वाशिम: वाशिम शहराची तहान भागविणार्या आणि शेकडो शेतकर्यांचे हिरवे स्वप्न साकारणार्या तालुक्यातील एकबुर्जी धरणाची भिंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनाने तूर्तास गुंडाळून ठेवला आहे. दहा वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला होता. धरणात पाणी कुठून आणणार, असा मुद्दा उपस्थित करून तू र्तास हा मुद्दा उपस्थित न करण्याच्या सूचनाही मंत्रालयस्तरावरून मिळाल्याची विश्वसनीय माहिती आहे. वाशिम शहराची संपूर्ण तहान एकबुर्जी धरणाच्या पाण्यातून भागविली जाते. याबरोबरच एकबुर्जी परिसरातील शेकडो शेतकर्यांना या धरणातून सिंचन करणे सुलभ झाले. पावसाळ्यात धरण ह्यओव्हर फ्लोह्ण झाल्यानंतर पाणी वाहून जाते. धरणातील जलसाठय़ात वाढ करण्यासाठी भिंतीची उंची वाढविण्याची मागणी गत १५ वर्षांं पासून शासनदरबारी रेटून धरली जात आहे; मात्र आता धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्यासाठी पाणी कुठून आणणार? असा प्रतिप्रश्न करून मंत्रालयीन बैठकीत हा प्रस्ताव तूर्तास गुंडाळण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे १८ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होणार्या बैठकीतून हा मुद्दा गायब होणार आहे.
एकबुर्जी धरण उंचीचा प्रस्ताव गुंडाळला
By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST