शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

ग्राम सोनखास ठरतेय प्रती आळंदी!

By admin | Updated: August 23, 2016 23:38 IST

२00 वर्षांंपासून हरिनाम सप्ताहाची परंपरा : वाशिम जिल्हय़ातील ज्ञानेश्‍वराचे एकमेव मंदिर.

शिखरचंद बागरेचा वाशिम, दि. २३: गत २00 वर्षांपासून नजिकच्या सोनखास येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या सप्ताहाची परंपरा अविरतपणे सुरू असून आळंदी येथील कार्यक्रम बारमास येथे राबविण्यात येतात. त्यामुळे हे मंदिर प्रति आळंदी म्हणून ओळखले जात आहे, अशी माहिती श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष नारायणराव राजाराम गोरे यांनी मंगळवार, २३ ऑगस्ट रोजी दिली. संत ज्ञानेश्‍वर माउलीचा पुण्यतिथी सोहळा दरवर्षी उत्साहात आयोजित करण्यात येतो. यावेळी पंचक्रोशितील सुमारे २५ हजार भाविक मंडळी याठिकाणी येवून भक्तिभावाने माउलींच्या चरणी नतमस्तक होतात.सोनखास या गावातील एका माडीवर सुमारे २00 वर्षांंपूर्वीपासून संत ज्ञानेश्‍वर माउलीचा सप्ताह साजरा होत असे. सन १७७९ मध्ये नेहमीप्रमाणे सप्ताह सुरु असताना अतवृष्टीमुळे भजन किर्तनात अडथळे निर्माण झाले. परिणामी, संत ज्ञानेश्‍वर माउलीचे मंदिर स्थापण्याची संकल्पना समोर आली. तत्कालीन विधान परिषद सदस्य व अखिल भारतीय वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष बाळासाहेब भारदे, अकोला येथील तत्कालीन नामांकित डॉक्टर द.रा. भागवत व ह.भ.प. सुखदेव महाराज डिग्रसकर यांच्याहस्ते सन १९८४ मध्ये संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. आळंदी येथील दैनंदिन कार्यक्रम सोनखास येथे राबविण्याचा पायंडा पडला. सद्या मंदिराची व्यवस्था अध्यक्ष नारायण राजाराम गोरे, उपाध्यक्ष संजय बळीराम गोरे, सचिव विठ्ठल भागवत गोरे, कोषाध्यक्ष प्रकाश देवमन गोरे, मार्गदर्शक बाबजी मारोती गोरे, सदस्य शामसुंदर किसन गोरे, रामेश्‍वर सोपान गोरे, जिजेबा नवृत्ती गोरे, सुर्यकांत गोविंद गोरे, रामभाउ वामन गोरे, विनय मोतीलाल सोमाणी, कचरुलाल नारायणदास भांगडीया व देवराव नथ्थुजी इढोळे यांच्या खांद्यावर आहे.बांधकामादरम्यान सापडली मुर्तीवाशिम येथील शिवचौकातील रहिवाशी दिवंगत डॉ. परशराम दत्तात्रय वानखेडे यांनी त्यांच्या मालकीच्या जागेत घराचे बांधकाम करताना संत ज्ञानेश्‍वर माउलीची पखानाची मूर्ती सापडल्यामुळे घरातच छोटेसे व सुंदर आकर्षक संत ज्ञानेश्‍वर माउलीचे मंदिर बांधलेले आहे. सन १९९५ मध्ये या मंदिराची स्थापना डॉ.परशराम वानखेडे यांनी डॉ. यु.म. पठाण यांच्या हस्ते केली, हे विशेष. याशिवाय वाशिम शहरात केकतउमरा मार्गावरील ईदगाह परिसरात सन २0११ मध्ये सहा एकरात भुखंड पाडून त्याला संत ज्ञानेश्‍वर नगर असे नाव रेणुकादास केशवराव निरखी यांनी दिले होते.