शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

‘नाफेड’ तूर स्वीकारेना; व्यापाऱ्यांनी पाडले दर!

By admin | Updated: April 21, 2017 01:09 IST

ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात : हमीदर ५,०५०; व्यापाऱ्यांकडे मिळतोय ४ हजार रुपये सरासरी दर

वाशिम : शासनाने जाहीर केलेल्या ५ हजार ५० रुपये हमीदराने तूर खरेदी करणाऱ्या ‘नाफेड’ने १५ एप्रिलपासून शेतकऱ्यांकडील तूर स्वीकारणे बंद केले. परिणामी, तोंडावर असलेल्या खरीप हंगामाकरिता लागणाऱ्या साहित्यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात माल विक्री करणे सुरू केले असून, व्यापाऱ्यांकडून तुरीला केवळ ४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास दर दिला जात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.जिल्ह्यात मालेगाव, कारंजा, वाशिम आणि अनसिंग येथे महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने (एमएससीएमएफ), मंगरुळपीर येथे विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने (व्हीसीएमएफ); तर रिसोड येथे फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या माध्यमातून ‘नाफेड’ने तूर खरेदी केंद्र उभारले होते. मात्र, सुरुवातीपासूनच या ना त्या कारणांनी हमीदराने सुरू असलेल्या ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांनी शेतकऱ्यांना अक्षरश: जेरीस आणले. मध्यंतरी बारदाना संपल्याचे कारण समोर करून तब्बल १५ ते २० दिवस तूर खरेदी बंद पाडण्यात आली. त्यामुळे खरेदी केंद्रांवर पडून असलेल्या तुरीची रखवाली करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यानंतर या समस्येवर तोडगा निघत तूर खरेदीची प्रक्रिया पूर्ववत झाली असताना १५ एप्रिलपासून पुन्हा शेतकऱ्यांकडील तूर स्वीकारणे बंद करण्यात आले आहे. या मुदतीच्या आत ज्या शेतकऱ्यांची तूर खरेदी केंद्रांवर पडून आहे, ती २२ एप्रिलपर्यंत मोजणी करून खरेदी केली जाईल, अशी घोषणा ‘नाफेड’च्यावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे विविध कारणांनी अद्याप तूर विकू न शकलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मालाची विक्री करून मिळणाऱ्या पैशांवर खरीप हंगामातील पीक पेऱ्याची तजवीज करावी लागणार असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांकडे तूर विक्री करणे सुरू केले आहे. नेमक्या याच चालून आलेल्या आयत्या संधीचा लाभ घेत व्यापाऱ्यांनी तुरीचे दर मोठ्या प्रमाणात पाडले असून, सध्या खुल्या बाजारात तुरीला केवळ ४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपासच दर दिले जात आहेत. या अजब चक्रव्यूहात फसलेल्या शेतकऱ्यांना मात्र यामुळे आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे.