शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

पाणी जमिनीत मुरविण्यासाठी तयार केले ६९ ‘रिचार्ज पीट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST

वाशिम : पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी वाहून जाऊ न देता शास्त्रशुद्ध पद्धतीने अडवून जमिनीत मुरविण्यासाठी ६९ शेतकऱ्यांनी यंदा त्यांच्या ...

वाशिम : पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी वाहून जाऊ न देता शास्त्रशुद्ध पद्धतीने अडवून जमिनीत मुरविण्यासाठी ६९ शेतकऱ्यांनी यंदा त्यांच्या शेतात ‘रिचार्ज पीट’ तयार केले आहेत. वाशिम तालुक्यातील नागठाणा, श्रीगिरी येथील शेतकरी याकामी सरसावले असून, त्यांना भूजल सर्वेक्षण, कृषी विभागाचे सहकार्य लाभत आहे.

देशभरातील मागास जिल्ह्यांच्या यादीत वाशिमचा समावेश आहे. दरम्यान, निती आयोगाकडून जिल्ह्यात विविध स्वरूपातील विकासात्मक कामे प्रस्तावित असून, पाणीपातळी खालावलेल्या पाणलोट क्षेत्रात ‘रिचार्ज पीट’ची कामे करण्याचेही नियोजन या माध्यमातून करण्यात आले. त्यास निती आयोगाच्या उच्चस्तरीय समितीमार्फत हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे. त्यानुसार, गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर १० ठिकाणी ‘रिचार्ज पीट’ तयार करण्यात आले होते. त्याची पाहणी स्वत: जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी करून समाधान व्यक्त केले होते. ‘रिचार्ज पीट’मुळे भर उन्हाळ्यातही संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी दमदार राहिली. त्यामुळे त्यांना बारमाही पिकांपासून उत्पन्न घेता येणे शक्य झाले.

दरम्यान, गतवर्षी ‘रिचार्ज पीट’साठी पुढाकार घेतलेल्या शेतकऱ्यांना झालेला फायदा लक्षात घेऊन यावर्षी लघु पाणलोट क्षेत्र असलेल्या वाशिम तालुक्यातील नागठाणा आणि श्रीगिरी या गावशिवारातील शेतकऱ्यांनी ‘रिचार्ज पीट’ तयार करून घेण्यासाठी पुढाकार घेतला. कोरोनाच्या संकट काळातही भूजल सर्वेक्षण विभागाचे भूवैज्ञानिक अतुल सुरसे, कृषी विभागाचे भागवत देशमुख आणि जलसंधारणचे अभियंता शुभम गिरी यांनी क्षेत्रीय तपासणीची कामे वेळेत पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. त्यामुळे पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी ‘रिचार्ज पीट’ची कामे पूर्ण होऊ शकली, असा सूर संबंधित शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

........................

बाॅक्स :

१५० ठिकाणी ‘रिचार्ज पीट’ तयार करण्याचे उद्दिष्ट

गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर १० शेतकऱ्यांच्या शेतात ‘रिचार्ज पीट’ तयार करण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरणे शक्य झाले. यंदा आतापर्यंत ६९ शेतकऱ्यांच्या शेतात ‘रिचार्ज पीट’ तयार झाले असून, एकूण १५० ठिकाणी ते उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

................

कोट :

पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरविण्यासाठी ‘रिचार्ज पीट’चा पर्याय सक्षम ठरला आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी जलसंधारण विभागाचे अधिकारी दी. शा. प्रक्षाळे, मापारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांचे विशेष सहकार्य लाभले. शेतकऱ्यांनीही हिरीरीने पुढाकार घेऊन स्वत:च्या शेतात ‘रिचार्ज पीट’ तयार करून घेतले.

- सुनील कडू

वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग, वाशिम