शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

कोरोना काळात ७० मुली बेपत्ता, ५९ घरी परतल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:56 IST

ठरावीक वय ओलांडल्यानंतर साधारणत: २० वर्षांपर्यंतच्या मुलींचे अचानक घर सोडून जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढलेले आहे. दरम्यान, वाशिम ...

ठरावीक वय ओलांडल्यानंतर साधारणत: २० वर्षांपर्यंतच्या मुलींचे अचानक घर सोडून जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढलेले आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात २०२० मधील कोरोना काळात ७० मुली बेपत्ता झाल्याची प्रकरणे उघडकीस आली. यासंदर्भात त्या-त्या पोलीस ठाण्यांमध्ये रीतसर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीची पावले उचलत तपासकार्य हाती घेतले. मित्र, मैत्रिणींच्या सांगण्यावरून तथा मोबाइलवरील लोकेशनसह इतर स्वरूपातील सुगाव्यांवरून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांचे पथक पाठवून ७० पैकी ५९ मुलींचा शोध घेण्यात वाशिम पोलीस दलाला यश मिळाले आहे; परंतु ११ मुली अद्याप बेपत्ता असून त्यांचा सातत्याने शोध घेतला जात आहे.

वयात आलेला मुलगा किंवा मुलगी घर सोडून जाण्याच्या कारणांबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्याशी संवाद साधला असता, मुलांचा आई-वडिलांशी कमी होत चाललेला संवाद, मित्र-मैत्रिणींसोबत अधिक काळ घालवण्याची मुभा आणि मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळेच असे प्रकार घडत असल्याचे तपासादरम्यान आढळत असल्याचे ते म्हणाले.

.........................

कोणत्या महिन्यात किती बेपत्ता

जानेवारी - १४

फेब्रुवारी - ११

मार्च - १०

एप्रिल - १

मे - ३

जून - ७

जुलै - ५

ऑगस्ट - ४

सप्टेंबर - ७

ऑक्टोबर - २

नोव्हेंबर - ४

डिसेंबर - २

.......................

कोणत्या वर्षांत किती?

२०१८- ४२

२०१९ - ५९

२०२० - ७०

....................

११ मुलींचा शोध लागेना

२०२० या वर्षभराच्या काळात ७० मुली बेपत्ता झाल्या. त्यातील ११ मुलींचा मात्र अद्यापही शोध लागलेला नाही. अशातच १९ जानेवारी २०२० रोजी बेपत्ता झालेल्या वैष्णवी जाधव नामक मुलीचा तिच्याच जवळच्या नातेवाइकांनी हत्या करून प्रेत जाळून टाकल्याचे ८ महिन्यांनंतर उघडकीस आले. बेपत्ता असलेल्या मुलींसोबत अशाच प्रकारे काही झाले नसावे ना, अशी भीती व्यक्त होत आहे.

......................

चार बेपत्ता मुलांचा लागला शोध

२०२० या वर्षांत मुलींसोबतच चार अल्पवयीन मुलेही बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत चारही मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल आणि जून या महिन्यांमध्ये ही मुले बेपत्ता झाली होती.

.................

कोट :

जिल्ह्यात अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. २०२० या वर्षांत ७० मुली आणि ४ मुले बेपत्ता झाली होती. त्यातील ५९ मुली आणि चारही मुलांचा शोध घेण्यात पोलीस प्रशासनास यश मिळाले आहे. इतर बेपत्ता मुलींचाही लवकरच शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्याचे विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यात निश्चितपणे यश मिळेल अशी खात्री आहे.

- वसंत परदेशी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम