वाशिम : उन्हाळय़ाच्या सुट्टीत शालेय पोषण आहार वाटपाला अनेक शाळांनी कोलदांडा दिला. लोकम तच्या वतीने २५ मे रोजी जिल्हय़ातील १२१ शाळांमध्ये 'स्टिंग ऑपरेशन' करण्यात आले. यामध्ये ४९ शाळा कुलूपबंद व १९ शाळांमध्ये पोषण आहाराचा पुरवठा करण्यात न आल्याने ६७ शाळांमध्ये िखचडीच शिजली नसल्याचे आढळून आले. ज्या ठिकाणी खिचडीचे वाटप करण्यात आले तेथे विद्या र्थ्यांची उपस्थिती पटसंख्येच्या तुलनेत अत्यल्प आढळून आली. तसेच आठ शाळेचे शिक्षक गैरहजर आढळून आल्याचे लोकमतच्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णमध्ये उघडकीस आले. उन्हाळय़ाच्या सुट्टीतही खिचडी वाटप सुरू करण्याच्या आदेशाला जिल्हय़ातील जिल्हा परिषद शाळांसह इ तर शाळांनी कोलदांडा दिल्याने व काही ठिकाणी पोषण आहाराचा पुरवठाच नसल्याने विद्यार्थ्यांंंना शालेय पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. लोकमतने या संदर्भात २५ मे रोजी केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णमध्ये अनेक शाळांमध्ये खिचडीचे वाटपच करण्यात येत नसल्याचे वास्तव्य समोर आले. वाशिम तालुक्यातील १४ शाळांमध्ये 'स्टिंग ऑपरेशन' करण्यात आले यामध्ये जिल्हा परिषदेच्या जांभरुण, वांगी, धानोरा, नागठाणा, कोंडाळा, सुराळा, चिखली सुर्वे, उमराळा, अनसिंगसह काटा येथील तीन शाळांचा व अनसिंग येथील एका उर्दू शाळेचा समावेश आहे. 'स्टिंग ऑपरेशन' केलेल्या शाळांपैकी काटा येथील २, सुराळा, चिखली व उमराळा येथील शाळा कुलूपबंद आढळून आल्यात. तर ङ्म्रीगिरी व अनसिंग उर्दू शाळा उघडी असतानासुद्धा शालेय पोषण आहारच नसल्याने खिचडीचे वाटप करण्यात आले नाही
शालेय पोषण आहार वाटपाला कोलदांडा
By admin | Updated: May 26, 2015 02:10 IST