शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

चावडी वाचनातून निवडणुकीची गावे बाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:09 IST

वाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी  योजनेंतर्गत  शेतकर्‍यांनी अर्ज सादर केले आहेत. या योजनेसाठी  ते पात्र आहेत किंवा नाही, तसेच कोणी वंचित राहिले काय,  याची शहानिशा करण्यासाठी गावपातळीवर ‘चावडी वाचन’  प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तथापि, ज्या ग्रामपंचायतींची  निवडणूक होणार आहे, त्या ग्रामपंचायतींमधील गावांत ही  प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हा  प्रशासनाकडून मंगळवारी प्राप्त   झाली. 

ठळक मुद्देकर्जमाफी अर्ज पडताळणी प्रक्रिया गावपातळीवर पथक नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी  योजनेंतर्गत  शेतकर्‍यांनी अर्ज सादर केले आहेत. या योजनेसाठी  ते पात्र आहेत किंवा नाही, तसेच कोणी वंचित राहिले काय,  याची शहानिशा करण्यासाठी गावपातळीवर ‘चावडी वाचन’  प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तथापि, ज्या ग्रामपंचायतींची  निवडणूक होणार आहे, त्या ग्रामपंचायतींमधील गावांत ही  प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हा  प्रशासनाकडून मंगळवारी प्राप्त   झाली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत  राज्यातील शेतकर्‍यांना आर्थिक मदत म्हणून दीड लाख रुपयां पर्यंतची कर्जमाफी, तसेच  २५ हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर  अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ  घेण्यासाठी २२ सप्टेंबर या अंतिम मुदतीपर्यंत वाशिम जिल्ह्या तील २.३७ लाख शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली; परंतु  त्यामधील केवळ १.२८ लाख शेतकर्‍यांचेच अर्ज ‘अपलोड’  झाले, तर कर्जमाफी प्रक्रियेतील अटी व शर्तींमध्ये बसू न  शकल्यामुळेच अखेरच्या टप्प्यात सुमारे १ लाख शेतकर्‍यांचे  अर्ज बाद ठरले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली  आहे. आता ज्या शेतकर्‍यांचे अर्ज अपलोड झाले आहेत, ते सर्व  शासनाच्या निकषानुसार पात्र आहेत की नाहीत, तसेच काही  पात्र शेतकरी अर्ज सादर करण्यापासून वंचित राहिले आहेत  काय, याची शहानिशा करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने चावडी  वाचन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी तहसीलदारांच्या  मार्गदर्शनात गाव पातळीवर तलाठी, कृषी सहायक आणि  गटसचिवाचा समावेश असलेले पथक नियुक्त करण्यात येणार  आहे. हे पथक गावात ग्रामसभा आयोजित करून त्यामध्ये शे तकर्‍यांना कर्जमाफीसाठी अर्ज सादर करणार्‍या शेतकर्‍यांची  यादी वाचून दाखवित. त्यांच्याकडून आक्षेप नोंदवून घेणार आहे.  यामध्येच कर्जमाफीसाठी कोणी अपात्र आहे काय, याची पड ताळणी करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २७३ ग्राम पंचायतींची निवडणूक येत्या ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.  त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या कक्षेत येणार्‍या गावांत, ही प्रक्रिया  राबविली जाणार नाही. निवडणूक आयोगाने तसे निर्देश दिले  असून, केवळ निवडणूक नसलेल्या गावांतच ही चावडी वाचन  प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी  मंगळवारी दिली. 

अशी असेल चावडी वाचन प्रक्रिया चावडी वाचनात गावातून आलेल्या अर्जांची यादी एका  संचिकेमध्ये लावण्यासह या यादीतील अर्जदार योजनेस पात्र  आहेत की नाही, त्याची पडताळणी होईल, तसेच संबंधित  अर्जदारांनी इतर बँकेसोबतच त्या गावातील विविध कार्यकारी  संस्थेकडून कर्ज घेतले आहे काय, याची खातरजमा संबंधित  संस्थेकडून केली जाईल व त्याप्रमाणे अर्जदाराच्या यादीत  उल्लेख नसल्यास अशा अर्जदाराच्या नावासमोर त्यांचे संस् थेकडील कर्ज खाते क्रमांक व थकीत रक्कम नमूद करण्यात  येईल. गावपातळीवरील माहितीच्या आधारे यादीत संबंधित  अर्जदाराच्या नावासमोर वस्तुस्थिती दर्शविणारे शेरे नमूद  करण्यासह पात्र, अपात्रतेसंबंधित उपलब्ध पुराव्यांची प्रत त्या  संचिकेमध्ये लावण्यात येईल आणि तो पुरावा या संचिकेमध्ये  कोणत्या पानावर आहे, याचा उल्लेख अर्जदाराच्या  नावासमोरील रकान्यात करण्यात येईल.