शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

आसेगावच्या धरणाने गाठला तळ!

By admin | Updated: May 22, 2017 01:19 IST

पाण्याची गळती : सिंचनासही अपुरे पडले पाणी!

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पो.स्टे. : येथील लघु सिंचन प्रकल्पाने तळ गाठल्याने उन्हाळी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.आसेगाव येथे साधारणत: ११ वर्षापूर्वी लघु सिंचन विभागाअंतर्गत आसेगाव बांध धरण निर्माण करण्यात आले होते. आजघडीला धरण कोरडेठण पडले आहे. या धरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती ओलिताखाली आली. २०१६ मध्ये धरण पूर्ण भरल्यामुळे येथील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, दादर या पिकाचा पेरा केला होता. भुईमूग पीक ऐन मोसमात असताना, धरणातील जलसाठा कमी झाला. परिणामी, शेतकऱ्यांची तारांबळ झाली. पिकाला पाणी कमी पडल्याने उत्पादनात प्रचंड घट आली व येत आहे. या धरणाच्या भिंतीमधून पाणी गळती होत असल्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त पाणी वाहून जाऊन धरणामध्ये असणारा जलसाठा कमी झाले, असे मानले जात आहे. धरणातून पाणी गळती होणार नाही, याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष दिले असते तर आजरोजी धरणाने तळ गाठला नसता, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. धरणाने तळ गाठल्याने आसेगाव परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. सोबतच जनावरांचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.धरणाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली आहेत. ही झाडेझुडपे तोडणे अपेक्षीत आहे. मात्र, अद्याप याकडे कुणाचेही लक्ष नाही. झाडाझुडपांमुळे धरणाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन झुडूपे तोडणे अपेक्षीत आहे.आसेगाव येथील धरणाच्या गळतीचा प्रश्न गांभीर्याने घेवून हे धरण पावसाळ्यापूर्वी दुरूस्त करण्याचे प्रयत्न केले जातील. यासह धरणाच्या भिंतीवर उगवलेली झाडे-झुडूपे तोडण्याबाबतही कटाक्षाने लक्ष पुरविले जाईल. धरण नादुरूस्तीमुळे कुठलेही नुकसान होणार नाही, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. - जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, वाशिम