शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वर्षभरात ६२ मुली बेपत्ता; पालकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 15:03 IST

गत वर्षभरात जिल्हयातील ६२ मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत वर्षभरात जिल्हयातील ६२ मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे पालकांची चिंता वाढली असून, चालु महिन्यातही ४ मुली बेपत्ता झाल्या. यामधील एका मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.गत १५ दिवसांत वाशिम जिल्ह्यात जवळपास चार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्याने पालकवर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुली बेपत्ता होण्याच्या घटनेच्या अनुषंगाने गत वर्षभरातील आढावा घेतला असता जवळपास ६२ मुली बेपत्ता झाल्या असून, यापैकी ४४ मुलींचा शोध लागला आहे. उर्वरीत १८ मुलींचा शोध अद्याप लागला नाही. या मुलींच्या बेपत्ता होण्यामागील निश्चित कारणे अद्याप समोर आली नाहीत. पिडीत मुलींचे अपहरण झाले की कुणी फूस लावून पळवून नेले याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.विविध कारणांमुळे मुली, महिला बेपत्ता होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. गत वर्षातही मुली, महिला बेपत्ता होण्याची प्रकरणे घडली होती. सन २०२० च्या सुरूवातीलाच मुली बेपत्ता होण्याच्या घटना घडल्या. चार मुली बेपत्ता झाल्या असून त्यांचा शोध अद्याप लागला नाही. एका बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. अजून दोन मुली बेपत्ता झाल्याचे संदेश सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले आहेत. परंतू, या घटनेची पोलीस दप्तरी कुठेलीही नोंद नाही. बेपत्ता मुलींचा शोध लावण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. दोन बेपत्ता मुलींचा शोध लवकरच लागेल, असा विश्वास पोलीस यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. पालकांनीदेखील सतर्क राहणे गरजेचे ठरत आहे.सोशल मीडीयापासून सावधगिरी बाळगणे गरजेचेअल्पवयीन मुला-मुलींमध्ये सध्या फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्स अ‍ॅप यासारख्या सोशल मीडियाचे फॅड आहे. संवाद साधण्याचे सोपे व सहज माध्यम म्हणून फेसबुक, मेसेंजरचा सर्रास वापर होत आहे. बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून मुलींची फसगत झाल्याचे प्रकारही वाशिमसह नजीकच्या अकोला, बुलडाणा जिल्ह्यात उघडकीस आले आहेत. या प्रकारापासून सावध होत मुला-मुलींनी सोशल मीडियाच्या वापरावर स्वत:हून नियंत्रण आणले तर संभाव्य फसगतीला आपसूकच आळा बसू शकेल, यात शंका नाही.सन २०२० मध्ये जानेवारी महिन्यात तीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. एका मुलीचे लोकेशन मिळत नाही. दोन मुलींचा शोध घेण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या तपासाला योग्य दिशा मिळत आहे. लवकरच त्यांचा शोध घेतला जाईल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. पालकांनीदेखील आपल्या पाल्यासंदर्भात सतर्क राहिले पाहिजे. अल्पवयीन मुला-मुलींना शक्यतोवर अँड्राईड मोबाईल देणे टाळले पाहिजे. आपल्या पाल्याचे कोण मित्र आहेत यावरही पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे. आपले पाल्य कुणाशी भेटताहेत यावरही लक्ष असायला हवे. पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे, वेळोवेळी चेक करावे, शाळेला भेटी द्याव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमMissingबेपत्ता होणं