शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

आसेगावच्या धरणाने गाठला तळ!

By admin | Updated: May 22, 2017 01:19 IST

पाण्याची गळती : सिंचनासही अपुरे पडले पाणी!

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पो.स्टे. : येथील लघु सिंचन प्रकल्पाने तळ गाठल्याने उन्हाळी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.आसेगाव येथे साधारणत: ११ वर्षापूर्वी लघु सिंचन विभागाअंतर्गत आसेगाव बांध धरण निर्माण करण्यात आले होते. आजघडीला धरण कोरडेठण पडले आहे. या धरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती ओलिताखाली आली. २०१६ मध्ये धरण पूर्ण भरल्यामुळे येथील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, दादर या पिकाचा पेरा केला होता. भुईमूग पीक ऐन मोसमात असताना, धरणातील जलसाठा कमी झाला. परिणामी, शेतकऱ्यांची तारांबळ झाली. पिकाला पाणी कमी पडल्याने उत्पादनात प्रचंड घट आली व येत आहे. या धरणाच्या भिंतीमधून पाणी गळती होत असल्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त पाणी वाहून जाऊन धरणामध्ये असणारा जलसाठा कमी झाले, असे मानले जात आहे. धरणातून पाणी गळती होणार नाही, याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष दिले असते तर आजरोजी धरणाने तळ गाठला नसता, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. धरणाने तळ गाठल्याने आसेगाव परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. सोबतच जनावरांचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.धरणाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली आहेत. ही झाडेझुडपे तोडणे अपेक्षीत आहे. मात्र, अद्याप याकडे कुणाचेही लक्ष नाही. झाडाझुडपांमुळे धरणाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन झुडूपे तोडणे अपेक्षीत आहे.आसेगाव येथील धरणाच्या गळतीचा प्रश्न गांभीर्याने घेवून हे धरण पावसाळ्यापूर्वी दुरूस्त करण्याचे प्रयत्न केले जातील. यासह धरणाच्या भिंतीवर उगवलेली झाडे-झुडूपे तोडण्याबाबतही कटाक्षाने लक्ष पुरविले जाईल. धरण नादुरूस्तीमुळे कुठलेही नुकसान होणार नाही, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. - जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, वाशिम