शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

वर्षभरात ६२ मुली बेपत्ता; पालकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 15:03 IST

गत वर्षभरात जिल्हयातील ६२ मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत वर्षभरात जिल्हयातील ६२ मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे पालकांची चिंता वाढली असून, चालु महिन्यातही ४ मुली बेपत्ता झाल्या. यामधील एका मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.गत १५ दिवसांत वाशिम जिल्ह्यात जवळपास चार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्याने पालकवर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुली बेपत्ता होण्याच्या घटनेच्या अनुषंगाने गत वर्षभरातील आढावा घेतला असता जवळपास ६२ मुली बेपत्ता झाल्या असून, यापैकी ४४ मुलींचा शोध लागला आहे. उर्वरीत १८ मुलींचा शोध अद्याप लागला नाही. या मुलींच्या बेपत्ता होण्यामागील निश्चित कारणे अद्याप समोर आली नाहीत. पिडीत मुलींचे अपहरण झाले की कुणी फूस लावून पळवून नेले याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.विविध कारणांमुळे मुली, महिला बेपत्ता होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. गत वर्षातही मुली, महिला बेपत्ता होण्याची प्रकरणे घडली होती. सन २०२० च्या सुरूवातीलाच मुली बेपत्ता होण्याच्या घटना घडल्या. चार मुली बेपत्ता झाल्या असून त्यांचा शोध अद्याप लागला नाही. एका बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. अजून दोन मुली बेपत्ता झाल्याचे संदेश सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले आहेत. परंतू, या घटनेची पोलीस दप्तरी कुठेलीही नोंद नाही. बेपत्ता मुलींचा शोध लावण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. दोन बेपत्ता मुलींचा शोध लवकरच लागेल, असा विश्वास पोलीस यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. पालकांनीदेखील सतर्क राहणे गरजेचे ठरत आहे.सोशल मीडीयापासून सावधगिरी बाळगणे गरजेचेअल्पवयीन मुला-मुलींमध्ये सध्या फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्स अ‍ॅप यासारख्या सोशल मीडियाचे फॅड आहे. संवाद साधण्याचे सोपे व सहज माध्यम म्हणून फेसबुक, मेसेंजरचा सर्रास वापर होत आहे. बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून मुलींची फसगत झाल्याचे प्रकारही वाशिमसह नजीकच्या अकोला, बुलडाणा जिल्ह्यात उघडकीस आले आहेत. या प्रकारापासून सावध होत मुला-मुलींनी सोशल मीडियाच्या वापरावर स्वत:हून नियंत्रण आणले तर संभाव्य फसगतीला आपसूकच आळा बसू शकेल, यात शंका नाही.सन २०२० मध्ये जानेवारी महिन्यात तीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. एका मुलीचे लोकेशन मिळत नाही. दोन मुलींचा शोध घेण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या तपासाला योग्य दिशा मिळत आहे. लवकरच त्यांचा शोध घेतला जाईल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. पालकांनीदेखील आपल्या पाल्यासंदर्भात सतर्क राहिले पाहिजे. अल्पवयीन मुला-मुलींना शक्यतोवर अँड्राईड मोबाईल देणे टाळले पाहिजे. आपल्या पाल्याचे कोण मित्र आहेत यावरही पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे. आपले पाल्य कुणाशी भेटताहेत यावरही लक्ष असायला हवे. पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे, वेळोवेळी चेक करावे, शाळेला भेटी द्याव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमMissingबेपत्ता होणं