शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

८९६ तक्रारींचे ‘आॅन दी स्पॉट’ निराकरण!

By admin | Updated: June 26, 2017 10:13 IST

पालकमंत्री तळ ठोकून; ३० अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई प्रस्तावित.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह आमदार, खासदार आणि सर्व प्रशासकीय विभागांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २३ ते २५ जून असे सलग तीन दिवस रात्री उशिरापर्यंत कामकाज करून नागरिकांकडून प्राप्त तब्बल ८९६ तक्रारींचे ह्यआॅन दी स्पॉटह्ण निराकरण केले. यादरम्यान, कामात हयगय करणाऱ्या ३० अधिकारी, कर्मचाऱ्यांवर विविध स्वरूपातील कारवाईदेखील प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाकडे दाखल केलेल्या तक्रारी अर्जांवर तातडीने कार्यवाही होऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक विहित कालमर्यादेत व्हावी, यासाठी स्वत: पालकमंत्री राठोड यांनी पुढाकार घेत तीनही उपविभाग स्तरावर विस्तारित समाधान शिबिरांचे आयोजन केले. विशेष म्हणजे तीनही उपविभाग स्तरावर झालेल्या या शिबिरांकरिता पालकमंत्र्यांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शिबिरस्थळी ह्यतळह्ण ठोकून तक्रारदारांच्या समस्या जाणून घेतल्या. खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील या मान्यवरांसह जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, पंचायत समिती, नगर परिषद, जलसंपदा विभाग, महावितरण, पोलिस विभाग, बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शनिवार, रविवार या सुट्यांच्या दिवशीही आपले कर्तव्य चोखपणे बजावले. विस्तारित समाधान शिबिराच्या पहिल्या दिवशी अर्थात २३ जूनला कारंजा येथील बाबासाहेब धाबेकर सभागृहात पार पडलेल्या शिबिरात कारंजा तालुक्यातील २२३ आणि मानोरा तालुक्यातून प्राप्त २२१ अशा एकंदरित ४४४ तक्रारींचा ह्यआॅन दी स्पॉटह्ण निपटारा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी २४ जूनला वाशिम येथील वाटाणे लॉन्समध्ये झालेल्या शिबिरात वाशिम, रिसोड आणि मालेगाव या तीन तालुक्यांमधून प्राप्त अनुक्रमे ९२, २१६ आणि ५८, अशा एकूण ३६६ तक्रारींचे नागरिकांसमक्ष निराकरण झाले, तर २५ जून रोजी मंगरूळपीर उपविभाग स्तरावर झालेल्या शिबिरात ८६ तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सूतोवाच पालकमंत्र्यांनी केले होते. त्यानुसार, आजच्या मंगरूळपिरातील शिबिरात कामात हयगय करणारे अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयाचे सहायक अधीक्षक कदम यांना निलंबित करण्यात आले. यासह तलाठी खान यांच्या निलंबनाचा प्रस्ताव असून, आणखी एका तलाठ्यावर वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली.जिल्ह्यात तीनही उपविभागस्तरावर झालेल्या समाधान शिबिरांमध्ये प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत मिळाली. यापुढेही उपविभागस्तरावर दर तीन महिन्याला समाधान शिबिरांचे आयोजन केले जाईल. - संजय राठोड पालकमंत्री, वाशिम जिल्हा