शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

एकबुर्जीत उरला १.५ द.ल.घ.मी. पाणीसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:26 IST

शहराला वर्षाकाठी किमान सात दशलक्ष घनमीटर पिण्याचे पाणी लागते. मात्र, एकबुर्जी जलाशयात आज रोजी केवळ १.५ दशलक्ष घनमीटरच्या आसपास पाणीसाठा शिल्लक असल्याने नियोजनाचा भाग म्हणून नगर परिषदेने १0 ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. परिणामी, शहरवासीयांना आतापासूनच भीषण पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देवर्षभराची गरज सात द.ल.घ.मी.ची जुमडा बॅरेजमधून पाणी घेण्याच्या हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शहराला वर्षाकाठी किमान सात दशलक्ष घनमीटर पिण्याचे पाणी लागते. मात्र, एकबुर्जी जलाशयात आज रोजी केवळ १.५ दशलक्ष घनमीटरच्या आसपास पाणीसाठा शिल्लक असल्याने नियोजनाचा भाग म्हणून नगर परिषदेने १0 ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. परिणामी, शहरवासीयांना आतापासूनच भीषण पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी जिल्ह्यात पावसाची सरासरी टक्केवारी ५0 टक्क्यांच्या आसपास पोहोचली आहे. असे असले तरी हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसून, वाशिम शहर तथा परिसरात तर फारच कमी पर्जन्यमान झाले आहे. परिणामी, अर्धाअधिक पावसाळा उलटूनही वाशिमला पाणीपुरवठा करणार्‍या एकबुर्जी जलाशयात अपेक्षित पाणीसाठा होऊच शकला नाही. त्यामुळे आजमितीस या जलाशयात उणापुरा १.५ दशलक्ष घनमीटरच्या आसपासच पाणीसाठा शिल्लक असून, १0 दिवसाआड पाणीपुरवठा केला, तरी तो आगामी तीन महिने अर्थात डिसेंबर महिन्यापर्यंतच पुरेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन जुमडा बॅरेजमध्ये असलेला चार दशलक्ष घनमीटर पाणीसाठा पाइपलाइनद्वारे एकबुर्जी जलाशयात खेचून आणण्यासाठी विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाच कोटी रुपयांची मागणी नोंदविलेली आहे. नगर परिषद स्तरावरूनही विद्यमान नगराध्यक्ष अशोक हेडा, पाणीपुरवठा सभापती राहुल तुपसांडे यांचे यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत; मात्र ही बाब खर्चिक असण्यासोबतच वेळखाऊ असल्याने विद्यमान स्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याशिवाय इतर कुठला पर्याय शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे शहरवासीयांनी दुष्काळसदृश परिस्थिती आणि एकबुर्जी जलाशयात शिल्लक असलेला नगण्य पाणीसाठा, या बाबी लक्षात घेऊन पाण्याचा अनावश्यक वापर तथा अपव्यय टाळावा, असे आवाहन केले जात आहे. 

यंदा अपेक्षित पर्जन्यमान न झाल्यामुळे एकबुर्जी जलाशयातील पाणी साठय़ाची स्थिती चिंताजनक झाली आहे. असे असले तरी त्यावर मात करण्याचे सर्वंकष प्रयत्न नगर परिषदेकडून सुरू असून, वेळप्रसंगी मृत जलसाठाही शहरवासीयांची तहान भागवू शकतो. जुमडा बॅरेजमधून पाणी मिळाल्यास सोयीचे होणार आहे.             - अशोक हेडा, नगराध्यक्ष, वाशिम

एकबुर्जीचा घटलेला जलसाठा आणि यंदाची दुष्काळसदृश स्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे क्रमप्राप्त आहे. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अधिकच गंभीर होणार असल्याने आतापासूनच १0 दिवसाआड पाणी पुरविले जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.               - राहुल तुपसांडे, पाणीपुरवठा सभापती, वाशिम