोणीही असे कृत्य करू नये, त्याला धडकी भरावी, यासाठी हा मोर्चा आहे. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना ताबडतोब फाशीची शिक्षा व्हावी, मराठा आरक्षण लागू करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, नाशिक येथील बलात्कार प्रकरणातीलही आरोपींना ताबडतोब शिक्षा व्हावी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्या या मोर्चाच्या आहेत. या मोर्चाच्या दिवशी कोणत्याच प्रकारचे शहर बंद ठेवण्याचे आवाहनसुद्धा आयोजकांनी केलेले नाही. स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून जे मोर्चात सहभागी होतील त्यांचे स्वागतच आहे. मोर्चाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले असून, सकल मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती, महिला, युवतींनी यामध्ये सहभागी होऊन अपप्रवृत्तीबद्दल रोष दाखविण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजातील महिला, युवती व पुरुषांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता. मोर्चा नियोजनाबाबत..सकल मराठा समाजाचा मोर्चा हा पूर्णपणे शांततेने, आपसातही न बोलता काढायचा आहे. मोर्चात सर्वात आधी महिला, तरुणी, विद्यार्थिनी असतील. त्यांच्यामागे सर्व पुरुष अशी रचना आहे. मोर्चा हा संपूर्ण समाजाचा असल्याने कोणीही नेता किंवा प्रमुख नाही. मोर्चामध्ये एकजूट दाखविण्यासाठी सर्व बांधवांनी आपल्या संपूर्ण परिवारासह व नातेवाइकांसह उपस्थित रहावे. विशेष म्हणजे मोर्चादरम्यान कोणालाही अडथळा होऊ नये, याकरिता मोर्चादरम्यान अंत्ययात्रा, रुग्णवाहिका, शववाहिका, अत्यावश्यक सेवा, पोलीस आणि प्रशासनाची वाहने यांना प्राधान्याने विनाअडथळा मार्ग मोकळा करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील चोहोबाजूंनी मोर्चातील गर्दी वाढण्याची शक्यता पाहता सर्व ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.मोर्चा यशस्वी करण्याकरिता व देखरेखीसाठी सकल मराठा समाजातील युवकांच्या २५ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मोर्चासाठी २0 हजार फलक, २0 हजार काळे झेंडे, प्रत्येकाला पुरतील एवढे काळया फितीचे नियोजन आहे. मोर्चात २0 रुग्णवाहिका, १0 महिलांसाठी स्वच्छतागृह, ७ हजार पुरुष व एक हजार महिला स्वयंसेवक, २0 लाख पाण्याचे पाऊच, मोर्चा मार्गावर २२५ ध्वनिक्षेपक, १0 स्क्रिन असून, मोर्चाचे नेतृत्व मुली करणार आहेत.