शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

आसेगावच्या धरणाने गाठला तळ!

By admin | Updated: May 22, 2017 01:19 IST

पाण्याची गळती : सिंचनासही अपुरे पडले पाणी!

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पो.स्टे. : येथील लघु सिंचन प्रकल्पाने तळ गाठल्याने उन्हाळी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.आसेगाव येथे साधारणत: ११ वर्षापूर्वी लघु सिंचन विभागाअंतर्गत आसेगाव बांध धरण निर्माण करण्यात आले होते. आजघडीला धरण कोरडेठण पडले आहे. या धरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती ओलिताखाली आली. २०१६ मध्ये धरण पूर्ण भरल्यामुळे येथील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, दादर या पिकाचा पेरा केला होता. भुईमूग पीक ऐन मोसमात असताना, धरणातील जलसाठा कमी झाला. परिणामी, शेतकऱ्यांची तारांबळ झाली. पिकाला पाणी कमी पडल्याने उत्पादनात प्रचंड घट आली व येत आहे. या धरणाच्या भिंतीमधून पाणी गळती होत असल्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त पाणी वाहून जाऊन धरणामध्ये असणारा जलसाठा कमी झाले, असे मानले जात आहे. धरणातून पाणी गळती होणार नाही, याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष दिले असते तर आजरोजी धरणाने तळ गाठला नसता, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. धरणाने तळ गाठल्याने आसेगाव परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. सोबतच जनावरांचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.धरणाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली आहेत. ही झाडेझुडपे तोडणे अपेक्षीत आहे. मात्र, अद्याप याकडे कुणाचेही लक्ष नाही. झाडाझुडपांमुळे धरणाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन झुडूपे तोडणे अपेक्षीत आहे.आसेगाव येथील धरणाच्या गळतीचा प्रश्न गांभीर्याने घेवून हे धरण पावसाळ्यापूर्वी दुरूस्त करण्याचे प्रयत्न केले जातील. यासह धरणाच्या भिंतीवर उगवलेली झाडे-झुडूपे तोडण्याबाबतही कटाक्षाने लक्ष पुरविले जाईल. धरण नादुरूस्तीमुळे कुठलेही नुकसान होणार नाही, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. - जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, वाशिम