शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

‘वार्षिक सवलत कार्ड’ बंद करणे अयोग्य!

By admin | Updated: May 1, 2017 02:09 IST

लोकमत परिचर्चेतील सूर : निर्णयाचा फटका एसटी महामंडळालाच!

वाशिम : एसटी महामंडळ तोट्यात असतानाच, प्रवासी आणि उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी प्रवाशांसाठी १३ वर्षांपूर्वी सुरू केलेली वार्षिक सवलत कार्ड योजना २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली. या योजनेत प्रवाशांना प्रवासात १० टक्के सवलत मिळत होती. मात्र, ही योजना २२ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसटीचा वर्षाला २ ते ३ कोटींचा महसूल बुडणार असून, या योजनेचा फायदा घेणाऱ्या प्रवाशांचेही नुकसान होणार आहे. याबाबत प्रवाशांचे मत जाणून घेण्यासाठी लोकमतच्या स्थानिक कार्यालयात रविवारी परिचर्चा घेण्यात आली. त्यामध्ये काही जणांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे तर काही जणांनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले. या परिचर्चेत आशिष जैन, अनिल चव्हाण, एम. व्ही. डवरे आणि मनोज भोयर या विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सहभाग घेऊन आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला. २प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने २००३ सालापासून वार्षिक सवलत कार्ड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एक वर्ष कालावधीकरिता २०० रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होते. हे कार्ड असल्यास प्रवाशाला प्रवासी तिकिटात १० टक्के सवलत देण्यात येत होती. त्यामुळे हजारो प्रवासी या योजनेचा फायदा घेऊन एसटीनेच प्रवास करीत होते. त्यामुळे एसटीला फायदाच होता. आता ही योजना बंद झाल्यामुळे एसटीकडील प्रवाशांची संख्या कमी होईल. - एम. व्ही. डवरे, आश्रम शाळा संघ प्रदेशाध्यक्षवार्षिक सवलत कार्ड योजनेंतर्गत २०० रुपये मुल्य आकारण्यात येत होते. हे कार्ड असल्यास प्रवाशाला १० टक्के सवलत देण्यात येत होती. या सेवेचा प्रवाशांंना चांगलाच फायदा होत होता, तर एसटीच्या तिजोरीत वर्षाला २ ते ३ कोटी रुपयांची भर पडत होती. त्यामुळे ही योजना बंद करणे चुकच आहे. - मनोज भोयरवार्षिक सवलत कार्ड योजनेत २०० रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होते. प्रवाशाला प्रवासी तिकिटात १० टक्के सवलत देण्यात येत होती. त्यामुळे एसटी आणि प्रवाशांनाही फायदाच होता. ही बाब खरी आहे; परंतु ही योजना बंद केल्याने एसटीचे नुकसान होईल, असे म्हणता येणार नाही. कारण एसटी इतर योजनांच्या माध्यमातून आपले उत्पन्न वाढवू शकते, असे आपल्याला वाटते.-अनिल चव्हाणवार्षिक सवलत कार्ड योजनेत २०० रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होतेप्रवाशाला प्रवासी तिकिटात १० टक्के सवलत देण्यात येत होती. त्यामुळे एसटीला फायदाच होता. हजारो प्रवासी एसटीचा आधार घेत होते. ही योजना बंद केल्याने एसटीचेच नुकसान आहे. - आशिष जैन, कारंजा लाड