शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना पक्षीप्रेमाचा लळा लावणारा ध्येयवेडा शिक्षक

By admin | Updated: September 4, 2014 22:58 IST

कामरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गोपाल खाडे यांनी विद्यार्थ्यांना पक्षीप्रेमाच कृतीतून शिकविले.

वाशिम : गत ९ वर्षाआधी पडलेल्या भिषण दुष्काळात अन्न-पाण्याविना होरपळणारे जीव, छोटे प्राणी व पक्षी बघून मन हेलावून गेलेल्या कामरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गोपाल खाडे यांनी सर्वप्रथम आपल्या घरी व नंतर शाळेत पक्ष्यांसाठी नियोजनबध्द विद्यार्थ्यांनासोबत घेवून पाणवठे व अन्नछत्र तयार केले, ते आजतागायत सुरू आहे. आजच्या घडीला शिक्षक खाडे यांना याकडे लक्ष देण्याची गरज राहीलेली नाही, कारण विद्यार्थ्यांना पक्षीप्रेमाचा एवढा जबरदस्त लढा खाडे यांनी लावला की विद्यार्थ्यांचा दिनचर्या पक्ष्यांच्या व्यवस्थेपासून सुरू होत आहे.गोपाल खाडे यांनी पक्ष्यांसाठी केलेल्या सुविधांचा दररोज शेकडो पशु-पक्षी लाभ घेवून आपली तहान व भूक भागवित आहेत.वाढते प्रदूषण, मोबाईलच्या ध्वनीलहरी, विषारी किटकनाशक, सिमेंटच्या घरांमुळे चिमण्या व इतर छोटे पक्षी दुरापास्त होण्याच्या मार्गावर आहेत. यात कामरगाव येथील शिक्षक गोपाल खाडे यांनी तत्कालीन विद्यार्थ्यांसोबत पशु-पक्ष्यांच्या तृष्णा व क्षुधा प्राप्तीसाठी सुरू केलेल पानवठे व अन्नछत्र तयार करून आपल्या आगळया-चेगळया भुतदयेचा परिचय दिला. त्या विद्यार्थ्यांचा उपक्रम गत ९ वर्षांपासून शाळेतील नवनविन विद्यार्थी मोठया आनंदाने राबवित आहेत. विद्यार्थी शाळा सोडून गेल्यानंतरही तो आपल्या घरी सुध्दा असा उपक्रम राबवित असल्याचे शिक्षक खाडे यांनी सांगितले. वातावरणात बदल होत असला तरी उन्हाळयात विदर्भाचे तापमान जास्त असल्याने छोटे पक्षी, प्राणी यांचे जीवन दुष्कर होते, मोठया जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या जातात. मात्र छोटे छोटे पशु - पक्षी दुष्काळात होरपळून निघतात. पावसाळयात घरटे पाणी लागणार नाही अशा ठिकाणी उभारल्या जातात. वाशिम जिल्हयातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात शिक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गत ९ वर्षापूर्वी पडलेल्या दुष्काळात होरपळणारे जीव, छोटे प्राणी व पक्षी बधितले. या लहान बालकांचे संवेदनशिल मन कळवळले व त्यांनी विद्यालयाचे शिक्षक गोपाल खाडे, प्रा. रमेश वरघट यांच्याशी चर्चा केली. गोपाल खाडे यांनी या विद्यार्थ्यांना घेवून एक छोटेखानी कार्यशाळेची आखणी केली. या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना वेस्टेज पाण्याच्या बॉटल्स, प्लास्टिक बरण्या, दोरी, सुतळी, तार व इतर साहित्य गोळा करून विद्यार्थ्यांना ह्यबर्ड फिडरह्ण तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. शिक्षकांनी स्वखर्चातून मातीची भांडी विकत आणली. याव्दारे जागोजागी पानवटे लावलीत आज येथे २00 च्या वर पानवटे असून शेकडो पक्षी येतात व आपली तहान व भूक भागवितात. तसेच पशु पक्ष्यांना लागणारे खाद्य सुध्दा लटकविलेल्या बरणीत ठेवल्याने आज येथे कावळा, बुलबुल, मैना, चिमणी, सूर्यपक्षी, खारूताई सारखे छोटे प्राणी येवू लागले. विद्यार्थ्यांंनी पक्षी व खारू ताईसाठी कडधान्य, बिस्कीटे बरण्यामध्ये ठेवायला सुरूवात केली आज कोणालाही न घाबरता पशु-पक्षी येथे बिनधास्त आपले घर समजून ते खातांना दिसून येतात. हा उपक्रम सुरू करण्याकरीता मुख्याध्यापक मधूसूदन बांडे, शिक्षक वसंतराव चव्हाण यांच्यासह शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व ते आजही लाभत आहे. विशेष म्हणजे गोपाल खाडे उत्कृष्ट चित्रकार, विज्ञान विषयाचे अभ्यासक असणारे व सामाजिक बांधीलकी जपणारे शिक्षक आहेत.