शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीनंतर आढळतेय सोयाबीनमध्ये भेसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST

इंझोरी: सततच्या पावसासह विविध नैसर्गिक आपत्तीने सोयाबीनचे पीक संकटात असतानाच आता या पिकाच्या बियाण्यांतही भेसळ असल्याचे शेंगा परिपक्व झाल्यानंतर ...

इंझोरी: सततच्या पावसासह विविध नैसर्गिक आपत्तीने सोयाबीनचे पीक संकटात असतानाच आता या पिकाच्या बियाण्यांतही भेसळ असल्याचे शेंगा परिपक्व झाल्यानंतर केलेल्या पाहणीत शेतकऱ्यांना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले असून, या संदर्भात तक्रार केल्यानंतर कृषी विभागाचे पथक, कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी पाहणीही केली. त्यातही या पिकात भेसळयुक्त झाडे आढळून आली आहेत.

जिल्ह्यातील शेतकरी यंदा विविध नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त झाले आहेत. अतिवृष्टी, सततचा पाऊस, अवर्षण आदिमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात आता सोयाबीनच्या बियाण्यांत भेसळ असल्याचे झाडांच्या पाहणीतून शेतकऱ्यांना आढळून आले आहे. इंझोरी येथील शेतकऱ्यांनी कारंजा येथील एका कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेल्या नामांकित कंपनीच्या बियाण्यांची यंदा पेरणी केली होती. त्यात भेसळ दिसल्याने इंझोरीतील शेतकरी गोपाल बळीराम पायघन, गणेश हळदे, संतोष काळेकर, गजानन ढोक आणि डिंगाबर राऊत या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी किशोर सोनटक्के, सत्यकाम मकासरे यांच्यासह कृषी विभागाचे इतर अधिकारी आणि कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी पाहणी केली. त्या पाहणीनुसार सोयाबीन पिकात ७५ टक्के भेसळ असल्याचे आढळून आले आहे.

--------------

२४ एकरात आढळून आला प्रकार

इंझोरी येथील शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे चांगले उगवले, परंतु आता या पिकाला लागलेल्या शेंगा आणि झाडांचे प्रकार वेगळे दिसत असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली, या तक्रारीनुसार पथकाने पाहणी केली असता २४ एकरात हा प्रकार आढळला आहे.

-------------

७५ टक्के भेसळयुक्त झाडे

इंझोरीतील पाच शेतकऱ्यांनी मूळ ज्या सोयाबीन वाणाचे बियाणे खरेदी करून शेतात पेरणी केली. त्या वाणाऐवजी इतर सोयाबीन वाणाची ७५ टक्के झाडे त्यांच्या शेतात उगवल्याचे कृषी विभागाचे अधिकारी आणि कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना आढळून आली आहेत.

०००००००००००००

कोट: यंदा कारंजातील एका कृषी सेवा केंद्रातून नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी करून चार एकरात पेरणी केली. आता शेंगा परिपक्व झाल्यानंतर निरीक्षण केले असता. त्यात भेसळयुक्त झाडे आढळले. याची नुकसान भरपाई मिळावी.

-गोपाल पायघन,

शेतकरी, इंझाेरी

०००००००००००००

कोट: कारंजातील एका कृषी सेवा केंद्रातून नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी करून सहा एकरात पेरणी केली. हे बियाणे चांगले उगवले, परंतु शेंगा परिपक्व झाल्यानंतर निरीक्षण केले असता. त्यात भेसळयुक्त झाडे आढळले. याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली आहे.

-गजानन ढोक,

शेतकरी, इंझाेरी