शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

अँट्रॉसिटी रद्द नव्हे, बदल करण्याची मागणी!

By admin | Updated: September 24, 2016 02:15 IST

वाशिम येथे सकल मराठा समाजातील युवतींची पत्रकार परिषदेत माहिती.

वाशिम, दि. २३- 'मराठा क्रांती मोर्चा'हा कोणत्याही जाती, धर्म, व्यक्ती, संस्था, पोलीस, प्रशासन किंवा शासनाच्या विरोधात नसून, अत्याचार व नराधम प्रवृत्तीच्या विरोधात आहे. काही जण मोर्चाबाबत गैरसमज पसरवित आहेत, त्या अफवांना बळी पडू नका, तसेच मोर्चा हा अँट्रॉसिटी रद्द करण्यासाठी नसून, त्याचा होत असलेला गैरवापर टाळण्याकरिता त्यामध्ये बदल करण्याच्या मागणीसाठी असल्याची माहिती सकल मराठा समाजातील युवतींनी पत्रकार परिषदेत दिली.स्थानिक तुर्के कॉम्प्लेक्सस्थित सकल मराठा मूक मोर्चा कार्यालयात २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सकल मराठा समाजातील युवतींनी मोर्चासंदर्भात पसरविल्या जाणार्‍या गैरसमजाबाबत व नियोजनाबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी मोर्चातील प्रमुख मागण्यांबाबत सांगितले, की कोपर्डी येथील मुलीवर झालेला अमानुष अत्याचार आणि अमानवीय पद्धतीने झालेल्या हत्येच्या निषेधार्थ समाजमनाच्या तीव्र भावना शांततेने आणि संयमाने व्यक्त करण्यासाठी आहे. यापुढे कोणीही असे कृत्य करू नये, त्याला धडकी भरावी, यासाठी हा मोर्चा आहे. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना ताबडतोब फाशीची शिक्षा व्हावी, मराठा आरक्षण लागू करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, नाशिक येथील बलात्कार प्रकरणातीलही आरोपींना ताबडतोब शिक्षा व्हावी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्या या मोर्चाच्या आहेत. या मोर्चाच्या दिवशी कोणत्याच प्रकारचे शहर बंद ठेवण्याचे आवाहनसुद्धा आयोजकांनी केलेले नाही. स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून जे मोर्चात सहभागी होतील त्यांचे स्वागतच आहे. मोर्चाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले असून, सकल मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती, महिला, युवतींनी यामध्ये सहभागी होऊन अपप्रवृत्तीबद्दल रोष दाखविण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजातील महिला, युवती व पुरुषांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता. मोर्चा नियोजनाबाबत..सकल मराठा समाजाचा मोर्चा हा पूर्णपणे शांततेने, आपसातही न बोलता काढायचा आहे. मोर्चात सर्वात आधी महिला, तरुणी, विद्यार्थिनी असतील. त्यांच्यामागे सर्व पुरुष अशी रचना आहे. मोर्चा हा संपूर्ण समाजाचा असल्याने कोणीही नेता किंवा प्रमुख नाही. मोर्चामध्ये एकजूट दाखविण्यासाठी सर्व बांधवांनी आपल्या संपूर्ण परिवारासह व नातेवाइकांसह उपस्थित रहावे. विशेष म्हणजे मोर्चादरम्यान कोणालाही अडथळा होऊ नये, याकरिता मोर्चादरम्यान अंत्ययात्रा, रुग्णवाहिका, शववाहिका, अत्यावश्यक सेवा, पोलीस आणि प्रशासनाची वाहने यांना प्राधान्याने विनाअडथळा मार्ग मोकळा करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील चोहोबाजूंनी मोर्चातील गर्दी वाढण्याची शक्यता पाहता सर्व ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.मोर्चा यशस्वी करण्याकरिता व देखरेखीसाठी सकल मराठा समाजातील युवकांच्या २५ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मोर्चासाठी २0 हजार फलक, २0 हजार काळे झेंडे, प्रत्येकाला पुरतील एवढे काळया फितीचे नियोजन आहे. मोर्चात २0 रुग्णवाहिका, १0 महिलांसाठी स्वच्छतागृह, ७ हजार पुरुष व एक हजार महिला स्वयंसेवक, २0 लाख पाण्याचे पाऊच, मोर्चा मार्गावर २२५ ध्वनिक्षेपक, १0 स्क्रिन असून, मोर्चाचे नेतृत्व मुली करणार आहेत.