शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

रिसोडात दुपारी शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:42 IST

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. संचारबंदी लागू असतानाही, अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने परिस्थिती जैसे थे ...

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. संचारबंदी लागू असतानाही, अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने परिस्थिती जैसे थे होती. जिल्हा प्रशासनाने १८ एप्रिल रोजी कठोर पाऊल उचलत संचारबंदीच्या नियमात बदल करीत सुधारित आदेश जारी केला. या आदेशानुसार मेडिकल व दवाखाने वगळता अत्यावश्यक सेवेतील उर्वरित सर्व दुकाने सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत केवळ चार तासांसाठी सुरू ठेवता येणार होती. मात्र, राज्य शासनाने सुधारित आदेश जारी करून दवाखाने, मेडिकल्स वगळता उर्वरित अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी मंगळवार, २० एप्रिल रोजी संचारबंदीचा आणखी सुधारित आदेश जारी केला. यानुसार दवाखाने, मेडिकल्स २४ तास सुरू राहणार असून अत्यावश्यक सेवेतील उर्वरित दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू राहत आहेत. ११ वाजतानंतर शहरातील सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकान बंद ठेवण्याचे आदेशाने रिसोड शहरात २१ एप्रिल रोजी दुपारी सर्वत्र मार्केट बंद झाल्यामुळे तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर कारवाईचे आदेश आल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांनी घरात राहणे पसंत केले. त्यामुळे रिसोड शहरात दुपारी सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले.