शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

४० हजारांवर कृषिपंपांना ‘आॅटो स्विच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 02:58 IST

महावितरणचे प्रयत्न निष्फळ

ठळक मुद्दे वीज उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील तब्बल ४० हजारांच्या आसपास कृषिपंपांना ‘आॅटो स्विच’ बसविण्यात आलेले असून, यामुळे वीज उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असल्याने रोहित्र  जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे ‘आॅटो स्विच’ हटविण्यासंदर्भात महावितरणने मे-जून २०१७ या महिन्यांमध्ये विशेष मोहीम राबविली. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला  नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत महावितरणच्या कृषिपंपधारक ग्राहकांची संख्या ५१ हजार २६८ आहे. त्यापैकी जवळपास ५० हजार शेतकºयांनी शेतांमधील मोटारपंपांना ‘आॅटो  स्विच’ बसविले आहेत, त्यापैकी महावितरणला प्रयत्नांती १० हजार आॅटो स्विच हटविण्यात यश मिळाले; परंतु ४० हजार पंपांसंबंधीचा हा प्रश्न अद्याप कायम आहे. तथापि, भारनियमनासह तांत्रिक अडचणींमुळे खंडित होणारा विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर मोटारपंपाजवळ न जाताच ‘रिमोट’द्वारे पंप सुरू करता यावा, यासाठी शेतकºयांनी हा  प्रकार अवलंबिला आहे. मात्र, केवळ काही क्षणाच्या त्रासापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मोटारपंपांना बसविण्यात आलेले ‘आॅटो स्विच’ अत्यंत धोकादायक ठरत आहेत. सध्या ग्रामीण भागात ठरावीक कालावधीत विजेचे भारनियमन केले जात आहे. यादरम्यान वीज पुरवठा सुरळीत होताच एकाचवेळी सर्व संबंधित शेतकरी रिमोटद्वारे शेतांमधील मोटारपंप सुरू करतात. यामुळे वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त ताण येण्यासोबतच विजेची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. याशिवाय रोहित्र जळण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. शेतांमधील  मोटारपंपही नादुरुस्त होत असल्याने संबंधित शेतकºयांनी आपापल्या मोटारपंपाचे ‘आॅटो स्विच’ काढून टाकावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.

कृषिपंपधारक शेतकºयांकडे विजेची २७० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. ती वसूल होणे कठीण झाले असतानाच सुमारे ४० हजार कृषिपंपांना बसविण्यात आलेले ‘आॅटो स्विच’ हटविण्याचे मोठे आव्हान महावितरणला पेलावे लागत आहे. - पी.के.चव्हाण, कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम