शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षी लावलेली ९० टक्के राेपटी गेली करपून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:43 IST

पर्यावरणाचा झपाटून होणारा ऱ्हास रोखणे, वायू प्रदूषणाची दाहकता कमी करणे व पावसाचे बिघडलेले तापमान ताळ्यावर आणणे यासाठी वृक्षांची संख्या ...

पर्यावरणाचा झपाटून होणारा ऱ्हास रोखणे, वायू प्रदूषणाची दाहकता कमी करणे व पावसाचे बिघडलेले तापमान ताळ्यावर आणणे यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे प्रत्येकाच्या ध्यानात आले आहे. म्हणूनच शासनाने शतकोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी या योजनेतून कोट्यवधी वृक्षांची लागवड विविध विभागांमार्फत विविध ठिकाणी केली जाते. सामाजिक वनीकरण विभागातर्फे ठिकठिकाणी रोपवाटिकांची निर्मिती करून त्यामध्ये दरवर्षी विविध प्रकारच्या लाखो रोपे तयार केली जात आहेत. वृक्षलागवडीला सामाजिक उपक्रमाचे स्वरूप देऊन शासनातर्फे विविध सामाजिक संघटना, संस्था शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था यांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले जात आहे. जवळच्या रोपवाटिकेतील उद्दिष्टाएवढी रोपे घेऊन त्याची लागवड व संवर्धन करण्याची जबाबदारी संस्था कार्यालयावर टाकली जात आहे. त्यामुळे संस्था, कार्यालये, शैक्षणिक संस्था दरवर्षी पावसाळ्यात दिलेल्या उद्दिष्टाएवढे रोपट्यांचे रोपण करतात. मात्र, त्याचे संवर्धन करण्याची मनापासून तयारी कोणीही करीत नाही. संबंधित विभागप्रमुखांनी वृक्षलागवडीचा व जिवंत झाडांचा अहवाल मागितला की कागदोपत्री सर्व आलबेल अहवाल पाठविला जातो.

............

वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याची गरज

वाशिम ते मालेगाव रोडवर नवीन रस्ता झाल्याने अनेक वृक्ष तोडले आहेत; परंतु मालेगाव, वाशिमला दररोज जाणारे अनेक लोक आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन वाशिम-मालेगाव रोडवर वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याची गरज बोलली जात आहे.

........

पाणीटंचाई वृक्षसंवर्धनाच्या पथ्थ्यावर

पाण्याची तीव्र टंचाईसुद्धा वृक्षसंवर्धनाच्या पथ्यावर पडत आहे. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. घरच्या दुभत्या जनावरांना पाणी कोठून मिळवावे, याची सतत चिंता पशुपालकांना सतावत आहे. घरातील परसबागेतील, कुंडीतील रोपटे पाण्याअभावी कोमेजत आहेत, तर मग वृक्षलागवड केलेल्या कोट्यवधी रोपट्यांना पाणी कोठून देणार, मोकाट जनावरांपासून रोपट्यांचे संरक्षण कसे करणार, याचे नियोजन कोणाजवळही तयार नसते.