शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पीक कर्ज वाटपाचे ५० टक्के उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:31 IST

जिल्ह्यात या वर्षी एकूण ४ लाख ६ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची ...

जिल्ह्यात या वर्षी एकूण ४ लाख ६ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीनचा ३ लाख हेक्टर क्षेत्रावर सर्वाधिक पेरा होणार असल्याचे गृहीत धरून कृषी विभागाने पुरेशा प्रमाणात खत, बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. महाबीजच्या बियाण्यांची काही ठिकाणी टंचाई जाणवत आहे; मात्र येत्या काही दिवसांत हा प्रश्नही निकाली निघणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले.

दरम्यान, खरीप हंगामात शेतकऱ्यांना पैशांची चणचण भासू नये, यासाठी प्रशासनाने १०२५ कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कडक निर्बंध लादण्यात आले; मात्र अशाही स्थिती बँकांनी शेतकऱ्यांना अपेक्षित साथ दिली. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केल्याने पीक कर्ज वाटपाचे प्रमाण ५० टक्क्यांच्या आसपास पोहणे शक्य झाले. ३१ मेअखेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५१२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप प्रक्रिया पूर्ण झाली होती, अशी माहिती मिळाली.

.....................

डीएपी खताचा तुटवडा कायम

जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी प्रामुख्याने डीएपी गोदावरी या खताला पहिली पसंती देतात; मात्र यंदा याच खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. इतर सुमारे १३०० मे. टन. मिश्र खते उपलब्ध आहेत; मात्र शेतकऱ्यांना केवळ डीएपी गोदावरीच हवे आहे. यामुळे कृषी विभागासह कृषी सेवा केंद्रांचीही डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, कच्च्या मालाचा पुरवठा ठप्प असल्याने किमान आणखी काही दिवस तरी डीएपी गोदावरी खत जिल्ह्याला उपलब्ध होणार नसल्याची माहिती मिळाली.

..................

मान्सून लांबला तरी चिंता नको

हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून काही दिवस लांबणार आहे; मात्र त्याने चिंता करण्याचे कुठलेच कारण नाही. यासह सध्या अधूनमधून कोसळत असलेल्या पावसाच्या भरवशावर कुठल्याच शेतकऱ्याने पेरणीची घाई करू नये. मान्सूनचे आगमन झाल्यानंतरच पेरणीस सुरुवात करावी. यासह उगवणक्षमता तपासून घरचेच बियाणे पेरण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.