शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

चावडी वाचनातून निवडणुकीची गावे बाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:09 IST

वाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी  योजनेंतर्गत  शेतकर्‍यांनी अर्ज सादर केले आहेत. या योजनेसाठी  ते पात्र आहेत किंवा नाही, तसेच कोणी वंचित राहिले काय,  याची शहानिशा करण्यासाठी गावपातळीवर ‘चावडी वाचन’  प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तथापि, ज्या ग्रामपंचायतींची  निवडणूक होणार आहे, त्या ग्रामपंचायतींमधील गावांत ही  प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हा  प्रशासनाकडून मंगळवारी प्राप्त   झाली. 

ठळक मुद्देकर्जमाफी अर्ज पडताळणी प्रक्रिया गावपातळीवर पथक नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी  योजनेंतर्गत  शेतकर्‍यांनी अर्ज सादर केले आहेत. या योजनेसाठी  ते पात्र आहेत किंवा नाही, तसेच कोणी वंचित राहिले काय,  याची शहानिशा करण्यासाठी गावपातळीवर ‘चावडी वाचन’  प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तथापि, ज्या ग्रामपंचायतींची  निवडणूक होणार आहे, त्या ग्रामपंचायतींमधील गावांत ही  प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हा  प्रशासनाकडून मंगळवारी प्राप्त   झाली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत  राज्यातील शेतकर्‍यांना आर्थिक मदत म्हणून दीड लाख रुपयां पर्यंतची कर्जमाफी, तसेच  २५ हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर  अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ  घेण्यासाठी २२ सप्टेंबर या अंतिम मुदतीपर्यंत वाशिम जिल्ह्या तील २.३७ लाख शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली; परंतु  त्यामधील केवळ १.२८ लाख शेतकर्‍यांचेच अर्ज ‘अपलोड’  झाले, तर कर्जमाफी प्रक्रियेतील अटी व शर्तींमध्ये बसू न  शकल्यामुळेच अखेरच्या टप्प्यात सुमारे १ लाख शेतकर्‍यांचे  अर्ज बाद ठरले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली  आहे. आता ज्या शेतकर्‍यांचे अर्ज अपलोड झाले आहेत, ते सर्व  शासनाच्या निकषानुसार पात्र आहेत की नाहीत, तसेच काही  पात्र शेतकरी अर्ज सादर करण्यापासून वंचित राहिले आहेत  काय, याची शहानिशा करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने चावडी  वाचन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी तहसीलदारांच्या  मार्गदर्शनात गाव पातळीवर तलाठी, कृषी सहायक आणि  गटसचिवाचा समावेश असलेले पथक नियुक्त करण्यात येणार  आहे. हे पथक गावात ग्रामसभा आयोजित करून त्यामध्ये शे तकर्‍यांना कर्जमाफीसाठी अर्ज सादर करणार्‍या शेतकर्‍यांची  यादी वाचून दाखवित. त्यांच्याकडून आक्षेप नोंदवून घेणार आहे.  यामध्येच कर्जमाफीसाठी कोणी अपात्र आहे काय, याची पड ताळणी करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २७३ ग्राम पंचायतींची निवडणूक येत्या ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.  त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या कक्षेत येणार्‍या गावांत, ही प्रक्रिया  राबविली जाणार नाही. निवडणूक आयोगाने तसे निर्देश दिले  असून, केवळ निवडणूक नसलेल्या गावांतच ही चावडी वाचन  प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी  मंगळवारी दिली. 

अशी असेल चावडी वाचन प्रक्रिया चावडी वाचनात गावातून आलेल्या अर्जांची यादी एका  संचिकेमध्ये लावण्यासह या यादीतील अर्जदार योजनेस पात्र  आहेत की नाही, त्याची पडताळणी होईल, तसेच संबंधित  अर्जदारांनी इतर बँकेसोबतच त्या गावातील विविध कार्यकारी  संस्थेकडून कर्ज घेतले आहे काय, याची खातरजमा संबंधित  संस्थेकडून केली जाईल व त्याप्रमाणे अर्जदाराच्या यादीत  उल्लेख नसल्यास अशा अर्जदाराच्या नावासमोर त्यांचे संस् थेकडील कर्ज खाते क्रमांक व थकीत रक्कम नमूद करण्यात  येईल. गावपातळीवरील माहितीच्या आधारे यादीत संबंधित  अर्जदाराच्या नावासमोर वस्तुस्थिती दर्शविणारे शेरे नमूद  करण्यासह पात्र, अपात्रतेसंबंधित उपलब्ध पुराव्यांची प्रत त्या  संचिकेमध्ये लावण्यात येईल आणि तो पुरावा या संचिकेमध्ये  कोणत्या पानावर आहे, याचा उल्लेख अर्जदाराच्या  नावासमोरील रकान्यात करण्यात येईल.