शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी ठाकरे बंधू मोर्चास्थळी निघाले; आदित्य-अमित ठाकरेही सोबत आले
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
4
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
5
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
6
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
7
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
8
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
9
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
10
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
11
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
12
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
13
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
14
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
15
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
16
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
17
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
18
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
19
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
20
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?

‘वार्षिक सवलत कार्ड’ बंद करणे अयोग्य!

By admin | Updated: May 1, 2017 02:09 IST

लोकमत परिचर्चेतील सूर : निर्णयाचा फटका एसटी महामंडळालाच!

वाशिम : एसटी महामंडळ तोट्यात असतानाच, प्रवासी आणि उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी प्रवाशांसाठी १३ वर्षांपूर्वी सुरू केलेली वार्षिक सवलत कार्ड योजना २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली. या योजनेत प्रवाशांना प्रवासात १० टक्के सवलत मिळत होती. मात्र, ही योजना २२ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसटीचा वर्षाला २ ते ३ कोटींचा महसूल बुडणार असून, या योजनेचा फायदा घेणाऱ्या प्रवाशांचेही नुकसान होणार आहे. याबाबत प्रवाशांचे मत जाणून घेण्यासाठी लोकमतच्या स्थानिक कार्यालयात रविवारी परिचर्चा घेण्यात आली. त्यामध्ये काही जणांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे तर काही जणांनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले. या परिचर्चेत आशिष जैन, अनिल चव्हाण, एम. व्ही. डवरे आणि मनोज भोयर या विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सहभाग घेऊन आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला. २प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने २००३ सालापासून वार्षिक सवलत कार्ड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एक वर्ष कालावधीकरिता २०० रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होते. हे कार्ड असल्यास प्रवाशाला प्रवासी तिकिटात १० टक्के सवलत देण्यात येत होती. त्यामुळे हजारो प्रवासी या योजनेचा फायदा घेऊन एसटीनेच प्रवास करीत होते. त्यामुळे एसटीला फायदाच होता. आता ही योजना बंद झाल्यामुळे एसटीकडील प्रवाशांची संख्या कमी होईल. - एम. व्ही. डवरे, आश्रम शाळा संघ प्रदेशाध्यक्षवार्षिक सवलत कार्ड योजनेंतर्गत २०० रुपये मुल्य आकारण्यात येत होते. हे कार्ड असल्यास प्रवाशाला १० टक्के सवलत देण्यात येत होती. या सेवेचा प्रवाशांंना चांगलाच फायदा होत होता, तर एसटीच्या तिजोरीत वर्षाला २ ते ३ कोटी रुपयांची भर पडत होती. त्यामुळे ही योजना बंद करणे चुकच आहे. - मनोज भोयरवार्षिक सवलत कार्ड योजनेत २०० रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होते. प्रवाशाला प्रवासी तिकिटात १० टक्के सवलत देण्यात येत होती. त्यामुळे एसटी आणि प्रवाशांनाही फायदाच होता. ही बाब खरी आहे; परंतु ही योजना बंद केल्याने एसटीचे नुकसान होईल, असे म्हणता येणार नाही. कारण एसटी इतर योजनांच्या माध्यमातून आपले उत्पन्न वाढवू शकते, असे आपल्याला वाटते.-अनिल चव्हाणवार्षिक सवलत कार्ड योजनेत २०० रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होतेप्रवाशाला प्रवासी तिकिटात १० टक्के सवलत देण्यात येत होती. त्यामुळे एसटीला फायदाच होता. हजारो प्रवासी एसटीचा आधार घेत होते. ही योजना बंद केल्याने एसटीचेच नुकसान आहे. - आशिष जैन, कारंजा लाड