शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

जिल्ह्यातील ६६ प्रकल्प तहानलेलेच!

By admin | Updated: July 8, 2017 01:33 IST

२० प्रकल्पांत १० टक्क्यांहून कमी जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या मृगात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने आता दडी मारली आहे. त्यामुळे पिके संकटात असून, जिल्ह्यातील १२५ प्रकल्पांपैकी ६६ प्रकल्प कोरडेच आहेत. त्याशिवाय २० प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे. जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती गंभीर असून, या तालुक्यातील सर्व प्रकल्पांत मिळून केवळ ५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पावसाची हीच स्थिती कायम राहिली, तर संबंधित गावांत पुन्हा भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यात लघू आणि मध्यम प्रकल्प मिळून एकूण १२५ प्रकल्प आहेत. मागील वर्षी पावसाळ्यात सरारीपेक्षा खूप अधिक पाऊस पडल्यानंतरही यातील निम्म्याहून अधिक प्रकल्प एप्रिल महिन्यातच कोरडे ठण्ण पडले होते. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. त्यामध्ये प्रामुख्याने रिसोड तालुक्याचा समावेश होता. या तालुक्यासह जिल्हाभरातील पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांत प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. आता यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी, जमिनीची धूपच त्यामुळे कमी झाली नसल्याने जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक प्रकल्पांतील पाणी पातळीत वाढ झालेली नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील सर्व प्रकल्पांत मिळून केवळ ५ टक्के जलसाठा आहे. त्याशिवाय मालेगाव तालुक्यातील सर्व प्रकल्पांत मिळून ६.२१ टक्के, कारंजा तालुक्यातील प्रकल्पांत २४.८४ टक्के, मंगरुळपीर तालुक्यातील प्रकल्पांत ७.९४ टक्के, रिसोड तालुक्यातील प्रकल्पांत ११.६९ टक्के, तर मानोरा तालुक्यातील प्रकल्पांत १६.४१ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सरासरी १८० मिमी पाऊस पडला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यात १८६.६६, रिसोड तालुक्यात १७१.९२, मंगरुळपीर तालुक्यात १६६. ६६ मिमी, मानोरा तालुक्यात १७२.१८ मिमी, तर कारंजा तालुक्यात १७५.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.