शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

जिल्हाभरात लोककलावंतांचा ‘गजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 02:08 IST

वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, २ व ३ नोव्हेंबर रोजी लोककलावंतांच्या माध्यमातून शौचालय बांधकामाचा गजर करण्यात आला. ‘उघड्यावरील शौचवारी थांबवा आणि शौचालयाचा वापर करा’ असे आवाहन लोककलावंतांनी केले. 

ठळक मुद्देविशेष कुटुंब संपर्क अभियान शौचालय बांधकामांसंदर्भात जनजागृती मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, २ व ३ नोव्हेंबर रोजी लोककलावंतांच्या माध्यमातून शौचालय बांधकामाचा गजर करण्यात आला. ‘उघड्यावरील शौचवारी थांबवा आणि शौचालयाचा वापर करा’ असे आवाहन लोककलावंतांनी केले. जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विशेष कुटुंब संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सामूहिक माध्यमातून गावोगावी भेटी देऊन शौचालय नसलेल्या कुटुंबीयांशी संवाद साधणे आणि शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन करणे, असा हा उपक्रम सुरू आहे. मंगरूळपीर तालुक्यातील कोळंबी येथे लोककलावंतांच्या माध्यमातून गजर करण्यात आला. चिमुकल्यांनीदेखील विविध घोषणा देत शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रिसोड तालुक्यातील हराळ, आसेगाव पेन, वनोजा, व्याड, रिठद, चिखली या गावांना भेटी देण्यात आल्या. शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरी भेटी देऊन शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शौचालय नसलेल्या कुटुंबाच्या घरावर लाल रंगाचे (खतरा/धोका) स्टिकर लावण्यात आले. संबंधित कुटुंबाकडून शौचालय बांधकाम करण्याचे आश्‍वासन घेण्यात आले. मालेगाव तालुक्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्या नेतृत्वात आणि जि.प. व पं.स. सदस्य, स्वच्छ भारत मिशनच्या चमूने पांगरी कुटे, डोंगरकिन्ही, मुंगळा, मेडशी यासह विविध गावांना भेटी देत, शौचालय न बांधलेल्या कुटुंबांशी चर्चा केली. उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, जि.प. सदस्य विकास गवळी, मो. इमदाद शेख, गट विकास अधिकारी थोरात, पं.स. सदस्य विजय अंभोरे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एम. खान, उपअभियंता नीलेश राठोड, स्वच्छ भारत मिशनचे विजय नागे, पुष्पलता अफुणे,  प्रदीप सावळकर, शंकर आंबेकर, अभिजित दुधाटे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.महागाव :  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत (ग्रामीण) गाव हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प महागाव येथील ग्रामपंचायत व नागरिकांनी केला आहे. सभापती छाया सुनील पाटील यांच्या हस्ते काही शौचालयाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी भारसाकळे, नवनिर्वाचित सरपंच अनिल मवाळ, नवनिर्वाचित सदस्य रेखा सदाशिव लांडे, अशोक जमधाडे, नामदेव गायकवाड, ज्ञानेश्‍वर सरकटे, विलास हुंबाड, सविता गजानन जमधाडे, स्वाती विष्णू बदर, चंद्रकला दिनेश मवाळ, उषा जालींदर जमधाडे तसेच भगवान गायकवाड, रामदास बदर, बबन बदर, शंकर हुंबाड, हिंमत हुंबाड, राजू काळे, मोतीराम लांडे, श्रीकिसन काळे, गजानन मवाळ, मनोज मवाळ, भीमराव जमधाडे, मोहन जमधाडे, जनार्धन जमधाडे, रमेश जमधाडे, भोजराज जमधाडे, समाधान जमधाडे, वसंता निळशे, नंदकुमार धाबे, भगवान जमधाडे, गणेश ठाकरे, केशव जाधव यांच्यासह महिला व पुरुषांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस आदींनी गाव स्तरावर कुटुंबीयांशी संवाद साधण्याची मोहीम उघडून जनजागृती करण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान