शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम सोनखास ठरतेय प्रती आळंदी!

By admin | Updated: August 23, 2016 23:38 IST

२00 वर्षांंपासून हरिनाम सप्ताहाची परंपरा : वाशिम जिल्हय़ातील ज्ञानेश्‍वराचे एकमेव मंदिर.

शिखरचंद बागरेचा वाशिम, दि. २३: गत २00 वर्षांपासून नजिकच्या सोनखास येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या सप्ताहाची परंपरा अविरतपणे सुरू असून आळंदी येथील कार्यक्रम बारमास येथे राबविण्यात येतात. त्यामुळे हे मंदिर प्रति आळंदी म्हणून ओळखले जात आहे, अशी माहिती श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष नारायणराव राजाराम गोरे यांनी मंगळवार, २३ ऑगस्ट रोजी दिली. संत ज्ञानेश्‍वर माउलीचा पुण्यतिथी सोहळा दरवर्षी उत्साहात आयोजित करण्यात येतो. यावेळी पंचक्रोशितील सुमारे २५ हजार भाविक मंडळी याठिकाणी येवून भक्तिभावाने माउलींच्या चरणी नतमस्तक होतात.सोनखास या गावातील एका माडीवर सुमारे २00 वर्षांंपूर्वीपासून संत ज्ञानेश्‍वर माउलीचा सप्ताह साजरा होत असे. सन १७७९ मध्ये नेहमीप्रमाणे सप्ताह सुरु असताना अतवृष्टीमुळे भजन किर्तनात अडथळे निर्माण झाले. परिणामी, संत ज्ञानेश्‍वर माउलीचे मंदिर स्थापण्याची संकल्पना समोर आली. तत्कालीन विधान परिषद सदस्य व अखिल भारतीय वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष बाळासाहेब भारदे, अकोला येथील तत्कालीन नामांकित डॉक्टर द.रा. भागवत व ह.भ.प. सुखदेव महाराज डिग्रसकर यांच्याहस्ते सन १९८४ मध्ये संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. आळंदी येथील दैनंदिन कार्यक्रम सोनखास येथे राबविण्याचा पायंडा पडला. सद्या मंदिराची व्यवस्था अध्यक्ष नारायण राजाराम गोरे, उपाध्यक्ष संजय बळीराम गोरे, सचिव विठ्ठल भागवत गोरे, कोषाध्यक्ष प्रकाश देवमन गोरे, मार्गदर्शक बाबजी मारोती गोरे, सदस्य शामसुंदर किसन गोरे, रामेश्‍वर सोपान गोरे, जिजेबा नवृत्ती गोरे, सुर्यकांत गोविंद गोरे, रामभाउ वामन गोरे, विनय मोतीलाल सोमाणी, कचरुलाल नारायणदास भांगडीया व देवराव नथ्थुजी इढोळे यांच्या खांद्यावर आहे.बांधकामादरम्यान सापडली मुर्तीवाशिम येथील शिवचौकातील रहिवाशी दिवंगत डॉ. परशराम दत्तात्रय वानखेडे यांनी त्यांच्या मालकीच्या जागेत घराचे बांधकाम करताना संत ज्ञानेश्‍वर माउलीची पखानाची मूर्ती सापडल्यामुळे घरातच छोटेसे व सुंदर आकर्षक संत ज्ञानेश्‍वर माउलीचे मंदिर बांधलेले आहे. सन १९९५ मध्ये या मंदिराची स्थापना डॉ.परशराम वानखेडे यांनी डॉ. यु.म. पठाण यांच्या हस्ते केली, हे विशेष. याशिवाय वाशिम शहरात केकतउमरा मार्गावरील ईदगाह परिसरात सन २0११ मध्ये सहा एकरात भुखंड पाडून त्याला संत ज्ञानेश्‍वर नगर असे नाव रेणुकादास केशवराव निरखी यांनी दिले होते.