शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

तीन महिन्यानंतर पुन्हा समाधान शिबिर !

By admin | Updated: June 27, 2017 13:51 IST

तीन महिन्यानंतर पुन्हा समाधान शिबिर घेणार असल्याचे वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जाहिर केले.

वाशिम - नागरिकांच्या तक्रारींचे आॅन दी स्पॉट निराकरण करण्यासाठी तीन महिन्यानंतर पुन्हा समाधान शिबिर घेणार असल्याचे वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जाहिर केले. त्यानुसार जिल्हा प्रशासनातर्फे यापुढे तीन महिन्याच्या कालावधीत समाधान शिबिराचे आयोजन तीन उपविभागीय महसूल स्तरावर केले जाणार आहे.महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्ह्यात तीनही उपविभागस्तरावर शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस समाधान शिबिर घेण्यात आले. या  शिबिरांमध्ये जवळपास ९०० तक्रारींचे निवारण करण्यात आले. या शिबिरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत होते. त्यामुळे यापुढे प्रत्येक तीन महिन्याला समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री राठोड यांनी रविवारी जाहिर करून टाकले होते. सर्व शासकीय विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना एकत्र आणून नागरिकांच्या जास्तीत जास्त तक्रारींचा जलद गतीने निपटारा करण्यास यापुढेही प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार यापुढे तीन महिन्याने समाधान शिबिर घेतले जाणार आहे. सदर शिबिर घेण्यापूर्वी नागरिकांना तक्रारी, समस्या सादर करण्याचे आवाहन केले जाणार आहे.