शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

पाणीटंचाईच्या उपाय योजनांवर प्रशासनाचा भर

By admin | Updated: March 20, 2017 19:20 IST

रिसोड तालुक्यात ४७ गावांत संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ४३.७४ लाख रुपये खर्चाच्या उपाय योजना प्रस्तावित आहेत. 

जिल्ह्यातील स्थिती: पाच तालुक्यातील २२० गावांसाठी १.८७ कोटींच्या योजना वाशिम: मागील वर्षी जोरदार पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने तालुका व जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाणीटंचाईच्या उपाय योजनांवर भर दिला जात आहे. एकट्या रिसोड तालुक्यात ४७ गावांत संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ४३.७४ लाख रुपये खर्चाच्या उपाय योजना प्रस्तावित आहेत. जिल्ह्यात गत पावसाळ्यात जोरदार पाऊस पडला; परंतु जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि जल साठवणीचे तोकड्या स्त्रोतामुळे जिल्ह्यातील काही गावांत नेहमीच पाणीटंचाई जाणवते. जिल्ह्यातील अशाच २५० हून अधिक गावांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. यामध्ये रिसोड तालुक्यातील ४७ गावे, मंगरूळपीर तालुक्यातील ३१ गावे, कारंजा तालुक्यातील ४६ गावे, वाशिम तालुक्यातील ४५ गावे, मालेगाव तालुक्यातील ५१ गावे, तसेच मानोरा तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. यातील मानोरा तालुका वगळता इतर तालुक्यातील गावांसाठी १ कोटी ८७ लाख ४३ हजार रुपये खर्चाच्या उपाय योजना शासनाने प्रस्तावित केल्या आहेत. रिसोड पंचायत समितीच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी १८० हातपंपांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव, विहिर अधिग्रहणाचे ४ प्रस्ताव, नवीन हातपंपांचे १४१ प्रस्ताव, तसेच टँकरचे १० प्रस्ताव सादर केले असून, त्यातील करंजी गरड या गावासाठी एक टँकर त्वरीत मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले