शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षी लावलेली ९० टक्के राेपटी गेली करपून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:43 IST

पर्यावरणाचा झपाटून होणारा ऱ्हास रोखणे, वायू प्रदूषणाची दाहकता कमी करणे व पावसाचे बिघडलेले तापमान ताळ्यावर आणणे यासाठी वृक्षांची संख्या ...

पर्यावरणाचा झपाटून होणारा ऱ्हास रोखणे, वायू प्रदूषणाची दाहकता कमी करणे व पावसाचे बिघडलेले तापमान ताळ्यावर आणणे यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे प्रत्येकाच्या ध्यानात आले आहे. म्हणूनच शासनाने शतकोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी या योजनेतून कोट्यवधी वृक्षांची लागवड विविध विभागांमार्फत विविध ठिकाणी केली जाते. सामाजिक वनीकरण विभागातर्फे ठिकठिकाणी रोपवाटिकांची निर्मिती करून त्यामध्ये दरवर्षी विविध प्रकारच्या लाखो रोपे तयार केली जात आहेत. वृक्षलागवडीला सामाजिक उपक्रमाचे स्वरूप देऊन शासनातर्फे विविध सामाजिक संघटना, संस्था शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था यांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले जात आहे. जवळच्या रोपवाटिकेतील उद्दिष्टाएवढी रोपे घेऊन त्याची लागवड व संवर्धन करण्याची जबाबदारी संस्था कार्यालयावर टाकली जात आहे. त्यामुळे संस्था, कार्यालये, शैक्षणिक संस्था दरवर्षी पावसाळ्यात दिलेल्या उद्दिष्टाएवढे रोपट्यांचे रोपण करतात. मात्र, त्याचे संवर्धन करण्याची मनापासून तयारी कोणीही करीत नाही. संबंधित विभागप्रमुखांनी वृक्षलागवडीचा व जिवंत झाडांचा अहवाल मागितला की कागदोपत्री सर्व आलबेल अहवाल पाठविला जातो.

............

वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याची गरज

वाशिम ते मालेगाव रोडवर नवीन रस्ता झाल्याने अनेक वृक्ष तोडले आहेत; परंतु मालेगाव, वाशिमला दररोज जाणारे अनेक लोक आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन वाशिम-मालेगाव रोडवर वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याची गरज बोलली जात आहे.

........

पाणीटंचाई वृक्षसंवर्धनाच्या पथ्थ्यावर

पाण्याची तीव्र टंचाईसुद्धा वृक्षसंवर्धनाच्या पथ्यावर पडत आहे. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. घरच्या दुभत्या जनावरांना पाणी कोठून मिळवावे, याची सतत चिंता पशुपालकांना सतावत आहे. घरातील परसबागेतील, कुंडीतील रोपटे पाण्याअभावी कोमेजत आहेत, तर मग वृक्षलागवड केलेल्या कोट्यवधी रोपट्यांना पाणी कोठून देणार, मोकाट जनावरांपासून रोपट्यांचे संरक्षण कसे करणार, याचे नियोजन कोणाजवळही तयार नसते.