शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

पाणी जमिनीत मुरविण्यासाठी तयार केले ६९ ‘रिचार्ज पीट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST

वाशिम : पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी वाहून जाऊ न देता शास्त्रशुद्ध पद्धतीने अडवून जमिनीत मुरविण्यासाठी ६९ शेतकऱ्यांनी यंदा त्यांच्या ...

वाशिम : पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी वाहून जाऊ न देता शास्त्रशुद्ध पद्धतीने अडवून जमिनीत मुरविण्यासाठी ६९ शेतकऱ्यांनी यंदा त्यांच्या शेतात ‘रिचार्ज पीट’ तयार केले आहेत. वाशिम तालुक्यातील नागठाणा, श्रीगिरी येथील शेतकरी याकामी सरसावले असून, त्यांना भूजल सर्वेक्षण, कृषी विभागाचे सहकार्य लाभत आहे.

देशभरातील मागास जिल्ह्यांच्या यादीत वाशिमचा समावेश आहे. दरम्यान, निती आयोगाकडून जिल्ह्यात विविध स्वरूपातील विकासात्मक कामे प्रस्तावित असून, पाणीपातळी खालावलेल्या पाणलोट क्षेत्रात ‘रिचार्ज पीट’ची कामे करण्याचेही नियोजन या माध्यमातून करण्यात आले. त्यास निती आयोगाच्या उच्चस्तरीय समितीमार्फत हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे. त्यानुसार, गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर १० ठिकाणी ‘रिचार्ज पीट’ तयार करण्यात आले होते. त्याची पाहणी स्वत: जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी करून समाधान व्यक्त केले होते. ‘रिचार्ज पीट’मुळे भर उन्हाळ्यातही संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी दमदार राहिली. त्यामुळे त्यांना बारमाही पिकांपासून उत्पन्न घेता येणे शक्य झाले.

दरम्यान, गतवर्षी ‘रिचार्ज पीट’साठी पुढाकार घेतलेल्या शेतकऱ्यांना झालेला फायदा लक्षात घेऊन यावर्षी लघु पाणलोट क्षेत्र असलेल्या वाशिम तालुक्यातील नागठाणा आणि श्रीगिरी या गावशिवारातील शेतकऱ्यांनी ‘रिचार्ज पीट’ तयार करून घेण्यासाठी पुढाकार घेतला. कोरोनाच्या संकट काळातही भूजल सर्वेक्षण विभागाचे भूवैज्ञानिक अतुल सुरसे, कृषी विभागाचे भागवत देशमुख आणि जलसंधारणचे अभियंता शुभम गिरी यांनी क्षेत्रीय तपासणीची कामे वेळेत पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. त्यामुळे पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी ‘रिचार्ज पीट’ची कामे पूर्ण होऊ शकली, असा सूर संबंधित शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

........................

बाॅक्स :

१५० ठिकाणी ‘रिचार्ज पीट’ तयार करण्याचे उद्दिष्ट

गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर १० शेतकऱ्यांच्या शेतात ‘रिचार्ज पीट’ तयार करण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरणे शक्य झाले. यंदा आतापर्यंत ६९ शेतकऱ्यांच्या शेतात ‘रिचार्ज पीट’ तयार झाले असून, एकूण १५० ठिकाणी ते उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

................

कोट :

पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरविण्यासाठी ‘रिचार्ज पीट’चा पर्याय सक्षम ठरला आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी जलसंधारण विभागाचे अधिकारी दी. शा. प्रक्षाळे, मापारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांचे विशेष सहकार्य लाभले. शेतकऱ्यांनीही हिरीरीने पुढाकार घेऊन स्वत:च्या शेतात ‘रिचार्ज पीट’ तयार करून घेतले.

- सुनील कडू

वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग, वाशिम