शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

८९६ तक्रारींचे ‘आॅन दी स्पॉट’ निराकरण!

By admin | Updated: June 26, 2017 10:13 IST

पालकमंत्री तळ ठोकून; ३० अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई प्रस्तावित.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह आमदार, खासदार आणि सर्व प्रशासकीय विभागांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २३ ते २५ जून असे सलग तीन दिवस रात्री उशिरापर्यंत कामकाज करून नागरिकांकडून प्राप्त तब्बल ८९६ तक्रारींचे ह्यआॅन दी स्पॉटह्ण निराकरण केले. यादरम्यान, कामात हयगय करणाऱ्या ३० अधिकारी, कर्मचाऱ्यांवर विविध स्वरूपातील कारवाईदेखील प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाकडे दाखल केलेल्या तक्रारी अर्जांवर तातडीने कार्यवाही होऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक विहित कालमर्यादेत व्हावी, यासाठी स्वत: पालकमंत्री राठोड यांनी पुढाकार घेत तीनही उपविभाग स्तरावर विस्तारित समाधान शिबिरांचे आयोजन केले. विशेष म्हणजे तीनही उपविभाग स्तरावर झालेल्या या शिबिरांकरिता पालकमंत्र्यांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शिबिरस्थळी ह्यतळह्ण ठोकून तक्रारदारांच्या समस्या जाणून घेतल्या. खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील या मान्यवरांसह जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, पंचायत समिती, नगर परिषद, जलसंपदा विभाग, महावितरण, पोलिस विभाग, बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शनिवार, रविवार या सुट्यांच्या दिवशीही आपले कर्तव्य चोखपणे बजावले. विस्तारित समाधान शिबिराच्या पहिल्या दिवशी अर्थात २३ जूनला कारंजा येथील बाबासाहेब धाबेकर सभागृहात पार पडलेल्या शिबिरात कारंजा तालुक्यातील २२३ आणि मानोरा तालुक्यातून प्राप्त २२१ अशा एकंदरित ४४४ तक्रारींचा ह्यआॅन दी स्पॉटह्ण निपटारा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी २४ जूनला वाशिम येथील वाटाणे लॉन्समध्ये झालेल्या शिबिरात वाशिम, रिसोड आणि मालेगाव या तीन तालुक्यांमधून प्राप्त अनुक्रमे ९२, २१६ आणि ५८, अशा एकूण ३६६ तक्रारींचे नागरिकांसमक्ष निराकरण झाले, तर २५ जून रोजी मंगरूळपीर उपविभाग स्तरावर झालेल्या शिबिरात ८६ तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सूतोवाच पालकमंत्र्यांनी केले होते. त्यानुसार, आजच्या मंगरूळपिरातील शिबिरात कामात हयगय करणारे अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयाचे सहायक अधीक्षक कदम यांना निलंबित करण्यात आले. यासह तलाठी खान यांच्या निलंबनाचा प्रस्ताव असून, आणखी एका तलाठ्यावर वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली.जिल्ह्यात तीनही उपविभागस्तरावर झालेल्या समाधान शिबिरांमध्ये प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत मिळाली. यापुढेही उपविभागस्तरावर दर तीन महिन्याला समाधान शिबिरांचे आयोजन केले जाईल. - संजय राठोड पालकमंत्री, वाशिम जिल्हा