शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

तीन मध्यम प्रकल्पांत ६३ टक्के जलसाठा

By admin | Updated: September 21, 2015 00:09 IST

लघुप्रकल्पातील जलसाठयात वाढ ; मात्र चांगला पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची शक्यता.

वाशिम : जिल्हयातील महत्वपूर्ण तीन मध्यम आणि १0४ लघु प्रकल्पांमधील जलसाठा पावसाळा संपत आला तरी वाढ झालेली दिसून येत नाही. जिल्हयात १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाने थोडा फार फरक पडला असून जिल्हयातील तीनही मध्यम प्रकल्पात जवळपास ६३ टकके जलसाठा आहे. चांगला पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची शक्यता जाणवत आहे. सद्या जिल्हयातील या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता एकबुर्जी, सोनल आणि अडाण या तीन मोठया प्रकल्पातील जलसाठा यावर्षी १00 टकक्यापर्यंत पोहचला नाही. आजच्या घडीला (२0 सप्टेंबरपर्यत) एकबुर्जी प्रकल्पात ६४.६६ टक्के, सोनल प्रकल्पात ५२.६0 टक्के तर अडाण प्रकल्पात ६७.५0 टक्के जलसाठा आहे. सुमारे १२ लाख लोकसंख्या असलेल्या वाशिम जिल्हयाची तहान भागविण्याच्या दृष्टीकोणातून महत्वपूर्ण असलेल्या एकबुर्जी या प्रकल्पातील जलसाठयामध्ये वाढ होवू शकलेली नाही. यामुळे वाशिम शहरातील नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आजच्या घडीला दिसून येत आहे. या प्रकल्पांमध्ये पाणी पातळी वाढविण्याच्या दृष्टीने समाधानकारक पाऊस झालेला नाही. दुसरीकडे उन्हाचा पाराही चढत असल्याने या प्रकल्पातील उपयुक्त जलसाठयाची झपाटयाने बाष्पीभवनामुळे घट होत आहे. १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाने प्रकल्पातील जलसाठयात वाढ दिसून येत असली तरी पाहिजे त्या प्रमाणात नसल्याने अजून जोरदार पावसाची गरज आहे. येत्या काळात जिल्हयात दमदार पाऊस न पडल्यास पाणी टंचाईचे गडद सावट निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने मात्र लघुप्रकल्पातील जलसाठयात वाढ झालेली दिसून येत आहे. यामध्ये अडगाव, गणेशपूर , कोकलगाव बोरव्हा, आसोला, खडकी, भिलडोंगर, हिवरा खुर्द, वाकद, रुई, गीद व फुलउमरी या प्रकलंचा समावेश आहे. हे प्रकल्प ९५ ते १00 टक्के भरली आहेत. ईतर लघु प्रकल्पांमध्येही थोडीफार वाढ दिसून येत आहे.

*पाऊस न झाल्यास पाणी, चारा टंचाईची शक्यता

       मृग नक्षत्रात संपूर्ण जिल्ह्यात पाऊस बरसलयाने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते. संपूर्ण पावसाळयात ५ ते ६ वेळा दमदार पावसाने हजेरी लावली. त्या भरवश्यावर जो साठा शिल्लक आहे त्यावरचं सर्व भागविल्या जात आहे. जोरदार पाऊस न आल्यास जिल्हयात तीव्र पाणी टंचाई व चाराटंचाईस सामोरे जाण्याची वेळ जिल्हावासियांवर येवू शकते.