शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

अँट्रॉसिटी रद्द नव्हे, बदल करण्याची मागणी!

By admin | Updated: September 24, 2016 02:15 IST

वाशिम येथे सकल मराठा समाजातील युवतींची पत्रकार परिषदेत माहिती.

वाशिम, दि. २३- 'मराठा क्रांती मोर्चा'हा कोणत्याही जाती, धर्म, व्यक्ती, संस्था, पोलीस, प्रशासन किंवा शासनाच्या विरोधात नसून, अत्याचार व नराधम प्रवृत्तीच्या विरोधात आहे. काही जण मोर्चाबाबत गैरसमज पसरवित आहेत, त्या अफवांना बळी पडू नका, तसेच मोर्चा हा अँट्रॉसिटी रद्द करण्यासाठी नसून, त्याचा होत असलेला गैरवापर टाळण्याकरिता त्यामध्ये बदल करण्याच्या मागणीसाठी असल्याची माहिती सकल मराठा समाजातील युवतींनी पत्रकार परिषदेत दिली.स्थानिक तुर्के कॉम्प्लेक्सस्थित सकल मराठा मूक मोर्चा कार्यालयात २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सकल मराठा समाजातील युवतींनी मोर्चासंदर्भात पसरविल्या जाणार्‍या गैरसमजाबाबत व नियोजनाबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी मोर्चातील प्रमुख मागण्यांबाबत सांगितले, की कोपर्डी येथील मुलीवर झालेला अमानुष अत्याचार आणि अमानवीय पद्धतीने झालेल्या हत्येच्या निषेधार्थ समाजमनाच्या तीव्र भावना शांततेने आणि संयमाने व्यक्त करण्यासाठी आहे. यापुढे कोणीही असे कृत्य करू नये, त्याला धडकी भरावी, यासाठी हा मोर्चा आहे. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना ताबडतोब फाशीची शिक्षा व्हावी, मराठा आरक्षण लागू करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, नाशिक येथील बलात्कार प्रकरणातीलही आरोपींना ताबडतोब शिक्षा व्हावी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्या या मोर्चाच्या आहेत. या मोर्चाच्या दिवशी कोणत्याच प्रकारचे शहर बंद ठेवण्याचे आवाहनसुद्धा आयोजकांनी केलेले नाही. स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून जे मोर्चात सहभागी होतील त्यांचे स्वागतच आहे. मोर्चाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले असून, सकल मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती, महिला, युवतींनी यामध्ये सहभागी होऊन अपप्रवृत्तीबद्दल रोष दाखविण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजातील महिला, युवती व पुरुषांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता. मोर्चा नियोजनाबाबत..सकल मराठा समाजाचा मोर्चा हा पूर्णपणे शांततेने, आपसातही न बोलता काढायचा आहे. मोर्चात सर्वात आधी महिला, तरुणी, विद्यार्थिनी असतील. त्यांच्यामागे सर्व पुरुष अशी रचना आहे. मोर्चा हा संपूर्ण समाजाचा असल्याने कोणीही नेता किंवा प्रमुख नाही. मोर्चामध्ये एकजूट दाखविण्यासाठी सर्व बांधवांनी आपल्या संपूर्ण परिवारासह व नातेवाइकांसह उपस्थित रहावे. विशेष म्हणजे मोर्चादरम्यान कोणालाही अडथळा होऊ नये, याकरिता मोर्चादरम्यान अंत्ययात्रा, रुग्णवाहिका, शववाहिका, अत्यावश्यक सेवा, पोलीस आणि प्रशासनाची वाहने यांना प्राधान्याने विनाअडथळा मार्ग मोकळा करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील चोहोबाजूंनी मोर्चातील गर्दी वाढण्याची शक्यता पाहता सर्व ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.मोर्चा यशस्वी करण्याकरिता व देखरेखीसाठी सकल मराठा समाजातील युवकांच्या २५ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मोर्चासाठी २0 हजार फलक, २0 हजार काळे झेंडे, प्रत्येकाला पुरतील एवढे काळया फितीचे नियोजन आहे. मोर्चात २0 रुग्णवाहिका, १0 महिलांसाठी स्वच्छतागृह, ७ हजार पुरुष व एक हजार महिला स्वयंसेवक, २0 लाख पाण्याचे पाऊच, मोर्चा मार्गावर २२५ ध्वनिक्षेपक, १0 स्क्रिन असून, मोर्चाचे नेतृत्व मुली करणार आहेत.