शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

भजन, कीर्तनासह टाळ-मृदंगाचा गजर हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:47 IST

काेराेनाचा परिणाम, : श्रावण महिन्यातही धार्मिक कार्यक्रमाला ब्रेक मालेगाव : भारतीय संस्कृतीत श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पावसाळ्याच्या ...

काेराेनाचा परिणाम, : श्रावण महिन्यातही धार्मिक कार्यक्रमाला ब्रेक

मालेगाव : भारतीय संस्कृतीत श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पावसाळ्याच्या ऋतूत येणाऱ्या या महिन्यात जिवती अमावस्यापासून पोळा सणापर्यंत विविध सणांची रेलचेल असते. मंदिरात भजन, कीर्तन, अभिषेक, मंत्रोपचाराचा जयघोष सुरू होतो. परंतु मागील दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातल्याने ही परंपरा खंडित झाली आहे. श्रावण महिन्यात गावागावात कीर्तन, प्रवचन, हरिपाठ या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. परंतु गावोगावी निनादणारा भजन, कीर्तनाचा व टाळ-मृदंगाचा गजर हरपल्याचे दिसून येत आहे.

वारकरी संप्रदायाची भगवी पताका घेऊन अखंड हरिनाम अनेक वर्षांची परंपरा मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीत लुप्त झाली आहे. कीर्तनकार पखवाजवादक, वीणकरी, टाळकरी, भजनकरी श्रावण महिन्यातही मंदिराची दारे बंद असल्यामुळे सर्वच धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने सर्वच व्यवसाय ठप्प असल्याने या भाविकांनाही घरीच बसण्याची वेळ आली आहे. मागील वर्षीही श्रावण महिन्यात मंदिराचे द्वार बंद असल्याने भाविकही दुरूनच नमस्कार करीत आहेत. शिवाय गर्दी टाळून काही भाविक पुजापाठ करीत आहेत. मंदिरातही श्रावणमासानिमित्ताने गर्दी टाळून कार्यक्रम होत असले तरी पूर्वीसारखे भाविकही आता मंदिर बंद असल्याने पुजापाठ करण्यासाठी दिसत नाही. त्यामुळे भजन, कीर्तनाचा व टाळ-मृदंगाचा गजर हरपल्याचे चित्र दिसायला लागले आहे.

..................

हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात; परंतु यावर्षी कोरोनामुळे सर्व बंद आहे. शासनाने धार्मिक कार्यक्रम करण्याची बंदी उठवली पाहिजे.

ज्ञानेश्वर वाढणकर,

वारकरी संप्रदाय, मालेगाव