शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

७0 वर्षांंतील प्रलंबित कामे तीन वर्षांंत लागली मार्गी!

By admin | Updated: July 9, 2017 09:50 IST

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भामरे यांचे प्रतिपादन; वाशिममध्ये झाले ‘सबका साथ सबका विकास’ संमेलन.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तत्कालिन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ वगळता काँग्रेसने ७0 वर्षे सत्ता सांभाळली. या दरम्यानच्या काळात टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा यांसह इतरही मोठे घोटाळे झाले. सिंचनावर ६0 हजार कोटी रुपये खर्चूनही १ टक्कादेखील सिंचन वाढले नाही. रेल्वे, रस्त्यांच्या बाबतीतही अनेक कामे प्रलंबित होती. ती भाजपाने गेल्या तीन वर्षांंत मार्गी लावली आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी येथे ८ जुलै रोजी केले. स्थानिक पाटणी कमश्रीयल कॉम्प्लेक्समध्ये आयोजित ह्यसबका साथ सबका विकासह्ण संमेलनात ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील होते. आमदार राजेंद्र पाटणी, हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, उपाध्यक्ष रुपेश वाघमारे, शिवराज कुलकर्णी, नरेंद्र गोलेच्छा, राजू पाटील राजे, धनंजय रणखांब, श्याम बडे, तेजराव वानखडे, वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडचे महाप्रबंधक आर. के. सिंह, क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक प्रभाकर देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. डॉ. भामरे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात शेतकरी, वंचित, गरीब जनतेला केंद्रस् थानी ठेवून विविध योजना आखल्या व त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. शेतीच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याकरिता देशातील अपूर्ण सिंचन प्रकल्प २0१९ पयर्ंत पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना राबविली जात आहे. नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना भरपाई देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, तसेच शे तकर्‍यांना त्यांच्या जमिनीची मृद आरोग्य पत्रिका देण्याचा निर्णय घेण्या त आला असल्याचेही त्यांनी सांगितले.सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भ्रष्टाचार कमी होऊन सरकारची ५0 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. कोळसा खाण, स्पेक्ट्रम लिलावांमध्येही पारदर्शकता आणल्याने केंद्र शासनाला कोट्यवधी रु पयांचा निधी उभारता आला. या निधीतून देशभरात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला आहे. पारदर्शक कारभारामुळे गेल्या तीन वर्षात विकास कामांचा वेग वाढविण्यात सरकारला यश आल्याचे ना. डॉ. भामरे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील उज्‍जवला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना घरगुती गॅस जोडणी पत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.के.सिंह यांनी केले.शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न - गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटीलकेंद्र व राज्यशासनाने शेती व शेतकर्‍यांच्या विकासाच्या योजना राबविण्यास प्राध्यान्य दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३४ हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी करण्याचा धाडसी निर्णय घे तला आहे. भविष्यात शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, यासाठी मु ख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकर्‍यांना महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचा लाभ देणे व अन्नसुरक्षा योजनेच्या दरात धान्य देण्यासारखे महत्त्वपूर्ण निर्णयही राज्य शासनाने घेतले आहेत. तसेच ग्रामीण भागा तील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर ११ बॅरेजेसची उभारणी करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या परिसरातील शेतकर्‍यांना वीज जोडणी देण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. समाजातील गरीब, वंचित व दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही ना. डॉ. पाटील यावेळी म्हणाले.आमदार पाटणी म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात वाशिम जिल्ह्यात अनेक विकासकामे सुरु झाली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे ६ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले, तसेच रेल्वे विभागाच्या माध्यमातून सुरु झालेल्या वर्धा ते नांदेड आणि अचल पूर ते यवतमाळ रेल्वे मार्गाच्या कामांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाचा सुमारे ११0 किलोमीटर ट प्पा वाशिम जिल्ह्यातून जात असून, त्याचाही भविष्यात जिल्हय़ाला फायदा होईल. स्वच्छ भारत अभियानमध्ये कारंजा तालुका हगणदरीमुक्त झाला असून, अमरावती विभागातील हगणदरीमुक्त होणारा तो पहिलाच तालुका असल्याचे आमदार पाटणी म्हणाले.