शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

‘वार्षिक सवलत कार्ड’ बंद करणे अयोग्य!

By admin | Updated: May 1, 2017 02:09 IST

लोकमत परिचर्चेतील सूर : निर्णयाचा फटका एसटी महामंडळालाच!

वाशिम : एसटी महामंडळ तोट्यात असतानाच, प्रवासी आणि उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी प्रवाशांसाठी १३ वर्षांपूर्वी सुरू केलेली वार्षिक सवलत कार्ड योजना २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली. या योजनेत प्रवाशांना प्रवासात १० टक्के सवलत मिळत होती. मात्र, ही योजना २२ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसटीचा वर्षाला २ ते ३ कोटींचा महसूल बुडणार असून, या योजनेचा फायदा घेणाऱ्या प्रवाशांचेही नुकसान होणार आहे. याबाबत प्रवाशांचे मत जाणून घेण्यासाठी लोकमतच्या स्थानिक कार्यालयात रविवारी परिचर्चा घेण्यात आली. त्यामध्ये काही जणांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे तर काही जणांनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले. या परिचर्चेत आशिष जैन, अनिल चव्हाण, एम. व्ही. डवरे आणि मनोज भोयर या विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सहभाग घेऊन आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला. २प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने २००३ सालापासून वार्षिक सवलत कार्ड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एक वर्ष कालावधीकरिता २०० रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होते. हे कार्ड असल्यास प्रवाशाला प्रवासी तिकिटात १० टक्के सवलत देण्यात येत होती. त्यामुळे हजारो प्रवासी या योजनेचा फायदा घेऊन एसटीनेच प्रवास करीत होते. त्यामुळे एसटीला फायदाच होता. आता ही योजना बंद झाल्यामुळे एसटीकडील प्रवाशांची संख्या कमी होईल. - एम. व्ही. डवरे, आश्रम शाळा संघ प्रदेशाध्यक्षवार्षिक सवलत कार्ड योजनेंतर्गत २०० रुपये मुल्य आकारण्यात येत होते. हे कार्ड असल्यास प्रवाशाला १० टक्के सवलत देण्यात येत होती. या सेवेचा प्रवाशांंना चांगलाच फायदा होत होता, तर एसटीच्या तिजोरीत वर्षाला २ ते ३ कोटी रुपयांची भर पडत होती. त्यामुळे ही योजना बंद करणे चुकच आहे. - मनोज भोयरवार्षिक सवलत कार्ड योजनेत २०० रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होते. प्रवाशाला प्रवासी तिकिटात १० टक्के सवलत देण्यात येत होती. त्यामुळे एसटी आणि प्रवाशांनाही फायदाच होता. ही बाब खरी आहे; परंतु ही योजना बंद केल्याने एसटीचे नुकसान होईल, असे म्हणता येणार नाही. कारण एसटी इतर योजनांच्या माध्यमातून आपले उत्पन्न वाढवू शकते, असे आपल्याला वाटते.-अनिल चव्हाणवार्षिक सवलत कार्ड योजनेत २०० रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होतेप्रवाशाला प्रवासी तिकिटात १० टक्के सवलत देण्यात येत होती. त्यामुळे एसटीला फायदाच होता. हजारो प्रवासी एसटीचा आधार घेत होते. ही योजना बंद केल्याने एसटीचेच नुकसान आहे. - आशिष जैन, कारंजा लाड