शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

गतवर्षी लावलेली ९० टक्के राेपटी गेली करपून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:43 IST

पर्यावरणाचा झपाटून होणारा ऱ्हास रोखणे, वायू प्रदूषणाची दाहकता कमी करणे व पावसाचे बिघडलेले तापमान ताळ्यावर आणणे यासाठी वृक्षांची संख्या ...

पर्यावरणाचा झपाटून होणारा ऱ्हास रोखणे, वायू प्रदूषणाची दाहकता कमी करणे व पावसाचे बिघडलेले तापमान ताळ्यावर आणणे यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे प्रत्येकाच्या ध्यानात आले आहे. म्हणूनच शासनाने शतकोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी या योजनेतून कोट्यवधी वृक्षांची लागवड विविध विभागांमार्फत विविध ठिकाणी केली जाते. सामाजिक वनीकरण विभागातर्फे ठिकठिकाणी रोपवाटिकांची निर्मिती करून त्यामध्ये दरवर्षी विविध प्रकारच्या लाखो रोपे तयार केली जात आहेत. वृक्षलागवडीला सामाजिक उपक्रमाचे स्वरूप देऊन शासनातर्फे विविध सामाजिक संघटना, संस्था शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था यांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले जात आहे. जवळच्या रोपवाटिकेतील उद्दिष्टाएवढी रोपे घेऊन त्याची लागवड व संवर्धन करण्याची जबाबदारी संस्था कार्यालयावर टाकली जात आहे. त्यामुळे संस्था, कार्यालये, शैक्षणिक संस्था दरवर्षी पावसाळ्यात दिलेल्या उद्दिष्टाएवढे रोपट्यांचे रोपण करतात. मात्र, त्याचे संवर्धन करण्याची मनापासून तयारी कोणीही करीत नाही. संबंधित विभागप्रमुखांनी वृक्षलागवडीचा व जिवंत झाडांचा अहवाल मागितला की कागदोपत्री सर्व आलबेल अहवाल पाठविला जातो.

............

वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याची गरज

वाशिम ते मालेगाव रोडवर नवीन रस्ता झाल्याने अनेक वृक्ष तोडले आहेत; परंतु मालेगाव, वाशिमला दररोज जाणारे अनेक लोक आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन वाशिम-मालेगाव रोडवर वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याची गरज बोलली जात आहे.

........

पाणीटंचाई वृक्षसंवर्धनाच्या पथ्थ्यावर

पाण्याची तीव्र टंचाईसुद्धा वृक्षसंवर्धनाच्या पथ्यावर पडत आहे. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. घरच्या दुभत्या जनावरांना पाणी कोठून मिळवावे, याची सतत चिंता पशुपालकांना सतावत आहे. घरातील परसबागेतील, कुंडीतील रोपटे पाण्याअभावी कोमेजत आहेत, तर मग वृक्षलागवड केलेल्या कोट्यवधी रोपट्यांना पाणी कोठून देणार, मोकाट जनावरांपासून रोपट्यांचे संरक्षण कसे करणार, याचे नियोजन कोणाजवळही तयार नसते.