शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

पाणीटंचाईच्या उपाय योजनांवर प्रशासनाचा भर

By admin | Updated: March 20, 2017 19:20 IST

रिसोड तालुक्यात ४७ गावांत संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ४३.७४ लाख रुपये खर्चाच्या उपाय योजना प्रस्तावित आहेत. 

जिल्ह्यातील स्थिती: पाच तालुक्यातील २२० गावांसाठी १.८७ कोटींच्या योजना वाशिम: मागील वर्षी जोरदार पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने तालुका व जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाणीटंचाईच्या उपाय योजनांवर भर दिला जात आहे. एकट्या रिसोड तालुक्यात ४७ गावांत संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ४३.७४ लाख रुपये खर्चाच्या उपाय योजना प्रस्तावित आहेत. जिल्ह्यात गत पावसाळ्यात जोरदार पाऊस पडला; परंतु जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि जल साठवणीचे तोकड्या स्त्रोतामुळे जिल्ह्यातील काही गावांत नेहमीच पाणीटंचाई जाणवते. जिल्ह्यातील अशाच २५० हून अधिक गावांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. यामध्ये रिसोड तालुक्यातील ४७ गावे, मंगरूळपीर तालुक्यातील ३१ गावे, कारंजा तालुक्यातील ४६ गावे, वाशिम तालुक्यातील ४५ गावे, मालेगाव तालुक्यातील ५१ गावे, तसेच मानोरा तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. यातील मानोरा तालुका वगळता इतर तालुक्यातील गावांसाठी १ कोटी ८७ लाख ४३ हजार रुपये खर्चाच्या उपाय योजना शासनाने प्रस्तावित केल्या आहेत. रिसोड पंचायत समितीच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी १८० हातपंपांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव, विहिर अधिग्रहणाचे ४ प्रस्ताव, नवीन हातपंपांचे १४१ प्रस्ताव, तसेच टँकरचे १० प्रस्ताव सादर केले असून, त्यातील करंजी गरड या गावासाठी एक टँकर त्वरीत मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले