शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

६३ टक्के शेतक-यांनी काढला विमा

By admin | Updated: August 17, 2015 01:40 IST

विम्यापोटी १0.८२ कोटींचा भरणा ; १.४७ लाख हेक्टरवरील पिकांना विम्याचे कवच.

वाशिम : नैसर्गिक आपत्तींची वारंवारिता गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी म्हणून खरीप पीक विमा योजनेकडे यावर्षी शेतकरी मोठय़ा संख्येने वळले आहेत. वाशिम जिल्हय़ात यावर्षी १ लाख ५१ हजार ८४४ शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे. त्यापोटी १0 कोटी ८२ लाख ३३ हजार ४४७ रुपयांचा हप्ता भरल्या गेला आहे. दरम्यान, जिल्हय़ातील चार लाख २६ हजार हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी एक लाख ४७ हजार ७९८ हेक्टरवरील पिकाचा विमा प्रत्यक्षात काढला गेला आहे. जिल्हय़ातील दोन लाख ४२ हजार शेतकर्‍यांपैकी एक लाख ५२ हजार ४६0 शेतकर्‍यांनी प्रत्यक्षात विमा काढला असून, त्याची टक्केवारी ६३ अशी येते.गतवर्षी जिल्हय़ातील ६0 टक्के शेतकर्‍यांनी विमा काढला होता. या पैकी ८१ टक्के शेतकर्‍यांना प्रत्यक्षात विम्याचा लाभ झाला. त्यामुळे चालू खरीप हंगामामध्ये विमा काढणार्‍या शेतकर्‍याचे ३ टक्केने वाढले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा लागू करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी या योजनेत सहभाग घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या ही ३ ते ५ टक्क्याच्या आत होती; मात्र गत दोन वर्षात शेतकर्‍यांना आलेला लहरी हवामानाचा अनुभव आणि जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या जनजागृतीचा परिणाम म्हणून पीक विमा काढणार्‍या शेतकर्‍यांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत जिल्हय़ात प्रामुख्याने ज्वारी, तूर, मूग, सोयाबीन, कापूस, कांदा, मका, भूईमूग, बाजरी, या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रत्येक पिकासाठी वेगळा हप्ता ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे विदर्भातील आत्महत्याग्रस्त वाशिम, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, अमरावती आणि वर्धा या जिल्हय़ातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना पीकविम्याच्या हप्त्यात ५0 टक्के सूट दिल्या गेली आहे. त्याचाही शेतकर्‍यांना लाभ होत आहे.