शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जिल्ह्यातील ६६ प्रकल्प तहानलेलेच!

By admin | Updated: July 8, 2017 01:33 IST

२० प्रकल्पांत १० टक्क्यांहून कमी जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या मृगात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने आता दडी मारली आहे. त्यामुळे पिके संकटात असून, जिल्ह्यातील १२५ प्रकल्पांपैकी ६६ प्रकल्प कोरडेच आहेत. त्याशिवाय २० प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे. जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती गंभीर असून, या तालुक्यातील सर्व प्रकल्पांत मिळून केवळ ५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पावसाची हीच स्थिती कायम राहिली, तर संबंधित गावांत पुन्हा भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यात लघू आणि मध्यम प्रकल्प मिळून एकूण १२५ प्रकल्प आहेत. मागील वर्षी पावसाळ्यात सरारीपेक्षा खूप अधिक पाऊस पडल्यानंतरही यातील निम्म्याहून अधिक प्रकल्प एप्रिल महिन्यातच कोरडे ठण्ण पडले होते. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. त्यामध्ये प्रामुख्याने रिसोड तालुक्याचा समावेश होता. या तालुक्यासह जिल्हाभरातील पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांत प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. आता यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी, जमिनीची धूपच त्यामुळे कमी झाली नसल्याने जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक प्रकल्पांतील पाणी पातळीत वाढ झालेली नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील सर्व प्रकल्पांत मिळून केवळ ५ टक्के जलसाठा आहे. त्याशिवाय मालेगाव तालुक्यातील सर्व प्रकल्पांत मिळून ६.२१ टक्के, कारंजा तालुक्यातील प्रकल्पांत २४.८४ टक्के, मंगरुळपीर तालुक्यातील प्रकल्पांत ७.९४ टक्के, रिसोड तालुक्यातील प्रकल्पांत ११.६९ टक्के, तर मानोरा तालुक्यातील प्रकल्पांत १६.४१ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सरासरी १८० मिमी पाऊस पडला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यात १८६.६६, रिसोड तालुक्यात १७१.९२, मंगरुळपीर तालुक्यात १६६. ६६ मिमी, मानोरा तालुक्यात १७२.१८ मिमी, तर कारंजा तालुक्यात १७५.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.